शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

मृत्यूला हुलकावणी द्यायला गेला आणि मृत्यूमुखी पडला; वाचा ही बोधकथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 18:58 IST

भगवान श्रीकृष्ण गीतेत कृष्णाला सांगतात, पुढे काय होईल याची काळजी करू नकोस, तो भार देवावर टाक आणि तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा...!

'समय से पेहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नही मिलने वाला!' हे वाक्य आपण कधी ना कधी वाचले असेलच. या वाक्याचे मर्म समजून घेतले, तर आपली अतिकाळजी करण्याची चिंताच मिटून जाईल. पण तसे होत नाही, आपण अकारण काळजी करत बसतो आणि घडते भलतेच!

एकदा एक तरुण सकाळी झोपेतून उठतो डोळे उघडतो, तर समोर यमराज उभे असतात. त्यांना पाहून तो घाबरतो. यमराज म्हणतात, `चल मी तुला न्यायला आलोय. आजच्या यादीत पहिले नाव तुझे आहे.'

हे ऐकून तो तरुण गोंधळून जातो. आज, आत्ता, ताबडतोब निघायचे? कोणालाही न भेटता? घरच्यांचे, मुला बाळांचे काय होईल. किमान एक दिवस मिळाला असता, तर घरच्यांची पुढची व्यवस्था तरी लावून गेलो असतो. काहीही करून यमराजांना हुलकावणी दिली पाहिजे असा त्याच्या मनात विचार येतो. 

तो यमराजाला म्हणतो, `यमराज मृत्यूपूर्वी शेवटची इच्छा प्रत्येकाला विचारली जाते ना? मी फार काही मागत नाही. पण सवयीप्रमाणे एक कप चहा पितो मग सोबत येतो.'

एवढी शुल्लक बाब पूर्ण करण्यासाठी यमराज होकार देतात. तरुण स्वत:साठी आणि यमराजांसाठी चहा बनवतो. यमराजांच्या चहात झोपेचे औषध टाकतो. चहा पिऊन यमराजांना डुलकी लागते. तेवढ्या वेळात तो त्यांच्या यादीतले पहिले नाव खोडून सर्वात शेवटी स्वत:चे नाव लिहितो. तो विचार करतो, जायचे तर आहेच, किमान यमराज बाकीच्यांना घेऊन येईपर्यंत पूर्ण दिवस तरी मिळेल.

यमराज झोपून उठतात. तरुण जाण्याची तयारी दाखवतो. यमराज म्हणतात, `लोक मला पाहून शिव्या घालतात. तू माझे स्वागत केलेस. मी खुष झालो आहे. आजच्या यादीची सुरुवात मी शेवटून पहिली करतो.'

पाहतो तर शेवटून पहिले नाव तरुणाचे असते. त्याच्या आगाऊपणाबद्दल यमराज रागवतात आणि तडक त्याला घेऊन स्वर्गलोकी जातात. तिथे भगवान विष्णू आणि चित्रगुप्त यांच्याशी तरुणाची गाठ पडते. चित्रगुप्त म्हणातात, `तू देवकार्यात अडथळा आणून चूक केलीस. तुझा मृत्यू आज तसाही टळणार होता, पण तू तो ओढावून घेतलास.' यावर भगवान विष्णू म्हणतात, हे मानवा,

'तू ते करतो, जे तुला आवडते,पण होते तेच, जे मला आवडते,म्हणून तू ते कर, जे मला आवडते,मग तेच होईल, जे तुला आवडते!!!'

म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेत कृष्णाला सांगतात, पुढे काय होईल याची काळजी करू नकोस, तो भार देवावर टाक आणि तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा...!