शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नमस्कार करताना शीर का झुकवतात? वाचा सम्राट अशोकाची कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 14:33 IST

ज्याचे आचरण शुद्ध, त्याचेच चरण धरा आणि मस्तक नमवता येईल तिथेच नतमस्तक व्हा!

एकदा सम्राट अशोक राज्याच्या टेहळणीसाठी निघाला होता. सोबत त्याचा प्रधान आणि मुख्य सैनिक होते. राज्याचा फेरफटका मारत असताना राज्याच्या वेशीवर एक साधू बसले होते. सम्राट अशोकाने आपल्या वहाणा बाजूला काढून त्या साधुंजवळ जाऊन त्यांना साष्टांग नमन केले. साधू काहीच बोलले नाहीत. त्यांनी नुसते स्मित करत आशीर्वादरूपी हात सम्राटाला दर्शवला. त्यांचे दर्शन घेऊन चौकडी सम्राट अशोकासह महालात परत आली.

महालात आल्यावर प्रधान सम्राटाला म्हणाला, `सम्राट, जे शीर राजतिलक लावल्याने शोभून दिसते, ज्या शीरावर विजयाचा मुकुट शोभायमान दिसतो, जे शीर समस्त प्रजाजनांसाठी अभिमानाची बाब आहे, ते शीर एका फकीर साधूसमोर तुम्हाला झुकवावेसे का वाटले. तुम्ही केवळ हात जोडून अभिवादन केले असते, तरीदेखील साधूंना मान मिळाला असता. परंतु साष्टांग नमस्कार हे अतिच होत नाही का?'

यावर सम्राट काहीच उत्तरले नाहीत. त्यांनी केवळ हसून वेळ मारून नेली. 

काही दिवसांनी सम्राटांनी चार पिशव्यांमध्ये चार प्राण्यांचे शीर कापून प्रधानाला दिले आणि एका पिशवीत मानवाचे खोटे शीर दिले. सम्राट म्हणाले, या पाचही पिशव्यांमधील शीर विकून रिकाम्या पिशव्या घेऊन ये.

प्रधान गोंधळला. परंतु प्रतिप्रश्न विचारायचे त्याचे धाडस होईना. त्याने त्या पिशव्या नेल्या. त्यातील प्राण्यांचे शीर विकले गेले, परंतु मानवाचे शीर घ्यायचे धाडस कोणीच करेना. प्रधान ती शीर घेऊन परत आला. त्याने सम्राटाला सांगितले, हे शीर घेण्यास कोणीच तयार नाही. आपल्यावर हत्येचा आळ येईल शिवाय मानवी शीर घेऊन काय उपयोग, असे म्हणत लोकांनी हे शीर नाकारले आहे, असे प्रधान म्हणाला.

यावर सम्राट अशोक म्हणाले, `काही दिवसांपूर्वी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले? नमस्काराच्या वेळी शीर का झुकवायचे ते कळले? कारण, एकमेव मानवी शीर असे आहे, जे अहंकारामुळे कोणापुढे झुकत नाही, वाकत नाही त्यामुळे ते देहापासून विलग झाल्यावर त्याला काही किंमत उरत नाही. ते देहावर असेपर्यंतच त्याला मान आहे. परंतु, आयुष्यात ज्ञानी, साधू, अनुभवी लोकांपुढे हे शीर झुकवले, तरच आशीर्वादाची प्राप्ती होते. माझ्या मृत्यूपश्चात माझे शीर संग्रही करून ठेवले, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणून ते योग्य वेळी, योग्य ठिकाणी झुकवले गेलेच पाहिजे!'

म्हणूनच म्हणतात ना, ज्याचे आचरण शुद्ध, त्याचेच चरण धरा आणि मस्तक नमवता येईल तिथेच नतमस्तक व्हा!