शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांना तुमच्या आमच्यासारखे मृत्यूचे भय का वाटत नाही? सांगत आहेत ओशो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 08:00 IST

जोवर तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी एखाद्या योद्ध्यासारके कंबर कसून रणांगणावर उतरत नाही, तोवर तुम्ही तुमच्या क्रियेशी समरस होऊ शकत नाही.

युद्धभूमीवर सैनिकांना कित्येकदा सखोल आनंदाचा अनुभव येतो. हा असा विचार सुद्धा आपल्याला कठीण वाटतो. कारण ते त्या काळी त्या स्थळी मृत्यूच्या इतक्या निकट असतात की कोणत्याही क्षणी त्यांच्यावर मृत्यू कोसळू शकतो. सुरुवातीला ते भयभीत होतात. भयाने त्यांचा थरकाप होतो. पण रोज अखंडपने तुम्ही थरथरत, घाबरलेले राहू शकत नाही. हळू हळू सवय होते. मनुष्य मृत्यूचा स्वीकार करतो. मग भय समाप्त होते आणि केवळ कर्म शिल्लक राहते. 

सैनिक या क्रियेत इतक्या खोलवर बुडून जातात की स्वत:चे अस्तित्त्वही विसरून जातात. जोवर 'मी' शाबूत असतो, तोवर हा भाव भयंकर त्रास देऊ शकतो. मग चूक घडू शकते. क्रियेशी संपूर्ण सामरस्य होऊ शकत नाही. इकडे जीवनच पणाला लागलेले असते. म्हणून तुम्ही द्वैताचा भार ओढू शकत नाही. कृत्यच समग्र होते. 

मोठमोठ्या योद्ध्यांनी आनंदाच्या इतक्या प्रगाढ झऱ्यांचा अनुभव घेतला आहे की तसा अनुभव सर्वसामान्य जीवनात प्राप्त होणे अशक्यच! कदाचित म्हणूनच त्यांना युद्ध आकर्षित करत असेल. जे लोक विचार करतात ते कधीच पुढे जाऊ शकत नाहीत, जे विचारांना कृतीची जोड देतात, तेच प्रगती करतात. तेच ध्येय गाठू शकतात. योद्ध्यांच्या बाबतीत तेच घडते. त्यांचे ध्येय स्पष्ट असते आणि ते आपल्या ध्येयाशी अद्वैत पावलेले असतात.

याउलट आपण सगळे सतत द्वैतात अडकलेले असतो. आपली झेप जीवन आणि मृत्यू च्या खेळाच्या मधली असते. मृत्यूच्या भयाने आपण रोजचा दिवस नुसता धनसंपत्तीचा खेळ खेळत राहतो. जगण्याची धडपड असते. योद्ध्यांचे तसे नाही. ते मृत्यूला घाबरत नाहीत, तर ते युद्धाला सामोरे जातात. त्यांना युद्धाचे आकर्षण वाटते. त्यांना फक्त विजयश्री मिळवून आणायची असते. त्यासाठी वाटेत येणारे सगळे अडथळे पार करण्याची त्यांची तयारी असते. 

या उदाहरणावरून शिकण्यासारखी गोष्ट हीच आहे, की जोवर तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी एखाद्या योद्ध्यासारके कंबर कसून रणांगणावर उतरत नाही, तोवर तुम्ही तुमच्या क्रियेशी समरस होऊ शकत नाही. ती अवस्था गाठण्यासाठी वाटेत येणारे अडथळे आणि आकर्षण यावर मात करून, कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता तुम्हाला लढले पाहिजे, योद्ध्यासारखे! तरच तुम्हीसुद्धा तुमच्या कार्यक्षेत्रात विजयश्री खेचून आणू शकाल.