शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

‘वारीकरी’ ते वारकरी... देव, देश, धर्माचं करणारी परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 10:03 IST

समग्र विश्वाला कोरोना महामारीने भयभीत केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे, ज्यामुळे पंढरपूरच्या वारीच्या आनंदापासून भक्त वंचित आहेत.

- -जगद््गुरू द्वाराचार्य डॉ. रामकृष्ण महाराज, लहवितकर, नाशिक

महाराष्ट्रात भीमा नदीच्या तीरावर असणाऱ्या पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील अधिष्ठाता दैवत जे पांडुरंग किंवा श्री विठ्ठल नावाने ओळखले जाते, त्यांच्या दर्शनासाठी नित्यनेमाने येणाºया भाविकाला ‘वारकरी’ असे म्हणतात. वारकरी हा शब्द ‘वारीकरी’ या शब्दाचा अपभ्रंश असून, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगात याचा उल्लेख येतो.आज भारत वर्षात या संप्रदायाचे कोट्यवधी भाविक आहेत. या संप्रदायाला अद्वैत तत्त्वज्ञानाचा व वेदायुक्त संतवाणी व अभंग याचा पाया आहे. या संप्रदायाचे अधिष्ठान दैवत विठ्ठल हे सरळ सर्वांना आश्रय देणारे असून, संप्रदायाचे तत्त्वज्ञानही सर्वसमावेशक आहे. सर्वांना भक्ती, ज्ञान, कर्म व उपासनेचा समान अधिकार आहे, असे सांगणारे आहे.पंढरी वारीचा अपूर्व असा इतिहास आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती व परंपराही पंढरीच्या वारीमध्ये सामावली आहे. वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरच्या वारीला विशेष महत्त्व आहे. या परंपरेनुसार आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री या महिन्यातील चार वाºया महत्त्वाच्या आहेत. आषाढी एकादशीला पंढरपुरात मोठी यात्रा भरते. त्यातूनच एकात्मतेला चालना मिळते. समग्र महाराष्ट्र संस्कृतीचे विराट दर्शन घडते. पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा प्रमुख आचारधर्म आहे. वारीची प्रथा परंपरा संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज यांच्या पूर्व काळापासून चालत आलेली आहे, वारीमुळे या संप्रदायाला वारकरी असे नाव पडले.वारकरी संप्रदायाच्या प्रेमभक्तीचा प्रवाह अखंडित ठेवण्याचे महान कार्य पालखी सोहळ्यातून होत असते. सध्या होत आहे. समग्र विश्वाला कोरोना महामारीने भयभीत केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिली घटना आहे, ज्यामुळे पंढरपूरच्या वारीच्या आनंदापासून भक्त वंचित आहेत. वारकरी संप्रदाय हा राष्ट्रभक्त असल्याने केंद्र, राज्य शासनाच्या निर्देशानुसार आपली परम व्याकूळता सहन करून आपल्या स्वस्थानी थांबला आहे. अतिशय जबाबदारीने कर्तव्याची भूमिका या संप्रदायाचे अनुवर्ती बजावत आहेत. देव, देश, धर्म यांचे रक्षण करणे ही आमच्या वारकऱ्यांची परंपरा आहे. वारकरी भाविकांना यानिमित्ताने आपल्या घराजवळ व मठ, आश्रमाजवळ दहा पवित्र वृक्षांचे आरोपण करून राष्ट्रीय कार्यात सहभागी करावे.

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर