शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

ब्रह्मदेवांकडून मृत्यूंजयाचे वरदान मिळूनही हिरण्यकश्यपूचा वध का आणि कसा झाला? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 08:00 IST

मृत्यू कोणालाही चुकलेला नाही, वाईट कर्म करणाऱ्याला तर नाहीच नाही!

हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू हे दोघे भाऊ. हिरण्याक्षाला विष्णूदेवाने मारलेले समजताच हिरण्यकश्यपूला राग आला आणि या रागामधून निष्पन्न काय झाले, तर स्वार्थासाठी ब्रह्मदेवाची भक्ती. मंदार पर्वतावर शंभर वर्षे नाव घेत बसलेल्या हिरण्यकश्यपूला अखेर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला हवा असणारा वर दिला, तो असा-

'रात्री किंवा दिवसा, घरात अथवा बाहेर, माणसाकडून अथवा जनावराकडून, जमिनीवर किंवा आकाशात आणि कोणत्याही शस्त्राने तुला मरण येणार नाही.' 

या वराने उन्मत्त झालेला हिरण्यकश्यपू गर्वाने देवांनाही त्रास देऊ लागला. विष्णूचे नाव काढील, त्याला कडक शिक्षा करू लागला. परंतु दैवगती तरी कशी असावी? याच हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद `नारायण नारायण' हा जप सतत करू लागला. योग्य समज देऊनही प्रल्हाद ऐकत नाही, हे पाहून हिरण्यकश्यपूने त्यालाही शिक्षा करावयास सुरुवात केली. समुद्रात फेक , आगीत टाक, कड्यावरून ढकलून दे, वगैरे भयानक उपाय अमलात आणूनही प्रल्हादाला काहीच इजा झाली नाही. त्याची विष्णुभक्ती चालूच राहिली. 

शेवटी एकदा हिरण्यकश्यपूने खांबावर जोरात लाथ मारली. त्याबरोबर खांब दुभंगला व त्यातून भगवान विष्णूंचे `नृसिंह' रूप बाहेर आले. तोंड व हात सिंहाचे, बाकी शरीर माणसाचे, अशा या रूपाने हिरण्यकश्यपूला मांडीवर ओढले व उंबरठ्यावर बसून नखाने त्या राक्षसी हिरण्यकश्यपूचा वध केला. ब्रह्मदेवाने दिलेल्या वराचा कोणत्याही प्रकारे अवमान न करता विष्णूने कार्यभाग साधला. ती वेळ संध्याकाळची होती. 

कर्मयोगे सकल मिळाली, येके स्थळी जन्मा आली,लहानथोर कोणीही असो, मृत्यू न म्हणे हा अमिरी नि हा भिकारी!

म्हणून समर्थ रामदास स्वामीदेखील मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात, 

जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला,परी शेवटी काळमुखी निमाला,महाथोर ते मृत्यूपंथेचि गेले,कितीएक ते जन्मले आणि मेले।।

मृत्यू कोणालाही चुकलेला नाही, वाईट कर्म करणाऱ्याला तर नाहीच नाही! म्हणून जेवढं आयुष्य मिळाले आहे, त्यात सत्कर्म करत चला.