शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समस्त प्रवाशांवर 'काळ आला होता पण वेळ नाही' कशामुळे आणि कोणामुळे? वाचा सुंदर कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 14:42 IST

आपल्या मागेही अनेकांच्या सद्भावना असतात त्यामुळे कोणाशी कधीही वैर ठेवू नका... कोणावर कोणती वेळ येईल सांगता येत नाही!

एकदा काही प्रवासी एका प्रवासी बसमधून तीर्थक्षेत्री दर्शन घेऊन परतीच्या वाटेला लागले होते. गप्पा, गोष्टी, गाणी, भजन, कीर्तन, खाऊ, थट्टा, मस्करी करत प्रवास मजेने सुरू होता. सगळे जण इतके रमले होते, की रात्र होऊनही कोणाच्याही डोळ्यावर झोप नव्हती. 

एकाएक वादळ सुरू झाले. सोसाट्याचा वारा सुटला. बसची गती आपोआप धिमी झाली. ड्रायव्हर प्रखर लाईटच्या प्रकाशात सांभाळून गाडी चालवत होता. अचानक वीज कडाडली. पावसाळी ऋतू नसूनही अवकाळी पाऊस सुरू झाला. वीजांचा कडकडाट, लखलखाट आणि निसर्गाचे एकूणच रौद्र रूप पाहून बसमधले प्रवासी घाबरल़े सगळे जण देवाचा धावा करू लागले. एक दोनदा तर वीज येऊन बसच्या पायथ्याशी कोसळली. थोडक्यात सगळे बचावले. ड्रायव्हरने बस थांबवली.

तो प्रवाशांसमोर आला आणि म्हणाला, पुढचा प्रवास अतिशय धोक्याचा वाटत आहे. परंतु दोनदा बसच्या दाराशी येऊन वीज पडली, ती पाहता माझ्या मनात एक शंका येत आहे. ती अशी, की आपल्यापैकी कोणा एकाचा मृत्यू निश्चित आहे. त्याच्यामुळे सर्वांवर संकट ओढावत आहे. ज्याचा मृत्यू आहे, तो जर या बसमधून उतरला, तर उर्वरित सर्वांचे प्राण वाचू शकतील.

ड्रायव्हरच्या बोलण्याने सगळेच घाबरले. एकाने शंका उपस्थित केली, की नेमका कोणाचा मृत्यू आहे, हे कळणार कसे? 

ड्रायव्हर म्हणाला, 'माझ्यासकट सगळ्यांनी एक एक करून बसमधून खाली उतरावे आणि काही अंतरावर एक झाड आहे, त्या झाडाला हात लावून बसमध्ये परत याव़े' सर्वांनी त्याचे म्हणणे मान्य केले. बसमधले प्रवासी भितभितच उतरले आणि चिंब पावसात भिजत जाऊन एक एक करून झाडाला हात लावून आले. 

जवळपास सगळे प्रवासी झाले. अगदी ड्रायव्हर आणि कंडेक्टरसुद्धा! शेवटचा एक प्रवासी कोपऱ्यात बसला होता. सगळ्यांच्या माना त्याच्याकडे वळल्या. त्याला उतरणे भाग होते. ज्याअर्थी सगळे जण वाचले, त्याअर्थी आज आपला मृत्यू निश्चित! परंतु आपल्या जाण्याने बाकीच्यांचे प्राण वाचतील, या विचाराने तो शेवटचा प्रवासी दबक्या पावलांनी उतरत झाडाला स्पर्श करायला गेला. तेवढ्यात जोरात वीज कडाडली आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले...

झाडाला स्पर्श करायला गेलेला प्रवासी एकटा उरला आणि बसवर वीज कोसळून सगळे प्रवासी जागीच बेचिराख झाले. याचाच अर्थ, त्या एका प्रवाशाच्या पुण्याईने इतका वेळ अन्य प्रवाशांना मृत्यूच्या दाढेत जाण्यापासून रोखले होते. तो दूर जाताच, काळाने घात केला. 

या बोधकथेतून तात्पर्य हेच आहे, की आपले संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांचे दोष शोधण्यात संपवू नका. ज्यांना आपण आपला शत्रू समजतो, कधी कधी त्यांच्याच सदिच्छा आपल्या कामी येतात. म्हणून सर्वांशी नेहमी मित्रत्त्वाने वागा आणि दोष दूर करायचेच असतील, तर स्वत:मधले करा.