शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

सैनिकांना तुमच्या आमच्यासारखे मृत्यूचे भय का वाटत नाही? सांगत आहेत ओशो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 08:00 IST

जोवर तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी एखाद्या योद्ध्यासारके कंबर कसून रणांगणावर उतरत नाही, तोवर तुम्ही तुमच्या क्रियेशी समरस होऊ शकत नाही.

युद्धभूमीवर सैनिकांना कित्येकदा सखोल आनंदाचा अनुभव येतो. हा असा विचार सुद्धा आपल्याला कठीण वाटतो. कारण ते त्या काळी त्या स्थळी मृत्यूच्या इतक्या निकट असतात की कोणत्याही क्षणी त्यांच्यावर मृत्यू कोसळू शकतो. सुरुवातीला ते भयभीत होतात. भयाने त्यांचा थरकाप होतो. पण रोज अखंडपने तुम्ही थरथरत, घाबरलेले राहू शकत नाही. हळू हळू सवय होते. मनुष्य मृत्यूचा स्वीकार करतो. मग भय समाप्त होते आणि केवळ कर्म शिल्लक राहते. 

सैनिक या क्रियेत इतक्या खोलवर बुडून जातात की स्वत:चे अस्तित्त्वही विसरून जातात. जोवर 'मी' शाबूत असतो, तोवर हा भाव भयंकर त्रास देऊ शकतो. मग चूक घडू शकते. क्रियेशी संपूर्ण सामरस्य होऊ शकत नाही. इकडे जीवनच पणाला लागलेले असते. म्हणून तुम्ही द्वैताचा भार ओढू शकत नाही. कृत्यच समग्र होते. 

मोठमोठ्या योद्ध्यांनी आनंदाच्या इतक्या प्रगाढ झऱ्यांचा अनुभव घेतला आहे की तसा अनुभव सर्वसामान्य जीवनात प्राप्त होणे अशक्यच! कदाचित म्हणूनच त्यांना युद्ध आकर्षित करत असेल. जे लोक विचार करतात ते कधीच पुढे जाऊ शकत नाहीत, जे विचारांना कृतीची जोड देतात, तेच प्रगती करतात. तेच ध्येय गाठू शकतात. योद्ध्यांच्या बाबतीत तेच घडते. त्यांचे ध्येय स्पष्ट असते आणि ते आपल्या ध्येयाशी अद्वैत पावलेले असतात.

याउलट आपण सगळे सतत द्वैतात अडकलेले असतो. आपली झेप जीवन आणि मृत्यू च्या खेळाच्या मधली असते. मृत्यूच्या भयाने आपण रोजचा दिवस नुसता धनसंपत्तीचा खेळ खेळत राहतो. जगण्याची धडपड असते. योद्ध्यांचे तसे नाही. ते मृत्यूला घाबरत नाहीत, तर ते युद्धाला सामोरे जातात. त्यांना युद्धाचे आकर्षण वाटते. त्यांना फक्त विजयश्री मिळवून आणायची असते. त्यासाठी वाटेत येणारे सगळे अडथळे पार करण्याची त्यांची तयारी असते. 

या उदाहरणावरून शिकण्यासारखी गोष्ट हीच आहे, की जोवर तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी एखाद्या योद्ध्यासारके कंबर कसून रणांगणावर उतरत नाही, तोवर तुम्ही तुमच्या क्रियेशी समरस होऊ शकत नाही. ती अवस्था गाठण्यासाठी वाटेत येणारे अडथळे आणि आकर्षण यावर मात करून, कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता तुम्हाला लढले पाहिजे, योद्ध्यासारखे! तरच तुम्हीसुद्धा तुमच्या कार्यक्षेत्रात विजयश्री खेचून आणू शकाल.