शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कठीण काळात तुम्ही काय निर्णय घेता; यावर तुमचे भविष्य ठरते...!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: April 2, 2021 14:19 IST

दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करू नका. दिवस बदलतात. चांगलेही आणि वाईटही...अशा वेळी तटस्थ राहणे इष्ट!

समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 'जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधुनि पाहे...!' या जगात सुखी कोणीच नाही. प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेतच. काही जण समस्येला धैर्याने तोंड देतात, तर काही जण कच खातात. अशा परिस्थितीत कोणाचा निभाव लागतो? हे या बोधकथेतून शिकूया.

एका शाळेतला एक विद्यार्थी अतिशय गरीब असतो. स्वमेहनतीने कमवून, घराचे पालन पोषण करून, शिक्षण घेत असतो. बालवयातच अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर पडल्यामुळे तो पोक्त झालेला असतो. या जबाबदाऱ्या, हे प्रश्न, संकटं संपणार आहेत की नाही? मी इतर मुलांसारखे आनंदी जीवन जगू शकणार आहे की नाही, अशा विचाराने तो खूप रडतो. कोणाशीतरी मनमोकळेपणाने बोलावे, असे त्याला वाटू लागते. 

त्याच्या शाळेत गणिताचे शिक्षक त्याला खूप आवडत. तो एकदा शाळा सुटल्यावर शिक्षकांना भेटला. म्हणाला, `सर, तुमच्याशी थोडं वैयक्तिक बोलायचे आहे.' शिक्षकांनी त्याच्या बोलण्याचा अंदाज घेतला आणि त्याला म्हणाले, माझ्या घरी चल, तिथे निवांत बसून बोलू.

मुलगा शिक्षकांबरोबर घरी गेला. शिक्षकांनी त्याला बोलते केले. तो आपल्या आयुष्यात एकामागोमाग एक आलेल्या संकटांबद्दल, जबाबदाऱ्यांबद्दल सांगू लागला. आपल्याला इतर मुलांसारखे आनंदाने जगता येईल का, असे आशेने विचारत होता. 

शिक्षक मध्येच उठले. स्वयंपाकघरात गेले. मुलालाही त्यांनी आत बोलावले. तो बोलत होता. शिक्षकांनी गॅस सुरू करून तीन शेगड्यांवर तीन पातेली ठेवली. मुलाला वाटले, ते आपल्यासाठी काही बनवत आहेत. शिक्षक त्याचे बोलणे ऐकता ऐकता काम करत होते. तीन पातेल्यात सारख्या प्रमाणात पाणी टाकून एकात बटाटा, दुसऱ्यात अंडे आणि तिसऱ्यात कॉफीच्या बिया त्यांनी टाकल्या. 

काही वेळाने पाणी उकळू लागले. मुलगा आपल्या समस्येतून काही उत्तर मिळेल का याची वाट बघत होता. शिक्षक गप्प होते. पाणी पूर्ण उकळल्यावर त्यांनी तिनही गॅस बंद केले आणि तिन्ही गोष्टी ताटात काढल्या. त्यांनी मुलाला त्या वस्तूंना स्पर्श करायला सांगितला. म्हणाले, `तुला काय जाणवते का सांग? यातच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे.'

मुलगा चक्रावला. त्याने हात लावून पाहिले. पण उत्तर त्याला कळेना. त्याने शिक्षकांना उत्तराची उकल करायला सांगितले. 

शिक्षक हसून म्हणाले, `बाळा, या तीनही पातेल्यात समान तपमानात पाणी उकळत होते. परंतु त्यात तीन पदार्थ वेगळे होते. त्या तिघांनी आपल्या क्षमतेनुसार प्रतिसाद दिला आणि त्यांच्याशी काय घडले, ते तुझ्यासमोर आहे. बटाटा उकडल्यामुळे मऊ पडला, अंडे कडक झाले, कॉफीच्या बियांचा सुगंध दरवळू लागला. 

त्याचप्रमाणे बाकीच्या मुलांच्या आयुष्याशी तू तुलना करू नकोस. तुझ्या मेहनतीचा दरवळ या कॉफीच्या बियांसारखा दुसऱ्यांना आनंद देणारा आहे. एवढ्या कठीण काळात स्वत: वितळून दुसऱ्यांना सुगंध देण्याची क्षमता फार थोड्या लोकांमध्ये असते, ती तुझ्यात आहे. दु:खाचे, कष्टाचे दिवस आज ना उद्या संपतील, पण तुझ्या स्वभावाचा दरवळ तू कायम ठेव.