शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

महाभारताबरोबर गीतेतील तत्त्वज्ञान संपून न जाता ५००० वर्षांनंतरही का अभ्यासले जात आहे? कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 12:41 IST

ज्यांना भगवद्गीता कळायला अवघड वाटते, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी. ज्यांना ज्ञानेश्वरी अवघड वाटते त्यांनी नाथांचे भागवत वाचावे. ज्यांना भागवत अवघड वाटते त्यांनी विनोबा भावेंनी लिहिलेली गीताई वाचावी. परंतु गीतेचे अमृत एकदा तरी प्राशन करावेच करावे.

>> ज्योत्स्ना गाडगीळ

भगवद्गीतेची निर्मिती होऊन ५००० हून अधिक वर्षे उलटून गेली. तरीदेखील आजही हा धर्मग्रंथ प्रमाण मानला जातो. अनेक लेखक, कवी, चित्रकार गीतेवर प्रभावित होऊन त्याचे अन्वयार्थ आजतागायत शोधत आहेत. त्यावर नवनिर्मिती करत आहेत. आयुष्यातील कोणत्याची प्रश्नाचे उत्तर गीतेत सापडते असे अनेक थोरा मोठ्यांनी लिहून ठेवले आहे. 

परंतु गीतेची निर्मिती का झाली, या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेत प्रा. राम शेवाळकर एका व्याख्यानात म्हणाले होते, 'गीता ही श्रीकृष्णाला उपदेश करण्यासाठी नसून त्याच्या मनातील आणि त्याच्यासारखी अवस्था होणाऱ्या प्रत्येक अर्जुनाच्या मनातील संभ्रमावस्था दूर करण्यासाठी सांगितलेले तत्वज्ञान आहे.'

म्हणजे नेमके काय? तर शेवाळकर सांगतात, 'कुरुक्षेत्रावर युद्धासाठी सज्ज झालेल्या अर्जुनाला ऐनवेळेवर हे कळले का, की शत्रूपक्षात आपलेच काका, मामा, आजोबा, शिक्षक, भाऊ लढायला उभे आहेत? नाही! याची त्याला पुरेपूर कल्पना होती. कौरवांशी सामोपचाराचे बोलणे करायला जाण्याआधी श्रीकृष्णाने पांडवांची बैठक घेतली होती. सर्वानुमतीने युद्धाला वाचा फोडली होती. पांडवांची आई कुंती , तिला विचारले असता तिनेही युद्धाला पर्याय नाही असे सांगितले होते. याअर्थी अर्जुनाला परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. असे असूनही ऐन युद्धभूमीवर जेव्हा त्याने आपल्या नातलगांना प्रत्यक्ष आपल्या विरुद्ध उभे असल्याचे पाहिले, तेव्हा त्याच्या हातून गांडीव धनुष्य गळून पडले आणि त्याने श्रीकृष्णाला सांगितले, 'मला युद्ध करता येणार नाही.'

त्यावेळेस कृष्णाने त्याला बळ देऊन, सत्यपरिस्थितीची जाणीव देऊन गीतेचे तत्त्वज्ञान आटोपते घेतले असते आणि महाभारताच्या युद्धाबरोबर गीतादेखील लोप पावली असती. परंतु तसे झाले नाही, कारण श्रीकृष्णाने अर्जुनाच्या डोळ्यावरील मोहपटल बाजूला सारले आणि कर्तव्याचे भान दिले. त्याची समजूत घातली. तू ज्यांना नातेवाईक म्हणतोय, तेदेखील युद्ध करायला, तुम्हा पांडवांना संपवायला शस्त्र घेऊन सज्ज झाले आहेत. असे असताना तू त्यांना आपले समजून कर्तव्यच्युत होऊ नकोस. आपले म्हणवणारे लोकच आपल्या विरुद्ध जातात, तेव्हा आयुष्यात महाभारताची सुरुवात होत़े  अशा वेळी गर्भगळीत होणे योग्य नाही. हीच ती वेळ आहे, कर्तव्याला जागण्याची! कर्तव्य पूर्ण करणे हेच नरदेहाचे सार्थक आहे. त्या कर्तव्याला चुकू नकोस. हे सांगून श्रीकृष्णाने अखिल जगाला ज्ञानामृत पाजले आहे. म्हणून गीता महाभारतानंतरही अमर राहिली. 

ज्यांना भगवद्गीता कळायला अवघड वाटते, त्यांनी ज्ञानेश्वरी वाचावी. ज्यांना ज्ञानेश्वरी अवघड वाटते त्यांनी नाथांचे भागवत वाचावे. ज्यांना भागवत अवघड वाटते त्यांनी विनोबा भावेंनी लिहिलेली गीताई वाचावी. परंतु गीतेचे अमृत एकदा तरी प्राशन करावेच करावे.

टॅग्स :Mahabharatमहाभारत