शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सैनिकांना तुमच्या आमच्यासारखे मृत्यूचे भय का वाटत नाही? सांगत आहेत ओशो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 08:00 IST

जोवर तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी एखाद्या योद्ध्यासारके कंबर कसून रणांगणावर उतरत नाही, तोवर तुम्ही तुमच्या क्रियेशी समरस होऊ शकत नाही.

युद्धभूमीवर सैनिकांना कित्येकदा सखोल आनंदाचा अनुभव येतो. हा असा विचार सुद्धा आपल्याला कठीण वाटतो. कारण ते त्या काळी त्या स्थळी मृत्यूच्या इतक्या निकट असतात की कोणत्याही क्षणी त्यांच्यावर मृत्यू कोसळू शकतो. सुरुवातीला ते भयभीत होतात. भयाने त्यांचा थरकाप होतो. पण रोज अखंडपने तुम्ही थरथरत, घाबरलेले राहू शकत नाही. हळू हळू सवय होते. मनुष्य मृत्यूचा स्वीकार करतो. मग भय समाप्त होते आणि केवळ कर्म शिल्लक राहते. 

सैनिक या क्रियेत इतक्या खोलवर बुडून जातात की स्वत:चे अस्तित्त्वही विसरून जातात. जोवर 'मी' शाबूत असतो, तोवर हा भाव भयंकर त्रास देऊ शकतो. मग चूक घडू शकते. क्रियेशी संपूर्ण सामरस्य होऊ शकत नाही. इकडे जीवनच पणाला लागलेले असते. म्हणून तुम्ही द्वैताचा भार ओढू शकत नाही. कृत्यच समग्र होते. 

मोठमोठ्या योद्ध्यांनी आनंदाच्या इतक्या प्रगाढ झऱ्यांचा अनुभव घेतला आहे की तसा अनुभव सर्वसामान्य जीवनात प्राप्त होणे अशक्यच! कदाचित म्हणूनच त्यांना युद्ध आकर्षित करत असेल. जे लोक विचार करतात ते कधीच पुढे जाऊ शकत नाहीत, जे विचारांना कृतीची जोड देतात, तेच प्रगती करतात. तेच ध्येय गाठू शकतात. योद्ध्यांच्या बाबतीत तेच घडते. त्यांचे ध्येय स्पष्ट असते आणि ते आपल्या ध्येयाशी अद्वैत पावलेले असतात.

याउलट आपण सगळे सतत द्वैतात अडकलेले असतो. आपली झेप जीवन आणि मृत्यू च्या खेळाच्या मधली असते. मृत्यूच्या भयाने आपण रोजचा दिवस नुसता धनसंपत्तीचा खेळ खेळत राहतो. जगण्याची धडपड असते. योद्ध्यांचे तसे नाही. ते मृत्यूला घाबरत नाहीत, तर ते युद्धाला सामोरे जातात. त्यांना युद्धाचे आकर्षण वाटते. त्यांना फक्त विजयश्री मिळवून आणायची असते. त्यासाठी वाटेत येणारे सगळे अडथळे पार करण्याची त्यांची तयारी असते. 

या उदाहरणावरून शिकण्यासारखी गोष्ट हीच आहे, की जोवर तुम्ही ध्येयप्राप्तीसाठी एखाद्या योद्ध्यासारके कंबर कसून रणांगणावर उतरत नाही, तोवर तुम्ही तुमच्या क्रियेशी समरस होऊ शकत नाही. ती अवस्था गाठण्यासाठी वाटेत येणारे अडथळे आणि आकर्षण यावर मात करून, कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता तुम्हाला लढले पाहिजे, योद्ध्यासारखे! तरच तुम्हीसुद्धा तुमच्या कार्यक्षेत्रात विजयश्री खेचून आणू शकाल.