शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

कठीण काळात तुम्ही काय निर्णय घेता; यावर तुमचे भविष्य ठरते...!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: April 2, 2021 14:19 IST

दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करू नका. दिवस बदलतात. चांगलेही आणि वाईटही...अशा वेळी तटस्थ राहणे इष्ट!

समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधुनि पाहे...!' या जगात सुखी कोणीच नाही. प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेतच. काही जण समस्येला धैर्याने तोंड देतात, तर काही जण कच खातात. अशा परिस्थितीत कोणाचा निभाव लागतो? हे या बोधकथेतून शिकूया.

एका शाळेतला एक विद्यार्थी अतिशय गरीब असतो. स्वमेहनतीने कमवून, घराचे पालन पोषण करून, शिक्षण घेत असतो. बालवयातच अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर पडल्यामुळे तो पोक्त झालेला असतो. या जबाबदाऱ्या, हे प्रश्न, संकटं संपणार आहेत की नाही? मी इतर मुलांसारखे आनंदी जीवन जगू शकणार आहे की नाही, अशा विचाराने तो खूप रडतो. कोणाशीतरी मनमोकळेपणाने बोलावे, असे त्याला वाटू लागते. 

त्याच्या शाळेत गणिताचे शिक्षक त्याला खूप आवडत. तो एकदा शाळा सुटल्यावर शिक्षकांना भेटला. म्हणाला, `सर, तुमच्याशी थोडं वैयक्तिक बोलायचे आहे.' शिक्षकांनी त्याच्या बोलण्याचा अंदाज घेतला आणि त्याला म्हणाले, माझ्या घरी चल, तिथे निवांत बसून बोलू.

मुलगा शिक्षकांबरोबर घरी गेला. शिक्षकांनी त्याला बोलते केले. तो आपल्या आयुष्यात एकामागोमाग एक आलेल्या संकटांबद्दल, जबाबदाऱ्यांबद्दल सांगू लागला. आपल्याला इतर मुलांसारखे आनंदाने जगता येईल का, असे आशेने विचारत होता. 

शिक्षक मध्येच उठले. स्वयंपाकघरात गेले. मुलालाही त्यांनी आत बोलावले. तो बोलत होता. शिक्षकांनी गॅस सुरू करून तीन शेगड्यांवर तीन पातेली ठेवली. मुलाला वाटले, ते आपल्यासाठी काही बनवत आहेत. शिक्षक त्याचे बोलणे ऐकता ऐकता काम करत होते. तीन पातेल्यात सारख्या प्रमाणात पाणी टाकून एकात बटाटा, दुसऱ्यात अंडे आणि तिसऱ्यात कॉफीच्या बिया त्यांनी टाकल्या. 

काही वेळाने पाणी उकळू लागले. मुलगा आपल्या समस्येतून काही उत्तर मिळेल का याची वाट बघत होता. शिक्षक गप्प होते. पाणी पूर्ण उकळल्यावर त्यांनी तिनही गॅस बंद केले आणि तिन्ही गोष्टी ताटात काढल्या. त्यांनी मुलाला त्या वस्तूंना स्पर्श करायला सांगितला. म्हणाले, `तुला काय जाणवते का सांग? यातच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे.'

मुलगा चक्रावला. त्याने हात लावून पाहिले. पण उत्तर त्याला कळेना. त्याने शिक्षकांना उत्तराची उकल करायला सांगितले. 

शिक्षक हसून म्हणाले, `बाळा, या तीनही पातेल्यात समान तपमानात पाणी उकळत होते. परंतु त्यात तीन पदार्थ वेगळे होते. त्या तिघांनी आपल्या क्षमतेनुसार प्रतिसाद दिला आणि त्यांच्याशी काय घडले, ते तुझ्यासमोर आहे. बटाटा उकडल्यामुळे मऊ पडला, अंडे कडक झाले, कॉफीच्या बियांचा सुगंध दरवळू लागला. 

त्याचप्रमाणे बाकीच्या मुलांच्या आयुष्याशी तू तुलना करू नकोस. तुझ्या मेहनतीचा दरवळ या कॉफीच्या बियांसारखा दुसऱ्यांना आनंद देणारा आहे. एवढ्या कठीण काळात स्वत: वितळून दुसऱ्यांना सुगंध देण्याची क्षमता फार थोड्या लोकांमध्ये असते, ती तुझ्यात आहे. दु:खाचे, कष्टाचे दिवस आज ना उद्या संपतील, पण तुझ्या स्वभावाचा दरवळ तू कायम ठेव.