शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

आपण एकटे राहू शकतो, पण एकटे जगू शकत नाही; वाचा ही गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 08:00 IST

आपण सगळे काही करू शकतो, आपल्याला कुणाची गरज नाही, आपण स्वत:ला सांभाळायला समर्थ आहोत या भ्रमात जगू नका. कोण कधी कसे मदतीला येईल सांगता येत नाही.

तुम्ही म्हणाल या दोन वाक्यांमध्ये काय फरक आहे? तर नागरिकशास्त्रात बालपणी आपण शिकलो आहोत, 'मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.' समाजशील अर्थात समाजात राहणारा. तो एकटा राहू शकत असला, तरी उदरनिर्वाहासाठी, सुरक्षेसाठी, भावभावनांच्या प्रगटीकरणासाठी समाजाची गरज लागतेच! त्यामुळे एकट्याने राहून कुढत जगण्यापेक्षा चांगले मित्र जोडावेत, चांगल्या विचाराच्या लोकांच्या संगतीत राहावे आणि एकमेकांना सहाय्य करावे, हीच शिकवण आपल्याला पूर्वापार मिळत आलेली आहे. याचे प्रात्यक्षिक आपण एका गोष्टीतून जाणून घेऊ.

एका जंगलात एक लांडोर होती. तिला एका मोराने लग्नाचा प्रस्ताव दिला. तिने विचारले, 'तुला मित्र किती आहेत?' मोर म्हणाला, 'मला कधी मित्रांची गरज वाटली नाही.'लांडोर म्हणाली, 'मग मलाही या विवाह प्रस्तावाची गरज वाटत नाही.'

मोराचा अहंकार ज्याला आपण इगो म्हणतो, तो दुखवला गेला. त्याने तिच्या बोलण्यावर चिंतन केले. तेव्हा एक कासव आणि ससा त्याचे सांत्वन करू लागले. त्यांच्याशी बोलल्यावर मोराचे मन मोरपिसासारखे हलके झाले. त्या तिघांची गट्टी जमली. ससा आणि कासवाने जंगलातल्या इतर प्राण्यांशी मोराची ओळख करून दिली. मनमोराचा पिसारा आणखीनच फुलू लागला. तो समाजशील झाला. त्याच्यात झालेला बदल पाहून लांडोर भाळली आणि तिने आपणहून लग्नाची तयारी दाखवली. सगळ्या प्राण्यांच्या उपस्थितीत लग्न थाटामाटात पार पडले.

एक दिवस जंगलात एक शिकारी आला. त्याने मोराचा पाठलाग केला. मोर जिवाच्या आकांताने पळत होता. वाटेत लांडोर दिसली. दोघे पळू लागले. ते एका तळ्याकाठी पोहोचले. पुढे जायचा मार्ग नव्हता. शिकारी पाठलाग करत तिथे पोहोचत होता. त्यांना घाबरलेले पाहून कासवाने धीर दिला. शिकाऱ्याचे लक्ष विचलित करण्यासाठी कासवाने पुढाकार घेतला. तोवर कावळे, चिमण्या, पोपट, बगळे यांनी वाघोबाला जाऊन निरोप दिला. आपल्या मित्रांच्या मदतीसाठी वाघोबा डरकाळी फोडत त्या दिशेने आला. आणि त्या आवाजाने घाबरत शिकारी जीव मुठीत घेऊन निघून गेला. मोराला हायसे वाटले. त्याक्षणी त्याला लांडोरने घातलेली अट आठवली, 'मित्र असलेच पाहिजेत!'

म्हणून लोकहो, आपण सगळे काही करू शकतो, आपल्याला कुणाची गरज नाही, आपण स्वत:ला सांभाळायला समर्थ आहोत या भ्रमात जगू नका. कोण कधी कसे मदतीला येईल सांगता येत नाही. म्हणून मी पणातून बाहेर या व आम्ही होऊन जगा, कारण त्यातच जगण्याचा खरा आनंद दडलेला आहे!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी