शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

अंत्यसंस्कारानंतर मागे वळून का पाहत नाहीत? गरुड पुराणात आढळतो महत्त्वाचा उल्लेख; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 14:25 IST

गरुड पुराणात भौतिक जीवनाव्यतिरिक्त अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या आहेत.

पृथ्वीतलावर मृत्यू ही अटळ गोष्ट आहे. जो जीव जन्माला आला, त्याचा मृत्यू होणारच हे निर्विवाद सत्य आहे. शिव पुराण, गरुड पुराण आणि कठोपनिषद या काही ग्रथांमध्ये मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतरच्या काही बाबींचा उल्लेख झालेला आढळून येतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपापल्या चालीरितींप्रमाणे अंत्यसंस्कार केले जातात. मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी, यासाठी विशेष प्रार्थनाही केली जाते. मात्र, श्मशानात मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मागे वळून पाहू नये, असे सांगितले जाते. यासंदर्भातील काही उल्लेख आणि कारणे गरुड पुराणात आढळून येतात. 

भारतीय संस्कृती परंपरा यांमध्ये १८ पुराणांचा उल्लेख आढळून येतो. या सर्व पुराणांमध्ये मनुष्य जन्म आणि मृत्यूविषयक गोष्टींचा उहापोह केलेला दिसतो. यामध्ये गरुड पुराण महत्त्वाचे मानले गेले आहे. गरुड पुराणात भौतिक जीवनाव्यतिरिक्त अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या आहेत. पुराणात असा उल्लेख आहे की, आत्म्याचा वध करणे कोणालाही शक्य झाले नाही. याशिवाय आत्मा शरीर जळताना पाहतो, असे सांगितले जाते. 

अंत्यसंस्कारानंतर मागे वळून का पाहत नाहीत?

गरुड पुराणानुसार, अंत्यसंस्कारानंतरही आत्म्याला शरीराची आसक्ती असते. आत्म्याला शरीराकडे परत जाण्याची आसक्ती वाढते. यामुळेच अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहिल्यास गेलेल्या व्यक्तींमध्ये कोणाचातरी जीव अडकलेला आहे, ते आत्म्याला दिसते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. आत्मा शरीराच्या आसक्तीत अडकतो, त्यानंतर त्यातून बाहेर पडणे कठीण होते. अंत्यसंस्कारानंतर कोणीही मागे वळून पाहत नाही याचे हे एक कारण आहे. अंत्यसंस्कारानंतर मागे वळून न पाहिल्यास आत्म्याला आपोआप संदेश मिळतो की आता शरीराची आसक्ती नाही. कोणीही गेलेल्या व्यक्तींमध्ये अडकून राहिलेले नाही. 

त्यागलेले शरीर पुन्हा एकदा धारण करण्याचा प्रयत्न करतो

आत्मा जेव्हा शरीराचा त्याग करते, तेव्हा काही काळापर्यंत अचेत स्थितीत असते. आत्म्याला चेतना अवस्था प्राप्त झाली की, आपल्या परिवाराला, कुटुंबातील सदस्यांना, वारसांना पाहून आत्मा दुःखी होते, असे मानले जाते. त्यागलेले शरीर पुन्हा एकदा धारण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आत्म्याला उत्तम गती मिळावी यासाठी तर्पण, पिंडदान केले जाते.