शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आपल्याकडे देवाच्या चुकांची यादी असते, पण त्याच्या जागी उभं राहून अनुभव घेतला तर? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 07:30 IST

नावं ठेवणं सोपं आहे, मग ती व्यक्ती असो, व्यवस्था असो नाहीतर खुद्द परमेश्वर, पण त्यांच्या जागी स्वतःला ठेवून पाहिल्यावर काय अनुभव येतात ते वाचा!

डेरेदार वृक्षावर आवळा का? आणि नाजूक वेलीवर भोपळा का? असे प्रश्न विचारून देवाच्या योजनेवर शंका घेणे सोडून द्या! या उदाहरणाशी संबंधित गोष्ट तुम्हाला माहीत असेलच, पण आणखी एक गोष्ट जी थेट भगवंताने आपल्या भक्ताला सांगितली, ती थेट तुमच्यापर्यंत! आता ही गोष्ट समजा नाहीतर देवाचा निरोप समजा, पण कथा शेवट्पर्यंत नक्की वाचा!

एकदा विठोबाला त्याचा भक्त म्हणाला, देवा युगे अठ्ठावीस तू इथे उभा आहेस. दमला असशील. तुझी हरकत नसेल तर मी तुझ्या जागी उभा राहतो, तू थोड्या वेळ विश्रांती घे नाहीतर कुठे फिरून ये. एक दिवस तुझे कामकाज मी सांभाळतो! 

देवाला हायसे वाटले. आजवर असा प्रस्ताव कोणीच मांडला नव्हता. विठोबा खुश झाला. त्याला आपली जागा दिली. पोशाख दिला आणि ताकीद दिली. दिवसभर जे घडेल ते निमूटपणे बघायचं, ढवळाढवळ करायची नाही. आपण मूर्ती आहोत हे भान विसरायचे नाही. भक्ताने मान डोलवली. तो विठोबाच्या विटेवर उभा राहिला. दिवसभर लोक दर्शनाला येत होते. आपली गाऱ्हाणी सांगत होते. समोर प्रसाद येत होता पण काहीच खाता येणार नव्हते. 

दिवस मावळतीला झुकला. एक शेठजी आले. त्यांनी आपली बरकत होऊ दे असे मागणे मागितले आणि नमस्कार करून निघून गेले. जाता जाता त्यांचे पाकीट खिशातून मंदिरात पडले. भक्ताला ते दिसले पण थांबवता येईना. थोड्या वेळाने एक गरीब माणूस आला. देवाला म्हणाला, माझी मुलं बायको उपाशी आहेत, त्यांच्या पोटापाण्याची सोय होऊ शकेल असं काहीतरी कर देवा... असे म्हणत तो नमस्कार करू लागला, तर त्याला शेटजींचे पाकीट मिळाले. त्यात पैसे होते. देवानेच आपली सोय केली अशा विचारात त्याने इथे तिथे बघितले आणि पाकीट सदऱ्यात लपवून तो नमस्कार करत निघून गेला. काही वेळाने एक नावाडी आला, म्हणाला 'देवा मोठ्या प्रवासाला निघतोय. कृपा ठेवा. प्रवास सुखरूप होऊ द्या.'  

नावाडी देवाची करुणा भाकत असताना शेठजी पाकीट शोधत मंदिरात आले आणि त्या नावाड्याने पाकीट चोरले अशा संशयावरून त्याला मारझोड करत पाकिटाची चौकशी करू लागले. भक्ताला नावाड्याचे हाल पाहवेना. त्याने मूर्तीच्या मागच्या बाजूने पळ काढला आणि शेठजींना थांबवून गरीब माणसाचा पत्ता दिला. शेठजींनी नाविकाला सोडले आणि ते गरीब माणसाचा शोध घेत त्याच्या घरी गेले. 

तेवढ्यात विठोबा आले. भक्त म्हणाला देवा, मी तुमचे काम केले. सगळी हकीकत सांगितली. विठोबाने कपाळाला हात लावला आणि म्हणाले, 'तू माझं सगळं काम बिघडवून टाकलंस! मी तुला फक्त निमूटपणे उभा राहा म्हणालो होतो. पण तू भलाई करायला गेलास आणि सगळ्यांची गैरसोय केलीस!'

भक्त काकुळतीला आला व म्हणाला, माझे काय चुकले देवा? त्यावर विठोबा म्हणाले, 'शेठजींना कसलीही कमी नाही. त्यांचे पाकीट पडले त्यातून मी गरीब माणसाची सोय लावून दिली होती. शेठजींना ज्या नावाड्यावर संशय आला त्याचा प्रवासात अपघात होणार होता. शेठजींमुळे तो तुरुंगात गेला असता. त्याचा मृत्यू टळला असता आणि गरीब पोटभर जेवला असता. एवढेसे पैसे गेल्याने शेटजींचे काहीच नुकसान होणार नव्हते. पण तू सगळी गडबड केलीस आणि आता त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागणार!' 

भक्ताने देवाचे पाय धरले आणि म्हणाला, 'देवा तुमच्या कामात ढवळाढवळ करून मी मोठी चूक केली. आम्ही ज्या योजना करतो त्यापेक्षा तुम्ही केलेल्या योजना सर्वांचा विचार करून केलेल्या असतात हे लक्षात आलं!' 

म्हणून गीतेचे सार देताना श्रीकृष्ण म्हणतात, 

जो हुआ वह अच्छा हुआ है, जो होगा वह अच्छा होगा!