शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्ये वाद न होण्याचे कारण जाणून घ्यायचे आहे? वाचा इयत्ता चौथीतली कविता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 11:43 IST

इतर प्राण्यांपेक्षा सगळ्या बाबतीत प्रगत असूनही मनुष्य प्राणी दुःखी, असमाधानी, नैराश्यमय आयुष्य का जगतोय? याचं उत्तर या कवितेत दडले आहे. 

'बालपणीचा काळ सुखाचा' असे आपण म्हणतो. त्या वयात आपल्यावर कोणत्या जबाबदाऱ्या नाहीत म्हणून आपण आनंदी असतो का? तर नाही! मुलं जेवढं मिळालं त्यात आनंद मानतात. रागवतात, चिडतात पण पुढच्या क्षणी विसरून जातात आणि खेळायला सुरुवात करतात. त्यांच्या मनात कोणाबद्दलही भेदभाव, द्वेष, मत्सर या गोष्टी नसतात. त्यामुळे स्पर्धा नसते, ना स्वतःशी ना दुसऱ्यांशी. प्रत्येक दिवस ते आनंदाने जगतात. गृहपाठ करून मोकळे होतात. नसेल केला तर मार खाण्याची तयारी ठेवतात. या पारदर्शक स्वभावामुळे ते आनंदात असतात. यावरून बालपणीची एक कविता आठवते, प्रश्न! प्रभा मुळे यांची ही कविता आहे. यात त्यांनी बालमनातून मांडलेली कविता मोठ्यांच्या जगण्याचे मर्म सांगणारी आहे. ती वाचताना तुम्ही तालासुरात वाचाल आणि त्यावर विचार करून आपले जीवन जास्तीत जास्त निर्मळ, आनंदी आणि टेन्शन फ्री बनवण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे. 

प्रश्न

पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कलामाणसाला का जमत नाही, प्रश्न पडतो मला 

चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा गाय काळजी करत नाही मिळेल का चारा मला 

कोकीळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग 

बैल कधी म्हणत नाही मीच का राबू कावळा कधी विचारत नाही वापरू कोणता साबू?

ससा कधीच म्हणत नाही मीच का भित्रा वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा 

जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता माणसाच्या मनात असतो विचारांचा गुंता!