शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
3
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
4
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
5
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
9
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
11
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
12
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
13
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
14
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
15
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
16
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
17
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
18
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
19
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!

हनुमंताचा अपमान हा शनी देवाचाही अपमान का मानला जातो? वाचा त्यामागचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 16:41 IST

असे म्हणतात की हनुमंताची पूजा केली तर शनी देव तुष्ट होतात आणि हनुमंताचा अपमान झाला तर शनी देव रुष्ट होतात; असे नेमके का? ते जाणून घेऊ!

'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर' ही सुप्रसिद्ध गाण्याची ओळ शनी देवाला तंतोतंत लागू होते. कारण ते प्रत्येकाच्या कर्माचा अचूक हिशोब ठेवतात व कर्मानुसार प्रत्येकाला फळ देतात. प्रत्येकाला आपले भले बुरे कर्म माहीत असते, त्यामुळे काय फळ मिळेल याची भीती प्रत्येकाला वाटते. केवळ दानव, मानवच नाही तर देवसुद्धा शनी देवाच्या नावाने भयकंपित होत असत. 

शनी देवाचा फेरा ठरलेला असल्याने ते आपल्या नियोजित वेळी नियोजित ठिकाणी पोहोचतात. असेच ते एकदा त्रिदेवांची भेट घेण्यासाठी निघाले. सर्वप्रथम ते ब्रह्म देवाकडे आहे. ब्रह्म देवाने बसल्या जागी आपले कमळ मिटून घेतले. मग शनी देव क्षीरसागरात आले. तिथे भगवान विष्णू पाण्यात जाऊन लपले. त्यांचीही भेट घडली नाही म्हणून शनी देव कैलासात पोहोचले. तिथेही महादेव गायब होते. ते चक्क कैलासाच्या पायथ्याशी जाऊन लपले. शनी देव रागावले आणि म्हणाले, माझ्या येण्याच्या भीतीने पळ काढणाऱ्या त्रिदेवांनो तुम्ही मला कितीही चुकवण्याचा प्रयत्न केलात तरी माझ्यामुळे चार क्षण का होईना तुम्हाला माझा जाच सहन करावा लागला. हाच माझा प्रभाव! असे लपून बसण्यापेक्षा तुम्ही माझे स्वागत केले असते, तर तेवढाही त्रास सहन करावा लागला नसता. 

शनी देव क्रुद्ध होऊन जात असताना वाटेत हनुमान भेटले. हनुमंतांनी हात जोडून सांगितले, 'शनी महाराज तुम्ही माझ्या घरी चला. मी करतो तुमचा पाहुणचार. अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हे ऐकताच शनी देव चपापले आणि म्हणाले, 'हनुमंता सगळे जण मला टाळतात, पण तू माझे स्वागत केलेस हे पाहून मी धन्य झालो. मी तुला मैत्रीचा प्रस्ताव देतो. हनुमंताने आनंदाने शनी देवाची मैत्री स्वीकारली आणि शनी देवाला आलिंगन दिले. त्यावेळेस शनी देवाने वचन दिले, 'जो कोणी भक्त मनोभावे हनुमंताची उपासना करेल त्याला माझा त्रास होणार नाही, मात्र जो हनुमंताचा अपमान करेल त्याचा पिच्छा मी सोडणार नाही!'

तेव्हापासून हनुमंत आणि शनी देव यांची जोडी जमली आणि शनी प्रकोपापासून मुक्तता मिळवण्यासाठी हनुमंत उपासनेची सोय मिळाली. म्हणून आजही आपण पाहतो, की शनी मंदिर आणि हनुमान मंदिर एकत्र किंवा जवळपास असतात. हे लक्षात ठेवता आपणही त्यांच्या उपासनेत कुचराई करता कामा नये!