शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महाभारताबरोबर गीतेतील तत्त्वज्ञान संपून न जाता ५००० वर्षांनंतरही का अभ्यासले जात आहे? कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 12:41 IST

ज्यांना भगवद्गीता कळायला अवघड वाटते, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी. ज्यांना ज्ञानेश्वरी अवघड वाटते त्यांनी नाथांचे भागवत वाचावे. ज्यांना भागवत अवघड वाटते त्यांनी विनोबा भावेंनी लिहिलेली गीताई वाचावी. परंतु गीतेचे अमृत एकदा तरी प्राशन करावेच करावे.

>> ज्योत्स्ना गाडगीळ

भगवद्गीतेची निर्मिती होऊन ५००० हून अधिक वर्षे उलटून गेली. तरीदेखील आजही हा धर्मग्रंथ प्रमाण मानला जातो. अनेक लेखक, कवी, चित्रकार गीतेवर प्रभावित होऊन त्याचे अन्वयार्थ आजतागायत शोधत आहेत. त्यावर नवनिर्मिती करत आहेत. आयुष्यातील कोणत्याची प्रश्नाचे उत्तर गीतेत सापडते असे अनेक थोरा मोठ्यांनी लिहून ठेवले आहे. 

परंतु गीतेची निर्मिती का झाली, या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेत प्रा. राम शेवाळकर एका व्याख्यानात म्हणाले होते, 'गीता ही श्रीकृष्णाला उपदेश करण्यासाठी नसून त्याच्या मनातील आणि त्याच्यासारखी अवस्था होणाऱ्या प्रत्येक अर्जुनाच्या मनातील संभ्रमावस्था दूर करण्यासाठी सांगितलेले तत्वज्ञान आहे.'

म्हणजे नेमके काय? तर शेवाळकर सांगतात, 'कुरुक्षेत्रावर युद्धासाठी सज्ज झालेल्या अर्जुनाला ऐनवेळेवर हे कळले का, की शत्रूपक्षात आपलेच काका, मामा, आजोबा, शिक्षक, भाऊ लढायला उभे आहेत? नाही! याची त्याला पुरेपूर कल्पना होती. कौरवांशी सामोपचाराचे बोलणे करायला जाण्याआधी श्रीकृष्णाने पांडवांची बैठक घेतली होती. सर्वानुमतीने युद्धाला वाचा फोडली होती. पांडवांची आई कुंती , तिला विचारले असता तिनेही युद्धाला पर्याय नाही असे सांगितले होते. याअर्थी अर्जुनाला परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. असे असूनही ऐन युद्धभूमीवर जेव्हा त्याने आपल्या नातलगांना प्रत्यक्ष आपल्या विरुद्ध उभे असल्याचे पाहिले, तेव्हा त्याच्या हातून गांडीव धनुष्य गळून पडले आणि त्याने श्रीकृष्णाला सांगितले, 'मला युद्ध करता येणार नाही.'

त्यावेळेस कृष्णाने त्याला बळ देऊन, सत्यपरिस्थितीची जाणीव देऊन गीतेचे तत्त्वज्ञान आटोपते घेतले असते आणि महाभारताच्या युद्धाबरोबर गीतादेखील लोप पावली असती. परंतु तसे झाले नाही, कारण श्रीकृष्णाने अर्जुनाच्या डोळ्यावरील मोहपटल बाजूला सारले आणि कर्तव्याचे भान दिले. त्याची समजूत घातली. तू ज्यांना नातेवाईक म्हणतोय, तेदेखील युद्ध करायला, तुम्हा पांडवांना संपवायला शस्त्र घेऊन सज्ज झाले आहेत. असे असताना तू त्यांना आपले समजून कर्तव्यच्युत होऊ नकोस. आपले म्हणवणारे लोकच आपल्या विरुद्ध जातात, तेव्हा आयुष्यात महाभारताची सुरुवात होत़े  अशा वेळी गर्भगळीत होणे योग्य नाही. हीच ती वेळ आहे, कर्तव्याला जागण्याची! कर्तव्य पूर्ण करणे हेच नरदेहाचे सार्थक आहे. त्या कर्तव्याला चुकू नकोस. हे सांगून श्रीकृष्णाने अखिल जगाला ज्ञानामृत पाजले आहे. म्हणून गीता महाभारतानंतरही अमर राहिली. 

ज्यांना भगवद्गीता कळायला अवघड वाटते, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी. ज्यांना ज्ञानेश्वरी अवघड वाटते त्यांनी नाथांचे भागवत वाचावे. ज्यांना भागवत अवघड वाटते त्यांनी विनोबा भावेंनी लिहिलेली गीताई वाचावी. परंतु गीतेचे अमृत एकदा तरी प्राशन करावेच करावे.

टॅग्स :Mahabharatमहाभारत