शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जे आहे, ते बदलेलच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 05:08 IST

एक साधा प्रश्न नेहेमी आपल्या मनात ठेवावा. कोणताही प्रसंग समोर आला (त्रास देणारा किंवा आनंदी करणारा) की हळूच आपल्या मनाला विचारावे.. ‘यामागे नक्की कुठला आशीर्वाद असेल बरं?

- धनंजय जोशीझेन साधनेतले सौंदर्य म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टींमधून आपल्याला शिकवण मिळून जाते. बुद्धाने सांगितले होते, सतत सर्व काही बदलत जात असते.. काहीच स्थायी नाही.त्याला इंग्लिश शब्द आहे ‘इम्पर्मनन्स’! आपण जर नीट लक्ष देऊन बघितले तर आपल्याला ते सहज समजून येईल. समजा आपण सकाळी कामाला निघालो आणि वाटेत एक छानपैकी ट्रॅफिक जॅम लागला. गाडी अडकलेली ट्रॅफिकमध्ये ! आपल्या मनामध्ये काय काय विचार येत असतील ते बघावे. आधी राग येतो. का?- हे माझ्याच वाट्याला का, अशा विचाराने ! मग आपल्या पुढे असलेला ड्रायव्हर गाडी इतक्या हळू का चालवतोय म्हणून आणखी राग ! एक ना दोन विचारांची माळ लागून जात असते. पण या रागाने तडतडण्यामागचे खरे कारण काय?- तर, जे आहे ते स्वीकारून आपण शांत बसू शकत नाही, हे ! हा ट्रॅफिक जॅम कायम असणार नाही हे साधे सत्य आपण का समजून घेत नाही? अशा वेळी माझे गुरु सांगायचे, ‘जस्ट फोकस आॅन युअर ब्रेथ - फक्तश्वासाकडे लक्ष द्यावे, आपल्या मनामध्ये जे काही विचार येत असतील त्यांच्याकडे बघावे. मग आपल्याला आपोआप समजून येईल, ‘अरे, हे सगळे केव्हातरी बदलणार. मग मीच माझ्या मनाला उगाचच त्रास कशाला करून घेऊ? बघूया तरी पुढे काय होते ते !’- असे म्हटले, तर आपण स्वत:कडे बघून हसू लागतो. माझे गुरु सांगायचे, ‘प्रत्येक अनुभवामागे एक सुंदर शिकवण असते. त्याला आपण एक प्रकारचा आशीर्वाद मानायचा असतो. मग तो अनुभव कितीही कठीण, त्रासदायक, मनाला निराश करणारा, गोंधळून टाकणारा असो ! तो अनुभव म्हणजे वर्तमानाचे खरे स्वरूप - ‘इम्पर्मनन्स’ - समजून घेण्याची आणि आत्मसात करण्याची संधी असते!’एक साधा प्रश्न नेहेमी आपल्या मनात ठेवावा. कोणताही प्रसंग समोर आला (त्रास देणारा किंवा आनंदी करणारा) की हळूच आपल्या मनाला विचारावे..‘यामागे नक्की कुठला आशीर्वाद असेल बरं?