शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

साधू संत वैरागी आजही तपश्चर्येसाठी हिमालयातच का जातात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 15:04 IST

आजवर अनेक साधू संतांच्या तपश्चर्येमुळे ती भूमी भारित भूमी झाली आहे.

संसाराचा वीट आलेल्या संसारी मनुष्याच्या तोंडी 'मी हिमालयात निघून जातो' हे वाक्य हमखास येते. परंतु तिथे जाणे, राहणे आणि तपश्चर्या करणे हे काही साधे सोपे काम नाही. परंतु साधू संत तपश्चर्येसाठी हिमालयात जातात, हे आपण कायम ऐकत आलो आहोत. असे काय वैशिष्ट्य आहे तिथे की, हिमालयाला तपोभूमीचे स्वरूप यावे? चला जाणून घेऊया. 

तपश्चर्या करायची तर संसाराच्या व्यापातून दूर गेले पाहिजे. मोहापासून अलिप्त ठेवले पाहिजे. शांत वातावरणात मन एकाग्र केले पाहिजे. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी आणि कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी आजवर साधू संतांनी हिमालयाची निवड केली. हिमालय एवढा विशाल आणि विस्तीर्ण आहे की त्याच्या कुशीत अपेक्षित असलेला एकांत सहज गवसतो. तिथे गेलेले साधू संत तिथल्या गुहांमध्ये राहतात. या गुहा दिसायला छोट्याशा असल्या तरी साधू संतांसाठी ते त्यांचे छोटेसे विश्व असते. त्यांच्या तपश्चर्येमुळे हिमालयात ऊर्जेचे मोठे स्रोत तयार झाले आहेत.

हिमालयाचा काही भाग पर्यटनासाठी आहे तर काही भाग केवळ अध्यात्मिक, पारमार्थिक साधनेसाठी राखीव ठेवला गेला आहे. आजवर अनेक साधू संतांच्या तपश्चर्येमुळे ती भूमी भारित भूमी झाली आहे. याचा प्रत्यय घ्यायचा असेल, तर केदारनाथला अवश्य जा. अध्यात्मिक बैठक असलेली किंवा योगसाधना करणारी व्यक्ती, तिथे गेल्यावर तेथील स्पंदनं तुम्ही सहज अनुभवू शकते किंवा आत्मसात करू शकते. 

तुम्ही कितीही मोठे व्यक्तिमत्त्व असलात, तरी जेव्हा हिमालयासमोर जाता, तेव्हा स्वतःला अतिशय सूक्ष्म समजू लागता. ही विशालता हिमालयात आहे. तिथे गेल्यावर अहंकार आपोआप गळून पडतो. अध्यात्मिक पार्श्वभूमी असो वा नसो, मृत्यूपूर्वी प्रत्येकाने एकदा तरी हिमालय प्रत्यक्षात पाहिलाच पाहिजे, असे म्हणतात.