शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

जेवण झाल्यावर ताटात हात धुणे अशुभ का मानले जाते, त्यामागे आहे 'असे' शास्त्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 12:50 IST

अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या बळी राजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्न पूर्णेचे आभार मानायला विसरू नका. 

आपल्याकडे सोळा संस्कारांमध्ये एक संस्कार आहे अन्नग्रहण संस्कार. हा संस्कार पाच-सहा महिन्याच्या शिशुवर केला जातो. तिथपासून पुढे आयुष्यभर या संस्काराचे पालन आपण करत असतो. जेवणाच्या सवयी, नियम आणि शिस्त यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. म्हणून चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजेत. जसे की जेवण झाल्यावर ताटात हात धुणे. 

बर्‍याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते. ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणताही शास्त्राधार नाही.उलट तसे करणे फारच ओंगळवाणे दिसते. एकवेळ, जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून टाकणे, यात शिस्त दिसून येईल परंतु ताटात हात धुणे, हे शास्त्राला धरून नाही. शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयींनमुळे दारिद्रय येऊ शकते. 

अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते. त्याअर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे. म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो. आणि सकस भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो. परंतु रिकाम्या ताटात खरकट्या हाताचे पाणी टाकणे, हा अन्नपूर्णेचा अपमान आहे. त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोष आपण ओढवून घेत असतो. यासाठी ताटात पाणी टाकणे योग्य नाही. 

मूळ शास्त्र काय?तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आहुती आहे. 'अन्न हे पूर्णब्रह्म, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञकर्म' असे आपण जेवणापूर्वीच्या श्लोकात म्हणतो. याचा अर्थ पोट भरावे म्हणून जेवत नाही, तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो. आपल्या पोटात जो अग्नी आहे, त्यात अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली, अशी त्यामागे भावना असते. तळ हातावर घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते. त्यामुळे त्या पाण्याला तीर्थ रूप प्राप्त होते. आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले, त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते. यासाठीच शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणे इष्ट ठरते, अन्यथा त्याचा उलट परिणाम भोगावा लागू शकतो.

जेवतांना साधे सोपे नियम लक्षात ठेवावे. 

  • जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना. 
  • गरज असेल तेवढेच अन्न घ्या, ताटात अन्न वाया घालवू नका. 
  • आपल्या ताटाबाहेर सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्यात न टाकता चिमण्या कावळ्यांना घाला. 
  • जेवताना आसन घेऊन बसा. जमिनीवर थेट बसू नका. शक्य असल्यास बसायला कापडी आसन आणि ताटाखाली पाट किंवा चौरंग घ्यावा. त्यामुळे ताटाभोवती बारीक जीव जिवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करणार नाहीत. 
  • जेवताना मांडी घालून बसा. पलंगावर बसून जेवू नका. वृद्धांनी टेबल खुर्ची तर तरुणांनी भारतीय बैठक घालून सहभोजन करा. 
  • जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या. आपले उष्टे खरकटे अन्न दुसऱ्या कोणाला उचलू न देता, स्वतःच उचलून टाका. 
  • चालत फिरत जेवू नका. एका जागी बसून शांत चित्ताने जेवा. 
  • जेवताना बोलू नका. अप्रिय विषय काढू नका. वाद घालू नका. रडू नका. आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या. 
  • प्रत्येक घास चावून चावून खा. सावकाश जेवा. चमच्यांचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा. त्यामुळे अन्न स्पर्श आणि अन्न रस यांची जाणीव समृद्ध होते. 
  • अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या बळी राजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्न पूर्णेचे आभार मानायला विसरू नका.