शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
Lufthansa Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
3
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
5
माकडाच्या हाती लागलं नोटांचं बंडल, झाडावर चढून केली ५००-५०० रुपयांच्या नोटांची उधळण, व्हिडीओ व्हायरल
6
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?
7
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
8
Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
9
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
10
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
11
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
12
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
13
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
14
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
15
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
16
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
17
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
18
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
19
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
20
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

खरे सौंदर्य कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:11 IST

मूर्ख केवळ बाह्यसौंदर्य पाहतात; पण विद्वान मात्र आंतरिक सौंदर्याला पाहतात. आज आपणही कदाचित हेच करत आहोत, नाही का?

- नीता ब्रह्मकुमारीआजचे युग स्पर्धेचे आहे. अनेक स्पर्धांमध्ये मनुष्य कळत-नकळत भाग घेत आहे. रूप आणि रूपया या दोघांची स्पर्धा अधिकच दिसून येते. आज व्यक्तीची पसंद आणि ओळख या दोन गोष्टींनीच केली जाते. कधीकाळी एखाद्या व्यक्तीची निवड त्याच्या गुणांनी, संस्कारांनी होत असे; पण आज गुण असो वा नसो, रूपवान असणे गरजेचे मानले जाते. बुद्धी असो वा नसो, धनवान हवे ही मान्यता सगळ्यांमध्ये दिसून येते; परंतु खरे सौंदर्य कोणते? आज जागोजागी ब्युटीपार्लर आहेत. सौंदर्य टिकविण्यासाठी खटाटोप केला जातो; पण कोणते सौंदर्य जपावे याची समज नाही. लहानपणापासून चांगले दिसावे यासाठी खूप काही केले; पण चांगले बनण्यासाठी काय करावे हे कोणी सांगितले नाही. अष्टावक्र, सूकरात, अब्राहम लिंकन यांनी आपल्या गुणसौंदर्य, विचारसौंदर्य आणि जीवनसौंदर्याने बाह्यसौंदर्यावर मात केली. एखाद्या व्यक्तीने महान कार्य केले तर आपण त्याचा गुणगौरव करताना श्रीफळ अर्थात नारळ देतो. देवळातसुद्धा भगवंताला श्रीफळ चढविले जाते. या नारळाला ‘श्रीफळ’ म्हणण्यामागचा उद्देश बघितला तर आंतरिक सौंदर्यच आहे. बाहेरून कितीही कुरूप दिसत असणारे आतून किती गुणवान असू शकते, याचे दर्शन या श्रीफळाने होते. एकदा जनक राजाने दरबारात विद्वानांची सभा बोलावली. त्या सभेत अष्टावक्र याचे आगमन झाले. पूर्ण सभा हसू लागली. त्यांचे हसणे बघून अष्टावक्रसुद्धा हसू लागले. राजा जनक यांना हसण्याचे कारण मात्र कळलं नाही. ते त्या विद्वानांना विचारतात की, तुम्ही का हसत आहात? विद्वान उत्तर देतात की, ‘या विद्वानांच्या सभेत वेड्या-वाकड्या अंगाच्या व्यक्तीला बघून हसू सुटले.’ मग राजा जनकने अष्टावक्रला हसण्याचे कारण विचारले. अष्टावक्र उत्तरले, ‘राजा मला वाटले की तू विद्वानांची सभा बोलावली आहेस; पण ही तर मुर्खांची सभा आहे. मूर्ख केवळ बाह्यसौंदर्य पाहतात; पण विद्वान मात्र आंतरिक सौंदर्याला पाहतात. आज आपणही कदाचित हेच करत आहोत, नाही का?