शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

जेव्हा वाटते की आपली वेळ खराब आहे, तेव्हा वेळेलाही थोडा वेळ द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 12:08 IST

चांगल्या वेळेची आपण सगळेच वाट बघत असतो, पण ती वेळ येण्यासाठी थांबण्याची आपली तयारी नसते. त्यासाठी लांगणारा संयम अंगी बाणला, तर ती वेळही नक्कीच येईल. हेच शिकवणारी छोटीशी गोष्ट!

एका शिष्याने आपल्या गुरुजींना सांगितले, `गुरुजी मी खूप प्रयत्न करूनही मला कशातच यश मिळत नाहीये. काहीतरी उपाय सुचवा, जेणेकरून माझी चांगली वेळ येईल, मलाही चांगले दिवस दिसतील.'

गुरुजी आपल्या शिष्याला घेऊन फेरफटका मारायला बाहेर पडले. शिष्याला वाटले, गुरुजी काहीतरी उपाय सुचवतील. पण तसे झाले नाही. बराच वेळ झाला तरी गुरुजी मुद्द्याचे सोडून अवांतर गोष्टी बोलत होते. मात्र त्याकडे शिष्याचे लक्ष लागेना. तो ऐकल्यासारखे करत मान डोलवत होता. हे गुरुजींच्याही लक्षात आले. 

चालता चालता त्यांनी बरेच अंतर कापले होते. गुरुजी शिष्याला म्हणाले, 'मला तहान लागली आहे, जवळच एक नदी आहे, तिथून माझ्यासाठी प्यायला पाणी घेऊन येशील का? तोवर मी इथे झाडाच्या सावलीत बसतो.' 

शिष्य लगेच हो म्हणाला. तो नदीच्या शोधात निघाला आणि गावकऱ्यांना विचारत विचारत नदीवर पोहोचला. तिथे जाऊन पाहिले, तर नदीवर बायका धुणे धुत होत्या. गडीमाणसं जनावरं धुत होती. लहान मुलं आंघोळ करत होती. असे गढुळ पाणी आपल्या गुरुजींना प्यायला कसे बरे द्यावे? या विचारात तो मान खाली घालून परत आला. गुरुजींना म्हणाला, 'गुरुजी ते पाणी पिण्यालायक नव्हते, म्हणून मी आणू शकलो नाही. क्षमा करा!'गुरुजी म्हणाले, हरकत नाही. चालून दोघेही दमलो आहोत. तूही इथे सावलीत थोड्या वेळ बस मग परतीच्या वाटेने जाऊ. 

गुरुजींनी पुन्हा अवांतर विषयावर चर्चा सुरू केली. शिष्यही मान डोलवत ऐकल्यासारखे करू लागला. काही वेळाने गुरुजींनी शिष्याला पुन्हा एकदा नदीवर जाऊन पाणी आण सांगितले. गुरुजींची आज्ञा मोडणे शक्य नसल्यामुळे शिष्य परत नदीवर गेला. तिथे जाऊन पाहिले, तर नदीचे पाणी शांत झाले होते. स्थिर झाले होते. सगळा गाळ खाली बसला होता. त्यामुळे नदीतले दगड गोटेही लख्ख दिसत होते. सूर्याची किरणे पडून पाणी चकाकत होते. ते पाहून शिष्याचा विश्वासच बसला नाही, मगाशी पाहिलेले गढूळ पाणी हेच होते का? त्याने पानांचा द्रोण तयार केला आणि त्यात पाणी भरून तो गुरुजींसाठी घेऊन आला.

गुरुजींनी विचारले, `हे त्याच नदीचे पाणी आहे का? जिला तू मगाशी गढूळ म्हणालास?''हो गुरुजी, मगाशी ते पाणी पिण्यालायक नव्हते. आता नदीवर कोणी नव्हते त्यामुळे गाळ खाली बसला. म्हणून वरवरचे स्वच्छ पाणी मी आणू शकलो.' -शिष्यगुरुजी म्हणाले, `मग तुलाही तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले? गढूळ वाटणारे पाणी काही काळ गेल्यावर जर शुद्ध, स्वच्छ दिसू शकते, तशी वाईट वाटणारी वेळ काही काळ गेल्यावर निश्चितपणे चांगली वाटू लागेल. त्यासाठी वेळेलाही थोडा वेळ दे, मग चांगली वेळही येईल हे नक्की!'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी