शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

खरे सौंदर्य कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:11 IST

मूर्ख केवळ बाह्यसौंदर्य पाहतात; पण विद्वान मात्र आंतरिक सौंदर्याला पाहतात. आज आपणही कदाचित हेच करत आहोत, नाही का?

- नीता ब्रह्मकुमारीआजचे युग स्पर्धेचे आहे. अनेक स्पर्धांमध्ये मनुष्य कळत-नकळत भाग घेत आहे. रूप आणि रूपया या दोघांची स्पर्धा अधिकच दिसून येते. आज व्यक्तीची पसंद आणि ओळख या दोन गोष्टींनीच केली जाते. कधीकाळी एखाद्या व्यक्तीची निवड त्याच्या गुणांनी, संस्कारांनी होत असे; पण आज गुण असो वा नसो, रूपवान असणे गरजेचे मानले जाते. बुद्धी असो वा नसो, धनवान हवे ही मान्यता सगळ्यांमध्ये दिसून येते; परंतु खरे सौंदर्य कोणते? आज जागोजागी ब्युटीपार्लर आहेत. सौंदर्य टिकविण्यासाठी खटाटोप केला जातो; पण कोणते सौंदर्य जपावे याची समज नाही. लहानपणापासून चांगले दिसावे यासाठी खूप काही केले; पण चांगले बनण्यासाठी काय करावे हे कोणी सांगितले नाही. अष्टावक्र, सूकरात, अब्राहम लिंकन यांनी आपल्या गुणसौंदर्य, विचारसौंदर्य आणि जीवनसौंदर्याने बाह्यसौंदर्यावर मात केली. एखाद्या व्यक्तीने महान कार्य केले तर आपण त्याचा गुणगौरव करताना श्रीफळ अर्थात नारळ देतो. देवळातसुद्धा भगवंताला श्रीफळ चढविले जाते. या नारळाला ‘श्रीफळ’ म्हणण्यामागचा उद्देश बघितला तर आंतरिक सौंदर्यच आहे. बाहेरून कितीही कुरूप दिसत असणारे आतून किती गुणवान असू शकते, याचे दर्शन या श्रीफळाने होते. एकदा जनक राजाने दरबारात विद्वानांची सभा बोलावली. त्या सभेत अष्टावक्र याचे आगमन झाले. पूर्ण सभा हसू लागली. त्यांचे हसणे बघून अष्टावक्रसुद्धा हसू लागले. राजा जनक यांना हसण्याचे कारण मात्र कळलं नाही. ते त्या विद्वानांना विचारतात की, तुम्ही का हसत आहात? विद्वान उत्तर देतात की, ‘या विद्वानांच्या सभेत वेड्या-वाकड्या अंगाच्या व्यक्तीला बघून हसू सुटले.’ मग राजा जनकने अष्टावक्रला हसण्याचे कारण विचारले. अष्टावक्र उत्तरले, ‘राजा मला वाटले की तू विद्वानांची सभा बोलावली आहेस; पण ही तर मुर्खांची सभा आहे. मूर्ख केवळ बाह्यसौंदर्य पाहतात; पण विद्वान मात्र आंतरिक सौंदर्याला पाहतात. आज आपणही कदाचित हेच करत आहोत, नाही का?