शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

ज्याची शिकण्याची तयारी आहे त्याला दत्त गुरूंची सदैव साथ आहे- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 07:00 IST

गुरु शोधण्याआधी तुम्ही चांगले शिष्य बना, गुरु आपोआप तुमच्या ओढीने येतील, तुम्हाला भेटतील आणि तुमचा उद्धारही करतील!

ज्याची शिकण्याची तयारी आहे, तो शिष्य आणि ज्याची शिकवण्याची तयारी आहे, तो गुरु. अशी गुरु-शिष्याची साधी, सोपी, सरळ व्याख्या आहे. भारतात तर गुरु-शिष्य परंपरा अतिशय  मोठी आहे. आपल्यालाही आयुष्यात गुरु लाभावेत, असे वाटते, परंतु, आजच्या भोंदू बाबांच्या आणि स्वयंघोषित गुरुंच्या दुनियेत सच्चा गुरु कसा शोधावा, याचे मार्गदर्शन गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनातून मिळते. 

गोंदवलेकर महाराज म्हणतात, `व्यवहारात आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको, असे म्हणून कसे चालेल? गुरु मिळण्यासाठी आधी शिष्य तयार होणे गरजेचे आहे. शिष्य तयार झाला, की गुरु त्याचा शोध घेत आपोआप येतील. गुरुंच्या भेटीआधी शिष्याचा अभिमान दूर झाला पाहिजे. अभिमान गेल्याशिवाय देव भेटत नाही, म्हणून अभिमान घालवण्यासाठी आणि सन्मार्ग दाखवण्यासाठी गुरु हवा.  म्हणून तर, संत नामदेवांनासुद्धा अहंकार झाला असता, मुक्ताईने त्यांना गुरु करण्याचा सल्ला दिला. तेव्हा कुठे, नामदेवांनी गुरुचा शोध घेतला आणि गुरुंच्या आशीर्वादाने त्यांचा पांडुरंग नव्याने भेटला. 

गुरु कसे ओळखावे?

गुरवो बहव: सन्ति, शिष्य वित्त: पहारका,गुरवो विरल: सन्ति, शिष्य हृत्त: पहारका।।

वरील सुभाषितात, गुरु कोणाला म्हणावे, याची छान व्याख्या दिली आहे. शिष्याच्या धनावर, संपत्तीवर, पैशांवर डोळा ठेवून त्यांना लुटणारे, अनेक गुरु असतात. ते शिष्याचे वित्तहरण करतात. मात्र, खरे गुरु शिष्याचे हृत्त, अर्थात हृदयाचे हरण करतात. असे गुरु अतिशय विरळ म्हणजे कमी असतात. म्हणून आपण ज्यांना गुरु मानतो ते आपले वित्त घेतात, की चित्त, हे आपण तपासून पहायला हवे.

जो शिष्याला विषयात ओढील, त्याला गुरु कसे म्हणावे? जो चमत्कार करुन दाखवतो, त्याला आपण बुवा म्हणतो, पण तो गुरु नाही. गुरुंची परीक्षा त्यांच्या बाह्यांगावरून करावी. सर्वाभूती भगवंत ज्याला पाहता येईल, त्यांना गुरु म्हणावे. गुरुंच्या संगतीत मनावर जो परिणाम होईल, त्यावरून गुरुंची परीक्षा करावी. ज्यांच्या सहवासात मन निर्विकार होईल, त्यांना गुरु म्हणावे. 

शिष्याच्या जोरावर जे मोठे होऊ पाहतात, ते गुरु नाहीत, तर जे आपल्या शिष्याला मोठे करतात, त्यांना गुरु म्हणावे. आध्यात्म मार्गात असे गुरु लाभणे अवघड, परंतु ज्यांना असे गुरु लाभतात, त्यांचा भगवद्प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. असे गुरु लाभले असता, शिष्याने गुरुंच्या आज्ञेचे पालन करावे. 

शास्त्रे आणि वेद अनंत आहेत. ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे? सद्गुरु नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार आपल्याला देतात. म्हणून गुरुप्राप्तीचा सदैव ध्यास हवा.