शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आपण एकटे राहू शकतो, पण एकटे जगू शकत नाही; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 08:00 IST

आपण सगळे काही करू शकतो, आपल्याला कुणाची गरज नाही, आपण स्वत:ला सांभाळायला समर्थ आहोत या भ्रमात जगू नका. कोण कधी कसे मदतीला येईल सांगता येत नाही.

तुम्ही म्हणाल या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे? तर नागरिकशास्त्रात बालपणी आपण शिकलो आहोत, 'मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.' समाजशील अर्थात समाजात राहणारा. तो एकटा राहू शकत असला, तरी उदरनिर्वाहासाठी, सुरक्षेसाठी, भावभावनांच्या प्रगटीकरणासाठी समाजाची गरज लागतेच! त्यामुळे एकट्याने राहून कुढत जगण्यापेक्षा चांगले मित्र जोडावेत, चांगल्या विचाराच्या लोकांच्या संगतीत राहावे आणि एकमेकांना सहाय्य करावे, हीच शिकवण आपल्याला पूर्वापार मिळत आलेली आहे. याचे प्रात्यक्षिक आपण एका गोष्टीतून जाणून घेऊ.

एका जंगलात एक लांडोर होती. तिला एका मोराने लग्नाचा प्रस्ताव दिला. तिने विचारले, 'तुला मित्र किती आहेत?' मोर म्हणाला, 'मला कधी मित्रांची गरज वाटली नाही.'लांडोर म्हणाली, 'मग मलाही या विवाह प्रस्तावाची गरज वाटत नाही.'

मोराचा अहंकार ज्याला आपण इगो म्हणतो, तो दुखवला गेला. त्याने तिच्या बोलण्यावर चिंतन केले. तेव्हा एक कासव आणि ससा त्याचे सांत्वन करू लागले. त्यांच्याशी बोलल्यावर मोराचे मन मोरपिसासारखे हलके झाले. त्या तिघांची गट्टी जमली. ससा आणि कासवाने जंगलातल्या इतर प्राण्यांशी मोराची ओळख करून दिली. मनमोराचा पिसारा आणखीनच फुलू लागला. तो समाजशील झाला. त्याच्यात झालेला बदल पाहून लांडोर भाळली आणि तिने आपणहून लग्नाची तयारी दाखवली. सगळ्या प्राण्यांच्या उपस्थितीत लग्न थाटामाटात पार पडले.

एक दिवस जंगलात एक शिकारी आला. त्याने मोराचा पाठलाग केला. मोर जिवाच्या आकांताने पळत होता. वाटेत लांडोर दिसली. दोघे पळू लागले. ते एका तळ्याकाठी पोहोचले. पुढे जायचा मार्ग नव्हता. शिकारी पाठलाग करत तिथे पोहोचत होता. त्यांना घाबरलेले पाहून कासवाने धीर दिला. शिकाऱ्याचे लक्ष विचलित करण्यासाठी कासवाने पुढाकार घेतला. तोवर कावळे, चिमण्या, पोपट, बगळे यांनी वाघोबाला जाऊन निरोप दिला. आपल्या मित्रांच्या मदतीसाठी वाघोबा डरकाळी फोडत त्या दिशेने आला. आणि त्या आवाजाने घाबरत शिकारी जीव मुठीत घेऊन निघून गेला. मोराला हायसे वाटले. त्याक्षणी त्याला लांडोरने घातलेली अट आठवली, 'मित्र असलेच पाहिजेत!'

म्हणून लोकहो, आपण सगळे काही करू शकतो, आपल्याला कुणाची गरज नाही, आपण स्वत:ला सांभाळायला समर्थ आहोत या भ्रमात जगू नका. कोण कधी कसे मदतीला येईल सांगता येत नाही. म्हणून मी पणातून बाहेर या व आम्ही होऊन जगा, कारण त्यातच जगण्याचा खरा आनंद दडलेला आहे!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी