शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'शांत हो श्रीगुरुदत्ता' ही करुणा त्रिपदी टेंबे स्वामींना का लिहावी लागली? वाचा त्यामागील गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 07:22 IST

श्रीदत्तगुरुंकडे करुणा भाकताना आपसूक करुणा त्रिदपीचे शब्द ओठावर येतात, ती का आणि कोणत्या अवस्थेत लिहिली व म्हटली गेली ते पाहणे महत्त्वाचे. 

आपण मंदिरात देव दर्शनाला जातो, पण ते सोडून सगळ्या चुकीच्या, वाईट गोष्टींकडे लक्ष देत बसतो. ज्या सोयी सुविधा नाहीत त्याबद्दल बोलतो. जिथे तामझाम असेल तिथे त्या प्रशस्ततेचे कौतुक करतो आणि या नादात ज्याच्या ओढीने आलो आहोत त्या भगवंताच्या दर्शनाला दुय्यम स्थान देतो. मात्र तिथे जे जसे आहे, जे काही घडते आहे ते सर्व देवाच्या साक्षीने घडत आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ते लक्षात ठेवले तर आपले लक्ष इतरत्र न जाता फक्त देवदर्शनाकडे जाईल आणि अन्य गोष्टी दुय्यम वाटू लागतील. याबाबतीत प.पु. श्री टेंबे स्वामी यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग सांगितला जातो तो असा-

एकदा श्री टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता, कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले. प्रसादाचे ताट पाहून तेथील पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले. तेंव्हा श्री टेंबे स्वामी फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले.

पुजा संपल्यावर, "श्री गुरु दत्तात्रेयांना"  गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले. त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्तात्रेयांनी दर्शन दिले नाही. ते बैचेन झाले. त्यांना कळले मी पुजा-याला टाकून बोललो म्हणून श्रीगुरु दत्तात्रेयांना राग आला असणार! तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तसेच त्यांच्या मुखातून करुणा त्रिपदीचे बोल बाहेर पडले.

"शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता" ।।

करुणा त्रिपदीचे हे बोल ऐकून श्री गुरु दत्तात्रेय  श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले. तेव्हा श्री टेंबे स्वामी म्हणाले, "देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजा-याने तो खाऊन टाकला".

तेव्हा श्री गुरु दत्ताञेयांनी प्रश्न केला, "इथे सत्ता कोणाची?

ह्या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, "देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते ". 

त्यावर श्री गुरु दत्तात्रेय म्हणाले, अरे, तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता, त्याच्या साठी मी ते ताट पाठवले होते. ते त्याने खाल्ले. त्यात तुझे काय गेले  त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्तात्रेय अंतर्धान पावले.

या अध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून, गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे. टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते. एका रागामुळे त्यांची ही अवस्था झाली.  आपण तर सामान्य माणस आपण जर राग आवरु शकलो नाही तर,  आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते. आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी, त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते, तिथे काय घडते ते पाहू नये. तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते. मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते. ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते. तेथे सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा.

श्री गुरुदेव!