शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आपण एकटे राहू शकतो, पण एकटे जगू शकत नाही; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 08:00 IST

आपण सगळे काही करू शकतो, आपल्याला कुणाची गरज नाही, आपण स्वत:ला सांभाळायला समर्थ आहोत या भ्रमात जगू नका. कोण कधी कसे मदतीला येईल सांगता येत नाही.

तुम्ही म्हणाल या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे? तर नागरिकशास्त्रात बालपणी आपण शिकलो आहोत, 'मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.' समाजशील अर्थात समाजात राहणारा. तो एकटा राहू शकत असला, तरी उदरनिर्वाहासाठी, सुरक्षेसाठी, भावभावनांच्या प्रगटीकरणासाठी समाजाची गरज लागतेच! त्यामुळे एकट्याने राहून कुढत जगण्यापेक्षा चांगले मित्र जोडावेत, चांगल्या विचाराच्या लोकांच्या संगतीत राहावे आणि एकमेकांना सहाय्य करावे, हीच शिकवण आपल्याला पूर्वापार मिळत आलेली आहे. याचे प्रात्यक्षिक आपण एका गोष्टीतून जाणून घेऊ.

एका जंगलात एक लांडोर होती. तिला एका मोराने लग्नाचा प्रस्ताव दिला. तिने विचारले, 'तुला मित्र किती आहेत?' मोर म्हणाला, 'मला कधी मित्रांची गरज वाटली नाही.'लांडोर म्हणाली, 'मग मलाही या विवाह प्रस्तावाची गरज वाटत नाही.'

मोराचा अहंकार ज्याला आपण इगो म्हणतो, तो दुखवला गेला. त्याने तिच्या बोलण्यावर चिंतन केले. तेव्हा एक कासव आणि ससा त्याचे सांत्वन करू लागले. त्यांच्याशी बोलल्यावर मोराचे मन मोरपिसासारखे हलके झाले. त्या तिघांची गट्टी जमली. ससा आणि कासवाने जंगलातल्या इतर प्राण्यांशी मोराची ओळख करून दिली. मनमोराचा पिसारा आणखीनच फुलू लागला. तो समाजशील झाला. त्याच्यात झालेला बदल पाहून लांडोर भाळली आणि तिने आपणहून लग्नाची तयारी दाखवली. सगळ्या प्राण्यांच्या उपस्थितीत लग्न थाटामाटात पार पडले.

एक दिवस जंगलात एक शिकारी आला. त्याने मोराचा पाठलाग केला. मोर जिवाच्या आकांताने पळत होता. वाटेत लांडोर दिसली. दोघे पळू लागले. ते एका तळ्याकाठी पोहोचले. पुढे जायचा मार्ग नव्हता. शिकारी पाठलाग करत तिथे पोहोचत होता. त्यांना घाबरलेले पाहून कासवाने धीर दिला. शिकाऱ्याचे लक्ष विचलित करण्यासाठी कासवाने पुढाकार घेतला. तोवर कावळे, चिमण्या, पोपट, बगळे यांनी वाघोबाला जाऊन निरोप दिला. आपल्या मित्रांच्या मदतीसाठी वाघोबा डरकाळी फोडत त्या दिशेने आला. आणि त्या आवाजाने घाबरत शिकारी जीव मुठीत घेऊन निघून गेला. मोराला हायसे वाटले. त्याक्षणी त्याला लांडोरने घातलेली अट आठवली, 'मित्र असलेच पाहिजेत!'

म्हणून लोकहो, आपण सगळे काही करू शकतो, आपल्याला कुणाची गरज नाही, आपण स्वत:ला सांभाळायला समर्थ आहोत या भ्रमात जगू नका. कोण कधी कसे मदतीला येईल सांगता येत नाही. म्हणून मी पणातून बाहेर या व आम्ही होऊन जगा, कारण त्यातच जगण्याचा खरा आनंद दडलेला आहे!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी