शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वास्तूच्या प्रवेशद्वारावर 'या' शुभ चिन्हांचे रेखाटन महत्त्वाचे का मानले गेले आहे? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 16:58 IST

हिंदू धर्मातील प्रतीके ही ईश्वरी अंशाच्या खुणा मानल्या जातात. त्या देवतांना आवाहन करून त्यांचा वास आपल्या वास्तूत राहावा यासाठी पुढील चिन्हे रेखाटली जातात.

हिंदू धर्मात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मानवाच्या प्रगतीत भर घालतात. त्यापैकी एक आहे - शुभ चिन्ह! बहुतेक घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर शुभ चिन्हे रेखाटली जातात. शुभ, लाभ आणि स्वस्तिक आणि गृहलक्ष्मीच्या हाताचा ठसा ही चिन्हे घराच्या, मंदिराच्या किंवा व्यावसायिक वास्तूच्या मुख्य दरवाजांवर का रेखाटली जातात? ते जाणून घ्या. 

हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की घराच्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहिल्याने आणि स्वस्तिक चिन्ह लावल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. यासोबतच श्री हे रेखाटन श्रीगणेशाचे अस्तित्त्व निर्माण करते. त्यामुळे बाप्पाचाही आशीर्वाद प्राप्त होतो. याशिवाय ही चिन्हे वास्तुबाहेरील नकारात्मक ऊर्जा वास्तुबाहेर रोखून धरतात. हिंदू धर्मातील प्रतीके ही ईश्वरी अंशाच्या खुणा मानल्या जातात. त्या देवतांना आवाहन करून त्यांचा वास आपल्या वास्तूत राहावा यासाठी शुभ लाभ लिहिले जाते. तसेच मांगल्याचे प्रतीक म्हणून स्वस्तिक, ओंकार किंवा गृहलक्ष्मीच्या हाताचे ठसे उमटवले जातात.

 

शास्त्रात श्रीगणेशाचा पुत्र शुभ लाभ मानला आहे. अशा स्थितीत शुभ लिहिणे म्हणजे ज्या साधनाने आपल्याला संपत्ती आणि कीर्ती प्राप्त झाली आहे, तिचे उगमस्थान सदैव वास्तूत राहावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करणे. तसेच शुभ लिहिणे म्हणजे आपण देवाकडे प्रार्थना करतो की घरातील संपत्ती नेहमी शुभ मार्गे वाढू दे. त्याचबरोबर व्यवसायातही आर्थिक प्रगती होऊ दे.

घराच्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ लिहिल्याने घरात सुख-शांती कायम राहते. या शब्दांमध्ये सकारात्मकता ठासून भरलेली आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दारातच नष्ट होऊन घर, वास्तू सुरक्षित राहते. हे शब्द कुंकवाने लिहिण्यामागचे कारण म्हणजे कुंकू हे माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे तिचा वास घरात सदैव राहावा आणि तिचा वरदहस्त कायम राहावा अशी भावना असते.

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र