शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

दिवसेंदिवस नात्यांमधील अंतर का वाढत चालले आहे? सांगताहेत गौर गोपाल दास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:09 IST

नाती जोडताना इगो तोडावा लागला, तर कमीपणा वाटून घेऊ नका. कारण नाती महत्त्वाची आहेत, इगो नाही! हे कायम लक्षात ठेवा. 

घर आहे, माणसं आहेत, पण संवाद हरपत चालला आहे. का? कशामुळे? याचा कधी शांतपणे विचार केला आहे का? मोबाईलमुळे - असे चटकन उत्तर देऊन तुम्ही मोकळे व्हाल. जे बहुतांशी खरे आहे, परंतु ते पूर्ण सत्य नाही! काळानुरुप भौतिक बदल घडत राहणार, ते व्हायलाही हवेत. परंतु त्या बदलाचा प्रभाव नातेसंबंधांवर होणे अपेक्षित नाही. गौर गोपालदास प्रभू सांगतात-

घर म्हटले की भांड्याला भांडे लागणार आणि आवाज होणार. एका भांड्याचा आवाज होत नाही. दोन भांड्यांचा होतो, दोनापेक्षा जास्त भांड्यांचा होतो. तसेच एकटा राहणारा मनुष्य कोणाशी वाद घालणार? पण तेच दोघेजण असतील विंâवा दोनापेक्षा जास्त जण असतील तर वाद होणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचा फक्त त्रास करून घ्यायचा ठरवलं तर नाती दुरावणारच. 

नाती दुरावण्यामागे आणखी एक मुख्य कारण म्हणजे आपण फक्त आपल्या आवडी निवडीचा विचार करतो. आपल्याला आवडते तसे दुसऱ्याने वागले, तर ती व्यक्ती चांगली. आपल्या मनाविरुद्ध वागली की वाईट. त्यामुळे वाद होतात आणि वाद विकोपाला गेले की एकटेपणा जाणवतो, एकटे राहावेसे वाटू लागते आणि नाते शरीरानेच नाही तर मनानेही दुरावते. 

आपण दुसऱ्याचे दोष उगाळत बसतो. परंतु त्याच्याकडून घेण्यासारख्या, शिकण्यासारख्या कितीतरी चांगल्या गोष्टीदेखील आहेत हे आपण विसरून जातो. त्याने आपल्यासाठी काय केले नाही, याची यादी आपल्याकडे तयार असते, परंतु न सांगतानी त्या व्यक्तीने आपल्यासाठी केलेला त्याग, कष्ट, प्रेम याची नोंद आपण ठेवत नाही. कारण आपला इगो, अहंकार आडवा येतो.

व्यक्ती वाईट नसते, आपला अहंकार वाईट असतो. तो आपल्या डोळ्यावर चांगुलपणा दिसणार नाही अशा पद्धतीने पट्टी बांधतो. ती पट्टी आपणच आपली सोडायला हवी. मग हेच जग आपल्याला किती सुंदर वाटू लागेल बघा! आपला जीवनसाथी, ज्याच्यावर कधी काळी आपण खूप प्रेम केले, त्याचा तिरस्कार वाटणे बंद होईल. मुलांच्या जन्माच्या वेळी झालेला आनंद आठवला, की त्यांनी दिलेला त्रास शुल्लक वाटू लागेल. आपल्या बालपणी आईवडीलांनी घेतलेले कष्ट आठवले, की म्हातारपणी त्यांचे साधे बोलणे कटकटीसारखे वाटणार नाही. ही समज एकदा येऊ लागली, की नाती दुरावण्याची भीती नाहिशी होईल. 

नाती जोडताना इगो तोडावा लागला, तर कमीपणा वाटून घेऊ नका. कारण नाती महत्त्वाची आहेत, इगो नाही! हे कायम लक्षात ठेवा. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीRelationship Tipsरिलेशनशिप