शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

ब्रह्मदेवांकडून मृत्यूंजयाचे वरदान मिळूनही हिरण्यकश्यपूचा वध का आणि कसा झाला? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 08:00 IST

मृत्यू कोणालाही चुकलेला नाही, वाईट कर्म करणाऱ्याला तर नाहीच नाही!

हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू हे दोघे भाऊ. हिरण्याक्षाला विष्णूदेवाने मारलेले समजताच हिरण्यकश्यपूला राग आला आणि या रागामधून निष्पन्न काय झाले, तर स्वार्थासाठी ब्रह्मदेवाची भक्ती. मंदार पर्वतावर शंभर वर्षे नाव घेत बसलेल्या हिरण्यकश्यपूला अखेर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला हवा असणारा वर दिला, तो असा-

'रात्री किंवा दिवसा, घरात अथवा बाहेर, माणसाकडून अथवा जनावराकडून, जमिनीवर किंवा आकाशात आणि कोणत्याही शस्त्राने तुला मरण येणार नाही.' 

या वराने उन्मत्त झालेला हिरण्यकश्यपू गर्वाने देवांनाही त्रास देऊ लागला. विष्णूचे नाव काढील, त्याला कडक शिक्षा करू लागला. परंतु दैवगती तरी कशी असावी? याच हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद `नारायण नारायण' हा जप सतत करू लागला. योग्य समज देऊनही प्रल्हाद ऐकत नाही, हे पाहून हिरण्यकश्यपूने त्यालाही शिक्षा करावयास सुरुवात केली. समुद्रात फेक , आगीत टाक, कड्यावरून ढकलून दे, वगैरे भयानक उपाय अमलात आणूनही प्रल्हादाला काहीच इजा झाली नाही. त्याची विष्णुभक्ती चालूच राहिली. 

शेवटी एकदा हिरण्यकश्यपूने खांबावर जोरात लाथ मारली. त्याबरोबर खांब दुभंगला व त्यातून भगवान विष्णूंचे `नृसिंह' रूप बाहेर आले. तोंड व हात सिंहाचे, बाकी शरीर माणसाचे, अशा या रूपाने हिरण्यकश्यपूला मांडीवर ओढले व उंबरठ्यावर बसून नखाने त्या राक्षसी हिरण्यकश्यपूचा वध केला. ब्रह्मदेवाने दिलेल्या वराचा कोणत्याही प्रकारे अवमान न करता विष्णूने कार्यभाग साधला. ती वेळ संध्याकाळची होती. 

कर्मयोगे सकल मिळाली, येके स्थळी जन्मा आली,लहानथोर कोणीही असो, मृत्यू न म्हणे हा अमिरी नि हा भिकारी!

म्हणून समर्थ रामदास स्वामीदेखील मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात, 

जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला,परी शेवटी काळमुखी निमाला,महाथोर ते मृत्यूपंथेचि गेले,कितीएक ते जन्मले आणि मेले।।

मृत्यू कोणालाही चुकलेला नाही, वाईट कर्म करणाऱ्याला तर नाहीच नाही! म्हणून जेवढं आयुष्य मिळाले आहे, त्यात सत्कर्म करत चला.