शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांच्या वाट्याला अपार सुख आणि माझ्याच वाट्याला दुःखं का? असा विचार करत असाल तर ही गोष्ट वाचा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 17:23 IST

आपल्याला दुसऱ्याचे सुख दिसते पण ते मिळवण्यासाठी त्यांचे कष्ट दिसत नाहीत, नाण्याच्या दोन्ही बाजू पाहिल्या की लक्षात येते प्रयत्नांती परमेश्वर मिळतो, आधी नाही!

जेव्हा दुसऱ्याला सुखात,आनंदात, ऐषो आरामात आपण पाहतो, तेव्हा कळत नकळत मनात दुसऱ्याबद्दल असूया निर्माण होते. त्यामुळे असमाधानी वृत्ती बनते. मन सतत उद्विग्न राहते आणि आजारांना आमंत्रण मिळते. सुख मिळाले, तरी ते पचवण्याची क्षमता सर्वांमध्ये समान नसते. म्हणून भगवंताने प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार सुख दुःखाचे वाटप केले आहे. ते जर केले नसते, तर काय झाले असते, हे या गोष्टीवरून लक्षात येईल. 

आनंदनगर नावाचे एक राज्य होते. त्या राज्याच्या राजाचे नाव देखील आनंदसेन होते. राजा आनंदसेन अत्यंत दयाळू, शूर आणि न्यायी होता. राजाला आपली प्रजा आवडत असे आणि प्रजेलाही राजा अत्यंत प्रिय होता. राजा आनंदसेनाच्या शौर्यामुळे त्याला शत्रूचे भय नव्हते. आनंदनगर राज्यातील प्रत्येक शेतात भरपूर धान्य येई. नदीला तर बारमाही पाणी असे. आनंदनगरची प्रजाही मेहनती आणि समाधानी होती. 

एके दिवशी राजा आनंदसेन जंगलात शिकारीला गेला. दूर जंगलात फिरता फिरता राजाला खूप तहान लागली. जवळपास कुठे पाणीही दिसत नव्हते. तहानेने घसा तर अगदी कोरडा पडला होता. इतरक्यात राजाला दूरवर एक झोपडी दिसली. निदान झोपडीत पाणी तरी मिळेल या आशेने राजा त्या झोपडीकडे निघाला. झोपडीजवळ येताच एका मोठ्या झाडाखाली एक साधू तप करत बसलेला दिसला. साधूजवळ जात असताना राजाला एक भयंकर दृष्य दिसले. 

एक भला मोठा विषारी नाग फणा काढून साधूला चावण्याच्या तयारीत होता. राजाने तत्काळ आपली तलवार उपसली आणि नागाचे तुकडे केले. त्या आवाजाने साधुने डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहत राहिला. राजाने घडलेली घटना साधूला सांगितली. साधू राजाला म्हणाला, `हे राजन, तू माझे प्राण वाचवलेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू मागशील तो वर मी तुला देईन.'

राजा आनंदाने विनयाने म्हणाला, `तसे पाहिले तर देवाच्या दयेने माझ्या राज्यात आनंदी आनंद आहे. माझी प्रजाही सुखसमाधानात आहे. परंतु मी पाहतोय, माझ्या प्रजाजनांना खूप कष्ट करावे लागतात. तेव्हा तुम्ही असा वर द्या की कोणालाही श्रम करावे लागू नयेत.' साधू महाराज हसून तथास्तू म्हणाले.

त्या दिवसापासून आनंदनगर राज्यातील सर्व कामे आपोआप होऊ लागली. शेतात आपोआप धान्य उगवू लागले. कपडे, घर, जेवण इ. सर्व गोष्टी प्रजाजनांना बसल्या जागी मिळू लागल्या. याचा परिणाम असा झाला, की प्रजा आळशी झाली. देरे हरी पलंगावरी, असे आयते ताट बसल्या जागी मिळतेय, तर हातपाय कशाला हलवले पाहिजे? अशी प्रजेची स्थिती झाली. 

राजा आनंदसेन राज्यात फिरून पाहू लागला. तर लोक आळशासारखे बसून आहेत. काही लोक नुसते झोप काढत आहेत. बरेच जण आजारी आहेत. हळूहळू रोगराई वाढू लागली. राजाने मोठमोठ्या वैद्यांना बोलावले, परंतु कसलाही उपाय झाला नाही. प्रजाजन धडाधड मृत्यूमुखी पडू लागले. हे सर्व पाहून राजा चिंतातूर झाला. 

राजा आपल्या सिंहासनावर बसला होता. तेव्हा द्वारपालाने येऊन कोणी साधुपुरूष भेटीस आले आहेत असा निरोप दिला. राजाने दरबारात साधूपुरुषाला बसवले. आदरसत्कार केला आणि हकिकत सांगितली. 

हे ऐकून साधू महाराज म्हणाले, `राजा, या सर्व रोगांवर एकच उपाय आहे. तो म्हणजे श्रम, मेहनत, जे देवाचे एक वरदान आहे. श्रमामुळे आलेल्या घामाने आपल्या शरीरातील सर्व रोग नाहीस होतात. म्हणूनच जेव्हा तुझी प्रजा श्रम करत होती, तेव्हा कोणी आजारी नव्हते. त्यांना आयते मिळणे बंद केले, तर ते पूर्ववत कार्यक्षम होतील.'

साधू महाराजांच्या बोलण्याने राजाचे आणि त्याच्या प्रजेचेही डोळे उघडले. सर्व प्रजा कामाला लागली, काबाडकष्ट करू लागली. श्रमाच्या घामाने त्यांचे सर्व रोग पळाले. प्रजा निरोगी झाली आणि आनंदाने राहू लागली.