शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

मृत्यूला हुलकावणी द्यायला गेला आणि मृत्यूमुखी पडला; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 6:57 PM

भगवान श्रीकृष्ण गीतेत कृष्णाला सांगतात, पुढे काय होईल याची काळजी करू नकोस, तो भार देवावर टाक आणि तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा...!

'समय से पेहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलने वाला!' हे वाक्य आपण कधी ना कधी वाचले असेलच. या वाक्याचे मर्म समजून घेतले, तर आपली अतिकाळजी करण्याची चिंताच मिटून जाईल. पण तसे होत नाही, आपण अकारण काळजी करत बसतो आणि घडते भलतेच!

एकदा एक तरुण सकाळी झोपेतून उठतो डोळे उघडतो, तर समोर यमराज उभे असतात. त्यांना पाहून तो घाबरतो. यमराज म्हणतात, `चल मी तुला न्यायला आलोय. आजच्या यादीत पहिले नाव तुझे आहे.'

हे ऐकून तो तरुण गोंधळून जातो. आज, आत्ता, ताबडतोब निघायचे? कोणालाही न भेटता? घरच्यांचे, मुला बाळांचे काय होईल. किमान एक दिवस मिळाला असता, तर घरच्यांची पुढची व्यवस्था तरी लावून गेलो असतो. काहीही करून यमराजांना हुलकावणी दिली पाहिजे असा त्याच्या मनात विचार येतो. 

तो यमराजाला म्हणतो, `यमराज मृत्यूपूर्वी शेवटची इच्छा प्रत्येकाला विचारली जाते ना? मी फार काही मागत नाही. पण सवयीप्रमाणे एक कप चहा पितो मग सोबत येतो.'

एवढी शुल्लक बाब पूर्ण करण्यासाठी यमराज होकार देतात. तरुण स्वत:साठी आणि यमराजांसाठी चहा बनवतो. यमराजांच्या चहात झोपेचे औषध टाकतो. चहा पिऊन यमराजांना डुलकी लागते. तेवढ्या वेळात तो त्यांच्या यादीतले पहिले नाव खोडून सर्वात शेवटी स्वत:चे नाव लिहितो. तो विचार करतो, जायचे तर आहेच, किमान यमराज बाकीच्यांना घेऊन येईपर्यंत पूर्ण दिवस तरी मिळेल.

यमराज झोपून उठतात. तरुण जाण्याची तयारी दाखवतो. यमराज म्हणतात, `लोक मला पाहून शिव्या घालतात. तू माझे स्वागत केलेस. मी खुष झालो आहे. आजच्या यादीची सुरुवात मी शेवटून पहिली करतो.'

पाहतो तर शेवटून पहिले नाव तरुणाचे असते. त्याच्या आगाऊपणाबद्दल यमराज रागवतात आणि तडक त्याला घेऊन स्वर्गलोकी जातात. तिथे भगवान विष्णू आणि चित्रगुप्त यांच्याशी तरुणाची गाठ पडते. चित्रगुप्त म्हणातात, `तू देवकार्यात अडथळा आणून चूक केलीस. तुझा मृत्यू आज तसाही टळणार होता, पण तू तो ओढावून घेतलास.' यावर भगवान विष्णू म्हणतात, हे मानवा,

'तू ते करतो, जे तुला आवडते,पण होते तेच, जे मला आवडते,म्हणून तू ते कर, जे मला आवडते,मग तेच होईल, जे तुला आवडते!!!'

म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेत कृष्णाला सांगतात, पुढे काय होईल याची काळजी करू नकोस, तो भार देवावर टाक आणि तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा...!