शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

समस्त प्रवाशांवर 'काळ आला होता पण वेळ नाही' कशामुळे आणि कोणामुळे? वाचा सुंदर कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 14:42 IST

आपल्या मागेही अनेकांच्या सद्भावना असतात त्यामुळे कोणाशी कधीही वैर ठेवू नका... कोणावर कोणती वेळ येईल सांगता येत नाही!

एकदा काही प्रवासी एका प्रवासी बसमधून तीर्थक्षेत्री दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागले होते. गप्पा, गोष्टी, गाणी, भजन, कीर्तन, खाऊ, थट्टा, मस्करी करत प्रवास मजेने सुरू होता. सगळे जण इतके रमले होते, की रात्र होऊनही कोणाच्याही डोळ्यावर झोप नव्हती. 

एकाएक वादळ सुरू झाले. सोसाट्याचा वारा सुटला. बसची गती आपोआप धिमी झाली. ड्रायव्हर प्रखर लाईटच्या प्रकाशात सांभाळून गाडी चालवत होता. अचानक वीज कडाडली. पावसाळी ऋतू नसूनही अवकाळी पाऊस सुरू झाला. वीजांचा कडकडाट, लखलखाट आणि निसर्गाचे एकूणच रौद्र रूप पाहून बसमधले प्रवासी घाबरल़े सगळे जण देवाचा धावा करू लागले. एक दोनदा तर वीज येऊन बसच्या पायथ्याशी कोसळली. थोडक्यात सगळे बचावले. ड्रायव्हरने बस थांबवली.

तो प्रवाशांसमोर आला आणि म्हणाला, पुढचा प्रवास अतिशय धोक्याचा वाटत आहे. परंतु दोनदा बसच्या दाराशी येऊन वीज पडली, ती पाहता माझ्या मनात एक शंका येत आहे. ती अशी, की आपल्यापैकी कोणा एकाचा मृत्यू निश्चित आहे. त्याच्यामुळे सर्वांवर संकट ओढावत आहे. ज्याचा मृत्यू आहे, तो जर या बसमधून उतरला, तर उर्वरित सर्वांचे प्राण वाचू शकतील.

ड्रायव्हरच्या बोलण्याने सगळेच घाबरले. एकाने शंका उपस्थित केली, की नेमका कोणाचा मृत्यू आहे, हे कळणार कसे? 

ड्रायव्हर म्हणाला, 'माझ्यासकट सगळ्यांनी एक एक करून बसमधून खाली उतरावे आणि काही अंतरावर एक झाड आहे, त्या झाडाला हात लावून बसमध्ये परत याव़े' सर्वांनी त्याचे म्हणणे मान्य केले. बसमधले प्रवासी भितभितच उतरले आणि चिंब पावसात भिजत जाऊन एक एक करून झाडाला हात लावून आले. 

जवळपास सगळे प्रवासी झाले. अगदी ड्रायव्हर आणि कंडेक्टरसुद्धा! शेवटचा एक प्रवासी कोपऱ्यात बसला होता. सगळ्यांच्या माना त्याच्याकडे वळल्या. त्याला उतरणे भाग होते. ज्याअर्थी सगळे जण वाचले, त्याअर्थी आज आपला मृत्यू निश्चित! परंतु आपल्या जाण्याने बाकीच्यांचे प्राण वाचतील, या विचाराने तो शेवटचा प्रवासी दबक्या पावलांनी उतरत झाडाला स्पर्श करायला गेला. तेवढ्यात जोरात वीज कडाडली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले...

झाडाला स्पर्श करायला गेलेला प्रवासी एकटा उरला आणि बसवर वीज कोसळून सगळे प्रवासी जागीच बेचिराख झाले. याचाच अर्थ, त्या एका प्रवाशाच्या पुण्याईने इतका वेळ अन्य प्रवाशांना मृत्यूच्या दाढेत जाण्यापासून रोखले होते. तो दूर जाताच, काळाने घात केला. 

या बोधकथेतून तात्पर्य हेच आहे, की आपले संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांचे दोष शोधण्यात संपवू नका. ज्यांना आपण आपला शत्रू समजतो, कधी कधी त्यांच्याच सदिच्छा आपल्या कामी येतात. म्हणून सर्वांशी नेहमी मित्रत्त्वाने वागा आणि दोष दूर करायचेच असतील, तर स्वत:मधले करा.