शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दिवसेंदिवस नात्यांमधील अंतर का वाढत चालले आहे? सांगताहेत गौर गोपाल दास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:09 IST

नाती जोडताना इगो तोडावा लागला, तर कमीपणा वाटून घेऊ नका. कारण नाती महत्त्वाची आहेत, इगो नाही! हे कायम लक्षात ठेवा. 

घर आहे, माणसं आहेत, पण संवाद हरपत चालला आहे. का? कशामुळे? याचा कधी शांतपणे विचार केला आहे का? मोबाईलमुळे - असे चटकन उत्तर देऊन तुम्ही मोकळे व्हाल. जे बहुतांशी खरे आहे, परंतु ते पूर्ण सत्य नाही! काळानुरुप भौतिक बदल घडत राहणार, ते व्हायलाही हवेत. परंतु त्या बदलाचा प्रभाव नातेसंबंधांवर होणे अपेक्षित नाही. गौर गोपालदास प्रभू सांगतात-

घर म्हटले की भांड्याला भांडे लागणार आणि आवाज होणार. एका भांड्याचा आवाज होत नाही. दोन भांड्यांचा होतो, दोनापेक्षा जास्त भांड्यांचा होतो. तसेच एकटा राहणारा मनुष्य कोणाशी वाद घालणार? पण तेच दोघेजण असतील विंâवा दोनापेक्षा जास्त जण असतील तर वाद होणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचा फक्त त्रास करून घ्यायचा ठरवलं तर नाती दुरावणारच. 

नाती दुरावण्यामागे आणखी एक मुख्य कारण म्हणजे आपण फक्त आपल्या आवडी निवडीचा विचार करतो. आपल्याला आवडते तसे दुसऱ्याने वागले, तर ती व्यक्ती चांगली. आपल्या मनाविरुद्ध वागली की वाईट. त्यामुळे वाद होतात आणि वाद विकोपाला गेले की एकटेपणा जाणवतो, एकटे राहावेसे वाटू लागते आणि नाते शरीरानेच नाही तर मनानेही दुरावते. 

आपण दुसऱ्याचे दोष उगाळत बसतो. परंतु त्याच्याकडून घेण्यासारख्या, शिकण्यासारख्या कितीतरी चांगल्या गोष्टीदेखील आहेत हे आपण विसरून जातो. त्याने आपल्यासाठी काय केले नाही, याची यादी आपल्याकडे तयार असते, परंतु न सांगतानी त्या व्यक्तीने आपल्यासाठी केलेला त्याग, कष्ट, प्रेम याची नोंद आपण ठेवत नाही. कारण आपला इगो, अहंकार आडवा येतो.

व्यक्ती वाईट नसते, आपला अहंकार वाईट असतो. तो आपल्या डोळ्यावर चांगुलपणा दिसणार नाही अशा पद्धतीने पट्टी बांधतो. ती पट्टी आपणच आपली सोडायला हवी. मग हेच जग आपल्याला किती सुंदर वाटू लागेल बघा! आपला जीवनसाथी, ज्याच्यावर कधी काळी आपण खूप प्रेम केले, त्याचा तिरस्कार वाटणे बंद होईल. मुलांच्या जन्माच्या वेळी झालेला आनंद आठवला, की त्यांनी दिलेला त्रास शुल्लक वाटू लागेल. आपल्या बालपणी आईवडीलांनी घेतलेले कष्ट आठवले, की म्हातारपणी त्यांचे साधे बोलणे कटकटीसारखे वाटणार नाही. ही समज एकदा येऊ लागली, की नाती दुरावण्याची भीती नाहिशी होईल. 

नाती जोडताना इगो तोडावा लागला, तर कमीपणा वाटून घेऊ नका. कारण नाती महत्त्वाची आहेत, इगो नाही! हे कायम लक्षात ठेवा. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीRelationship Tipsरिलेशनशिप