शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

देवाचे स्मरण करताना आधी मुखात नाम यायला हवे की डोळ्यासमोर रूप?

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 6, 2021 13:42 IST

एखाद्या व्यक्तीचे नाव काढताच आपल्याला त्याचे रूप डोळ्यासमोर येते. पण कधी? जेव्हा त्या व्यक्तीला आपण पाहिलेले असते. मात्र, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतही नाही, तेव्हा आपण आधी नाम विचारून घेतो आणि मग रूप पाहण्याचा प्रयत्न करतो. 

ज्योत्स्ना गाडगीळ

हरिपाठाच्या सुरुवातीला दोन मुख्य अभंग म्हटले जातात. त्यातला एक आहे ध्यानाचा आणि दुसरा आहे रूपाचा! ते अभंग म्हणजे 'सुंदर ते ध्यान' आणि 'रूप पाहता लोचनी'. या अभंगात सुंदर ध्यान या अभंगाला ध्यानाचा आणि रूप पाहता लोचनी या अभंगाला रूपाचा अभंग म्हटले आहे. मात्र त्यातील वर्णन नीट ऐकले, तर ते परस्परविरुद्ध आहे, हे आपल्याला लक्षात येईल. सुंदर ते ध्यान हा ध्यानाचा अभंग असून त्यात पांडुरंगाच्या रूपाचे वर्णन आढळते, तर रूप पाहता लोचनी अभंगात पांडुरंगाकडे ध्यान लावल्यावर होणारा आनंद व्यक्त केला आहे. याचाच अर्थ रूप आणि ध्यान या दोन्ही गोष्टी नामावर अवलंबून आहेत. 

हेही वाचा : माणसाचे खरे आयुष्य किती? वाचा ही बोधकथा!

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, 'नाम आधीही होते आणि नंतरही राहणार आहे. नाम रुपाला व्यापून असते. राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकींनी रामायण लिहिले होते. रामाने मागाहून जन्म घेऊन तसे आचरण करून दाखवले. म्हणजेच राम अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होते आणि रामाच्या अस्तित्वानंतरही नाम शिल्लक राहिले. म्हणजे नाम हे देश काल मर्यादेच्या पलीकडे असते आणि रूपापेक्षा सत्य असते. म्हणून रूपापेक्षा नामाला अधिक महत्त्व दिले पाहिजे. 

एखाद्या व्यक्तीचे नाव काढताच आपल्याला त्याचे रूप डोळ्यासमोर येते. पण कधी? जेव्हा त्या व्यक्तीला आपण पाहिलेले असते. मात्र, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण ओळखतही नाही, तेव्हा आपण आधी नाम विचारून घेतो आणि मग रूप पाहण्याचा प्रयत्न करतो. 

सगुण भक्ती करताना देवाचे नाम घेताच आपल्या डोळ्यासमोर भगवंताची मूर्ती उभी राहते. परंतु निर्गुण भक्तीत सर्वव्यापी परमेश्वर ही संकल्पना मानली जाते. सगुण भक्ती कशासाठी, तर आपले चित्त भक्तीमार्गात स्थिर व्हावे, यासाठी! ज्याप्रमाणे गणिताची उकल करताना आपल्याला 'क्ष' ची मदत होते. त्याप्रमाणे अध्यात्माची उकल करताना भगवंताची मूर्ती अर्थात त्याचे रूप किंवा ध्यान डोळ्यासमोर ठेवण्यास मदत होते. मात्र गोंदवलेकर महाराज सांगतात, रूपाचा विचार करताना मन त्यात अडकते, रूपाच्या पलीकडे असलेला परमेश्वर पाहायचा असेल, तर नामाला पर्याय नाही. म्हणून रूप डोळ्यासमोर असो न असो, सर्वत्र व्यापून राहिलेल्या  परमेश्वराला साक्षी ठेवून नामस्मरण सुरू करा. 

हेही वाचा : नामासाठी चित्त एकाग्र होणे महत्त्वाचे नाही, तर चित्त एकाग्र होण्यासाठी नाम घ्यावे!