शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गा मातेचे 'हे' मंदिर भाविकांनी शापित का ठरवले? सूर्यास्तानंतर तिथे नेमके काय घडते? वाचा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 07:00 IST

देवास जिल्ह्यात असलेले हे दुर्गा मंदिर शापित मानले जाते. संध्याकाळनंतर येथे जाण्यास लोक घाबरतात. या मंदिराशी संबंधित अनेक कथा आहेत, जाणून घेऊया.

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे लोकांना सूर्यास्तानंतर जाण्याची परवानगी नाही. मात्र, त्यापैकी काही जागा आता पर्यटन स्थळं बनली आहेत. मात्र मध्य प्रदेशात देवीचे एक मंदिर आहे, जिथे लोक सूर्यास्तानंतर जायला घाबरतात. अनेकांना तिथे सूर्यास्तानंतर गेले असता चित्रविचित्र अनुभव आल्याचे म्हटले जाते. काय असेल त्यामागचे कारण? जाणून घेऊ. 

प्राचीन आणि ऐतिहासिक दुर्गामातेचे हे मंदिर मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात आहे. लोक संध्याकाळी या मंदिरात जायला घाबरतात. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, येथे अशा काही घटना घडल्या आहेत, ज्यामुळे लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. हे मंदिर तोडण्याचाही अनेकदा प्रयत्न झाला परंतु तो यशस्वी झाला नाही. 

दुर्गा मंदिराचे निर्माण 

पौराणिक कथेनुसार हे मंदिर देवासच्या महाराजांनी बांधले होते, परंतु मंदिर बांधल्यानंतर येथे अनेक अशुभ घटना घडत असत. या मंदिराशी संबंधित अनेक कथा आहेत, असे मानले जाते की राजघराण्याचा सेनापती आणि राजकुमारीची मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते. राजाचा या नात्याला नकार होता आणि तो त्यांच्या लग्नाच्या विरोधात होता. त्याने आपल्या मुलीला बंदिस्त ठेवले. सेनापतीचा विरह राजकन्येला सहन झाला नाही आणि अशातच तिचा मृत्यू झाला. राजकन्येच्या मृत्यूची बातमी कळताच सेनापतीनेही मंदिरातच प्राण त्याग केला. सेनापतीच्या मृत्यूनंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी महाराजांना मंदिर अपवित्र झाल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत या मंदिरातील जुन्या मूर्ती हटवून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात असा राजपुरोहितांनी सल्ला दिला. परंतु प्रयत्न करूनही तसे करणे शक्य झाले नाही. तेव्हापासून आजतागायत लोकांना त्या मंदिरात सायंकाळी आभास होतात. कोणाचा वावर असल्याचे जाणवते. अशा चित्रविचित्र अनुभवांमुळे लोकांनी त्या मंदिराला शापित मंदिर ठरवले. 

तसे असले तरी दिवसा त्या मंदिरात भाविकांची रीघ लागलेली असते. तिथे यज्ञ याग देखील केला जातो. स्थानिक लोक सांगतात, की चुकीच्या हेतूने तिथे दर्शनाला येणाऱ्या लोकांना काही ना काही त्रास होतो. याअर्थी ते जागृत देवस्थानही म्हटले जाते. मात्र जसजशी संध्याकाळ होते, तसतसा भाविकांचा वावर कमी होऊ लागतो आणि मंदिराच्या जवळपासही कोणीच फिरकत नाही. तिथे नक्की आभास होतात की आणखी काही, हे जाणून घेण्याचे वैज्ञानिक प्रयत्नही झाले, परंतु अजूनपर्यंत काहीच निष्कर्ष हाती लागलेले नाहीत!