शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यात का अडकतो ? वाचा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 15:34 IST

प्रतिजन्मी आत्मघात झाल्याने `कोण करावे गणित' या चक्रवाढ व्याजी थाटात त्याच्या जन्म मृत्यूच्या चकरा चालूच राहतात. मग प्रश्न असा उरतो, संसारात वागावे कसे?

माणूस सर्वसाधारणपणे स्वत:च्या देहाचे व संसाराचे नको एवढे चिंतन करीत बसतो. त्यामुळे `जन्म होणे' यातच ईश्वरापासून तो दुरावलेला असतो. संसारी विषयांच्या चिंतनामुळे तो सतत त्याच विषयात अडवूâन राहतो. आशा आकांक्षाच्या बेड्या पायात अडकतात आणि त्या एका जन्मात पूर्ण होत नाहीत, म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. एकदा मेल्याने सुटेना, असे हे मरण आहे. 

आणखी जगणे नको, असा सूर लावणारे लोकसुद्धा यमराज दाराशी येताच पुढच्या दारी जा सांगतात. म्हणजेच मरणाची तयारी नाही आणि आनंदाने जगण्याची कला नाही. या द्वंद्वात मनुष्य झुरत राहतो. म्हणजे तो जिवंतपणी मरण अनुभवत असतो. कधी इच्छा, आकांक्षा, आवड अशा कितीतरी गोष्टींवर पाणी सोडत, तडजोड करत तो जगत असतो. परंतु या जगण्याला कोणी जगणे म्हणत नाही. ही फक्त आयुष्याशी केलेली तडजोड असते. श्रीमंती गाठीशी असूनही उपभोगता आली नाही, आनंदाचे क्षण असूनही ते ऐकायला आपली व्यक्ती नाही, समाजात मान सन्मान आहे, पण घरात काडीची किंमत नाही, हे जगणं मरणाहून वाईट आहे. त्यापेक्षा अध्यात्माच्या वाटेवर चालू लागाल. देहाची, मनाची आसक्त कमी करून, कर्म करा आणि निकाल भगवंतावर सोपवा. प्रतिजन्मी आत्मघात झाल्याने `कोण करावे गणित' या चक्रवाढ व्याजी थाटात त्याच्या जन्म मृत्यूच्या चकरा चालूच राहतात. मग प्रश्न असा उरतो, संसारात वागावे कसे? तर संत एकनाथ म्हणतात- 

ऐसे असावे संसारी, जोवरी प्राक्तनाची दोरी,पक्षी अंगणासी आले,आपला चारा चरोनि गेले,मुळी घराचार मांडिला,खेळ मोडोनि टाकिला,वाटसरू वाटा आले,प्रात:काळी उठोनि गेले,मार्गी बुहसाल भेटले,नाही मन तेथे गुंतले,एका विनवी जनार्दना,ऐसे असता भय कोणा।।

सत्संगतीने माणूस देहासक्ती कमी करू लागतो आणि ईशसेवेत आसक्ती वाढवू लागतो. हे मर्म आपण वेळीच समजून घेतले पाहिजे. समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हटले आहे -

देहादीक प्रपंच हा चिंतियेला,परी अंतरी लोभ निश्चीत ठेला,हरीचिंतने मुक्तिकांता वरावी,सदा संगती सज्जनाची धरावी।। श्रीराम।।