शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी व्हायचे आहे? ओशो सांगत आहेत यशस्वी होण्याचे गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 10:00 IST

कार्यकुशल बनायचे असेल, तर एकावेळी एकच काम करा, पण मनापासून करा.

काही लोक असतात, ज्यांना एक कामही नीट जमत नाही, तर काही लोक एकावेळी चार कामे बखुबीने करतात. कोणी म्हणतात शंभर गोष्टी करू नका, एकाच गोष्टीच्या मागे लागा, तर कोणी म्हणतात आताच्या काळात एका गोष्टीमागे लागून चालणार नाही, तुम्हाला चतुरस्र असावे लागते. अशावेळी कोणाचे ऐकावे आणि कोणाचे नाही, हेच कळत नाही. याबाबत ओशो काय म्हणतात ते पाहू. 

लहान लहान गोष्टी करताना इतर कोणताही विचार मनात न येऊ देता संपूर्ण जागरूक त्या गोष्टीबद्दल राहील असा प्रयत्न करा. समजा शांत बसला आहात. मग श्वासाकडे पूर्ण लक्ष द्या. श्वासाबद्दल पूर्ण भानावस्था असणे ही बुद्धाने महत्वाची प्रक्रिया मानली आहे. श्वास चोवीस तास चाललेला असतो. तुम्ही काहीही केले नाही तरी तो चाललेला असतो. या सहज क्रियेबद्दल संपूर्ण जाणून घ्या आणि त्याबद्दल पूर्ण सचेत व्हा. श्वास आत जाताना जाणीवपूर्वक जाऊ द्या. श्वास आत जात आहे. परत उच्छ्वास रूपाने फिरला. बाहेर येऊ लागला. पूर्ण बाहेर गेला. परत आत आला. आत बाहेर. श्वासांची एक माळ गुंफून घ्या. एक एक श्वासोच्छ्वासाचा मणी पुढे सरकवत राहा. तुम्ही चकीत व्हाल की ही साधी क्रियासुद्धा तु्ही भानपूर्वक करत नाही, हे विसरत असता. थोडा वेळ श्वासोच्छ्वासाबद्दल पूर्ण भानावर असता. मग मन जातं दुकानात. काही खरेदी करता. काही विकता. मग कुणाशी भांडण होते. परत तुम्ही दचकता. लक्षात येते. चांगला तास निघून गेला. मी कुठे गेलो होतो? श्वास विसरूनच गेलो. परत त्या बाबतीत जाणीव होते. याला काठाकाठाने करण्याचा अभ्यास म्हणतात.

श्वासाबद्दल जागरुक अवस्था असण्यात फार त्रास नाही. तुम्ही समजा क्रोधाच्या बाबतीत अशी जागरुकता बाळगायला जाल तर काय होईल? क्रोध काही रोज एकसारखा येत नाही. कधी तरी येतो. आणि येतो तेव्हा इतक्या तीव्रतेने प्रगाढपणे येतो, त्या क्षणी इतक्या गोष्टी पणाला लागलेल्या असतात की तुम्ही कदाचित विचार कराल, ते जागरुकता, भानावस्था नंतर पाहून घेऊ. आता जे काय वाटतय ते करून घेऊ.

कामवासना तर पार खोलवर पसरली आहे. निसर्गाने तशी योजना केलेली आहे. त्यावरच जीवनाचे सातत्य अवलंबून आहे. कामवासनेच्या बाबतीत निर्विकार साक्षीभाव बाळगणे सोपे झाले असते का? की तुम्ही इच्छा धरली आणि कामवासना नाहीशी झाली, तर तुमचा जन्म कधी झाला असता का? तुमच्या आधी किती तरी लोकांनी तिच्यापासून सुटका करून घेतली असती. तुमच्या असण्याची शक्यता नसण्याच्या पातळीवर जाऊ शकली असती. तुमच्या माता पित्यांची कामवासनेतून सुटका झाली नाही, म्हणून तुम्ही आहात. तुम्हीही कामवासनेपासून इतक्या सहज सुटू शकाल का? तुम्हालाही मुलं बाळं होणार असतील. ते जीव जन्म घेण्याच्या प्रतिक्षेत असतील. तुम्ही पळ काढू शकत नाही.

म्हणूनच हाती घेतलेलं कोणतेही काम असो, ते जीव ओतून करा. त्याचा मनमुराद आनंद घ्या. मनात एक हातात एक अशी द्विधा अवस्था झाली, की एकही काम नीट होत नाही. कार्यकुशल बनायचे असेल, तर एकावेळी एकच काम करा, पण मनापासून करा. तुमच्या सभोवताली असलेली यशस्वी मंडळी तुम्हाला हेच सूत्र वापरताना दिसतील. तुम्हीदेखील हा बदल करून पहा, हा यशस्वी होण्याचा मंत्र आहे, असे समजा.