शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

खरे सौंदर्य कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:11 IST

मूर्ख केवळ बाह्यसौंदर्य पाहतात; पण विद्वान मात्र आंतरिक सौंदर्याला पाहतात. आज आपणही कदाचित हेच करत आहोत, नाही का?

- नीता ब्रह्मकुमारीआजचे युग स्पर्धेचे आहे. अनेक स्पर्धांमध्ये मनुष्य कळत-नकळत भाग घेत आहे. रूप आणि रूपया या दोघांची स्पर्धा अधिकच दिसून येते. आज व्यक्तीची पसंद आणि ओळख या दोन गोष्टींनीच केली जाते. कधीकाळी एखाद्या व्यक्तीची निवड त्याच्या गुणांनी, संस्कारांनी होत असे; पण आज गुण असो वा नसो, रूपवान असणे गरजेचे मानले जाते. बुद्धी असो वा नसो, धनवान हवे ही मान्यता सगळ्यांमध्ये दिसून येते; परंतु खरे सौंदर्य कोणते? आज जागोजागी ब्युटीपार्लर आहेत. सौंदर्य टिकविण्यासाठी खटाटोप केला जातो; पण कोणते सौंदर्य जपावे याची समज नाही. लहानपणापासून चांगले दिसावे यासाठी खूप काही केले; पण चांगले बनण्यासाठी काय करावे हे कोणी सांगितले नाही. अष्टावक्र, सूकरात, अब्राहम लिंकन यांनी आपल्या गुणसौंदर्य, विचारसौंदर्य आणि जीवनसौंदर्याने बाह्यसौंदर्यावर मात केली. एखाद्या व्यक्तीने महान कार्य केले तर आपण त्याचा गुणगौरव करताना श्रीफळ अर्थात नारळ देतो. देवळातसुद्धा भगवंताला श्रीफळ चढविले जाते. या नारळाला ‘श्रीफळ’ म्हणण्यामागचा उद्देश बघितला तर आंतरिक सौंदर्यच आहे. बाहेरून कितीही कुरूप दिसत असणारे आतून किती गुणवान असू शकते, याचे दर्शन या श्रीफळाने होते. एकदा जनक राजाने दरबारात विद्वानांची सभा बोलावली. त्या सभेत अष्टावक्र याचे आगमन झाले. पूर्ण सभा हसू लागली. त्यांचे हसणे बघून अष्टावक्रसुद्धा हसू लागले. राजा जनक यांना हसण्याचे कारण मात्र कळलं नाही. ते त्या विद्वानांना विचारतात की, तुम्ही का हसत आहात? विद्वान उत्तर देतात की, ‘या विद्वानांच्या सभेत वेड्या-वाकड्या अंगाच्या व्यक्तीला बघून हसू सुटले.’ मग राजा जनकने अष्टावक्रला हसण्याचे कारण विचारले. अष्टावक्र उत्तरले, ‘राजा मला वाटले की तू विद्वानांची सभा बोलावली आहेस; पण ही तर मुर्खांची सभा आहे. मूर्ख केवळ बाह्यसौंदर्य पाहतात; पण विद्वान मात्र आंतरिक सौंदर्याला पाहतात. आज आपणही कदाचित हेच करत आहोत, नाही का?