शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

‘वारीकरी’ ते वारकरी... देव, देश, धर्माचं करणारी परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 10:03 IST

समग्र विश्वाला कोरोना महामारीने भयभीत केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे, ज्यामुळे पंढरपूरच्या वारीच्या आनंदापासून भक्त वंचित आहेत.

- -जगद््गुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज, लहवितकर, नाशिक

महाराष्ट्रात भीमा नदीच्या तीरावर असणाऱ्या पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील अधिष्ठाता दैवत जे पांडुरंग किंवा श्री विठ्ठल नावाने ओळखले जाते, त्यांच्या दर्शनासाठी नित्यनेमाने येणाºया भाविकाला ‘वारकरी’ असे म्हणतात. वारकरी हा शब्द ‘वारीकरी’ या शब्दाचा अपभ्रंश असून, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगात याचा उल्लेख येतो.आज भारत वर्षात या संप्रदायाचे कोट्यवधी भाविक आहेत. या संप्रदायाला अद्वैत तत्त्वज्ञानाचा व वेदायुक्त संतवाणी व अभंग याचा पाया आहे. या संप्रदायाचे अधिष्ठान दैवत विठ्ठल हे सरळ सर्वांना आश्रय देणारे असून, संप्रदायाचे तत्त्वज्ञानही सर्वसमावेशक आहे. सर्वांना भक्ती, ज्ञान, कर्म व उपासनेचा समान अधिकार आहे, असे सांगणारे आहे.पंढरी वारीचा अपूर्व असा इतिहास आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती व परंपराही पंढरीच्या वारीमध्ये सामावली आहे. वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरच्या वारीला विशेष महत्त्व आहे. या परंपरेनुसार आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री या महिन्यातील चार वाºया महत्त्वाच्या आहेत. आषाढी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते. त्यातूनच एकात्मतेला चालना मिळते. समग्र महाराष्ट्र संस्कृतीचे विराट दर्शन घडते. पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा प्रमुख आचारधर्म आहे. वारीची प्रथा परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्या पूर्व काळापासून चालत आलेली आहे, वारीमुळे या संप्रदायाला वारकरी असे नाव पडले.वारकरी संप्रदायाच्या प्रेमभक्तीचा प्रवाह अखंडित ठेवण्याचे महान कार्य पालखी सोहळ्यातून होत असते. सध्या होत आहे. समग्र विश्वाला कोरोना महामारीने भयभीत केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे, ज्यामुळे पंढरपूरच्या वारीच्या आनंदापासून भक्त वंचित आहेत. वारकरी संप्रदाय हा राष्ट्रभक्त असल्याने केंद्र, राज्य शासनाच्या निर्देशानुसार आपली परम व्याकूळता सहन करून आपल्या स्वस्थानी थांबला आहे. अतिशय जबाबदारीने कर्तव्याची भूमिका या संप्रदायाचे अनुवर्ती बजावत आहेत. देव, देश, धर्म यांचे रक्षण करणे ही आमच्या वारकऱ्यांची परंपरा आहे. वारकरी भाविकांना यानिमित्ताने आपल्या घराजवळ व मठ, आश्रमाजवळ दहा पवित्र वृक्षांचे आरोपण करून राष्ट्रीय कार्यात सहभागी करावे.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर