शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

गुरुभक्ती कशाला म्हणतात? ती दृढ होण्यासाठी काय करावे लागते, याचे चिंतन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 13:32 IST

आपला भाव दृढ व्हायलासुद्धा आपली स्वत:ची योग्यता वाढवावी लागते. ही योग्यता वाढली की नाही हे पाहण्याचे मुख्य लक्षण म्हणजे आपले मन आपल्या गुरुचरणांजवळ स्थिर होणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

आपण सर्व गुरुभक्त आहोत. त्यामुळे आपल्या हातून गुरुभक्ती अधिक कशी होईल, गुरुभक्तीतील कर्तव्ये अधिकाधिक कशी पार पडतील व आपली गुरुभक्ती अधिकाधिक स्थिर कशी होईल हे जाणले पाहिले. 

गुरुभक्तिचा प्रकारु, निरोपावा माते गुरु,जेणे माझे मन स्थिरु, होऊनि राहे तुम्हाजवळी।

एका शिष्याने प्रार्थना केली की, `हे देवा माझ्या अज्ञानामुळे नेमके काय करावे हे मला कळत नसल्यामुळे मी कसे व काय करावे हे मला सांगा' तेव्हा गुरुंनी सांगितले,

गुरुभक्ति म्हणजे कठीण, दृढ भक्तीने सेवा करणे,कळिकाळाचे नाही भिणे, तया शिष्या परियेसा।

श्रीगुरुंनी शिष्याला असे सांगितल्यावर तो तयार झाला. त्यावेळी शिष्य म्हणाला, `मी कोण गुरुभक्ती करणारा? ती तर तुम्हीच माझ्याकडून करून घ्यावीत! गुरुभक्तीचा प्रकार म्हणजे काय? आम्ही कोणत्या मार्गाने जावे, काय करावे, हे आपण आम्हाला शिकवा, सांगा, म्हणजे आमच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि त्या मार्गाने चालणे सुलभ होईल.

गुरु सांगतात, `मी एक सामान्य मनुष्य आहे. माझ्या अंत:करणात नितांत भक्ती कशी राहील? त्या भक्तीद्वारे मी परमेश्वराला वश कसा करून घेईन? गुरुभक्ती म्हणजे काय करावे? मी जर ते करत असलो तर त्याचे फळ काय? या गोष्टींचा विचार न करता परमेश्वराच्या चरणांजवळ आपले अंत:करण स्थिर असायला हवे. ते स्थिर असणे गरजेचे आहे. आपले मन गुरुचरणांजवळ ज्यावेळेस स्थिर होते तेव्हाच आपला भाव दृढ झाला असे समजावे, तोवर आपण प्रयत्न करीत राहावे. 

आपला भाव दृढ व्हायलासुद्धा आपली स्वत:ची योग्यता वाढवावी लागते. ही योग्यता वाढली की नाही हे पाहण्याचे मुख्य लक्षण म्हणजे आपले मन आपल्या गुरुचरणांजवळ स्थिर होणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुरुभक्तीचा प्रकार म्हणजे काय, की ज्या गुरुने केलेले मार्गदर्शन, त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण आचरण करणे, त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि अपले गुरु ही शक्ती आहे, असे समजून प्रत्येक कार्य आत्मविश्वासाने करणे याला गुरुभक्ती म्हणतात.