शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

दिवसेंदिवस नात्यांमधील अंतर का वाढत चालले आहे? सांगताहेत गौर गोपाल दास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 14:09 IST

नाती जोडताना इगो तोडावा लागला, तर कमीपणा वाटून घेऊ नका. कारण नाती महत्त्वाची आहेत, इगो नाही! हे कायम लक्षात ठेवा. 

घर आहे, माणसं आहेत, पण संवाद हरपत चालला आहे. का? कशामुळे? याचा कधी शांतपणे विचार केला आहे का? मोबाईलमुळे - असे चटकन उत्तर देऊन तुम्ही मोकळे व्हाल. जे बहुतांशी खरे आहे, परंतु ते पूर्ण सत्य नाही! काळानुरुप भौतिक बदल घडत राहणार, ते व्हायलाही हवेत. परंतु त्या बदलाचा प्रभाव नातेसंबंधांवर होणे अपेक्षित नाही. गौर गोपालदास प्रभू सांगतात-

घर म्हटले की भांड्याला भांडे लागणार आणि आवाज होणार. एका भांड्याचा आवाज होत नाही. दोन भांड्यांचा होतो, दोनापेक्षा जास्त भांड्यांचा होतो. तसेच एकटा राहणारा मनुष्य कोणाशी वाद घालणार? पण तेच दोघेजण असतील विंâवा दोनापेक्षा जास्त जण असतील तर वाद होणे स्वाभाविक आहे. मात्र त्याचा फक्त त्रास करून घ्यायचा ठरवलं तर नाती दुरावणारच. 

नाती दुरावण्यामागे आणखी एक मुख्य कारण म्हणजे आपण फक्त आपल्या आवडी निवडीचा विचार करतो. आपल्याला आवडते तसे दुसऱ्याने वागले, तर ती व्यक्ती चांगली. आपल्या मनाविरुद्ध वागली की वाईट. त्यामुळे वाद होतात आणि वाद विकोपाला गेले की एकटेपणा जाणवतो, एकटे राहावेसे वाटू लागते आणि नाते शरीरानेच नाही तर मनानेही दुरावते. 

आपण दुसऱ्याचे दोष उगाळत बसतो. परंतु त्याच्याकडून घेण्यासारख्या, शिकण्यासारख्या कितीतरी चांगल्या गोष्टीदेखील आहेत हे आपण विसरून जातो. त्याने आपल्यासाठी काय केले नाही, याची यादी आपल्याकडे तयार असते, परंतु न सांगतानी त्या व्यक्तीने आपल्यासाठी केलेला त्याग, कष्ट, प्रेम याची नोंद आपण ठेवत नाही. कारण आपला इगो, अहंकार आडवा येतो.

व्यक्ती वाईट नसते, आपला अहंकार वाईट असतो. तो आपल्या डोळ्यावर चांगुलपणा दिसणार नाही अशा पद्धतीने पट्टी बांधतो. ती पट्टी आपणच आपली सोडायला हवी. मग हेच जग आपल्याला किती सुंदर वाटू लागेल बघा! आपला जीवनसाथी, ज्याच्यावर कधी काळी आपण खूप प्रेम केले, त्याचा तिरस्कार वाटणे बंद होईल. मुलांच्या जन्माच्या वेळी झालेला आनंद आठवला, की त्यांनी दिलेला त्रास शुल्लक वाटू लागेल. आपल्या बालपणी आईवडीलांनी घेतलेले कष्ट आठवले, की म्हातारपणी त्यांचे साधे बोलणे कटकटीसारखे वाटणार नाही. ही समज एकदा येऊ लागली, की नाती दुरावण्याची भीती नाहिशी होईल. 

नाती जोडताना इगो तोडावा लागला, तर कमीपणा वाटून घेऊ नका. कारण नाती महत्त्वाची आहेत, इगो नाही! हे कायम लक्षात ठेवा. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीRelationship Tipsरिलेशनशिप