शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

यशस्वी व्हायचे आहे? ओशो सांगत आहेत यशस्वी होण्याचे गुपित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 10:00 IST

कार्यकुशल बनायचे असेल, तर एकावेळी एकच काम करा, पण मनापासून करा.

काही लोक असतात, ज्यांना एक कामही नीट जमत नाही, तर काही लोक एकावेळी चार कामे बखुबीने करतात. कोणी म्हणतात शंभर गोष्टी करू नका, एकाच गोष्टीच्या मागे लागा, तर कोणी म्हणतात आताच्या काळात एका गोष्टीमागे लागून चालणार नाही, तुम्हाला चतुरस्र असावे लागते. अशावेळी कोणाचे ऐकावे आणि कोणाचे नाही, हेच कळत नाही. याबाबत ओशो काय म्हणतात ते पाहू. 

लहान लहान गोष्टी करताना इतर कोणताही विचार मनात न येऊ देता संपूर्ण जागरूक त्या गोष्टीबद्दल राहील असा प्रयत्न करा. समजा शांत बसला आहात. मग श्वासाकडे पूर्ण लक्ष द्या. श्वासाबद्दल पूर्ण भानावस्था असणे ही बुद्धाने महत्वाची प्रक्रिया मानली आहे. श्वास चोवीस तास चाललेला असतो. तुम्ही काहीही केले नाही तरी तो चाललेला असतो. या सहज क्रियेबद्दल संपूर्ण जाणून घ्या आणि त्याबद्दल पूर्ण सचेत व्हा. श्वास आत जाताना जाणीवपूर्वक जाऊ द्या. श्वास आत जात आहे. परत उच्छ्वास रूपाने फिरला. बाहेर येऊ लागला. पूर्ण बाहेर गेला. परत आत आला. आत बाहेर. श्वासांची एक माळ गुंफून घ्या. एक एक श्वासोच्छ्वासाचा मणी पुढे सरकवत राहा. तुम्ही चकीत व्हाल की ही साधी क्रियासुद्धा तु्ही भानपूर्वक करत नाही, हे विसरत असता. थोडा वेळ श्वासोच्छ्वासाबद्दल पूर्ण भानावर असता. मग मन जातं दुकानात. काही खरेदी करता. काही विकता. मग कुणाशी भांडण होते. परत तुम्ही दचकता. लक्षात येते. चांगला तास निघून गेला. मी कुठे गेलो होतो? श्वास विसरूनच गेलो. परत त्या बाबतीत जाणीव होते. याला काठाकाठाने करण्याचा अभ्यास म्हणतात.

श्वासाबद्दल जागरुक अवस्था असण्यात फार त्रास नाही. तुम्ही समजा क्रोधाच्या बाबतीत अशी जागरुकता बाळगायला जाल तर काय होईल? क्रोध काही रोज एकसारखा येत नाही. कधी तरी येतो. आणि येतो तेव्हा इतक्या तीव्रतेने प्रगाढपणे येतो, त्या क्षणी इतक्या गोष्टी पणाला लागलेल्या असतात की तुम्ही कदाचित विचार कराल, ते जागरुकता, भानावस्था नंतर पाहून घेऊ. आता जे काय वाटतय ते करून घेऊ.

कामवासना तर पार खोलवर पसरली आहे. निसर्गाने तशी योजना केलेली आहे. त्यावरच जीवनाचे सातत्य अवलंबून आहे. कामवासनेच्या बाबतीत निर्विकार साक्षीभाव बाळगणे सोपे झाले असते का? की तुम्ही इच्छा धरली आणि कामवासना नाहीशी झाली, तर तुमचा जन्म कधी झाला असता का? तुमच्या आधी किती तरी लोकांनी तिच्यापासून सुटका करून घेतली असती. तुमच्या असण्याची शक्यता नसण्याच्या पातळीवर जाऊ शकली असती. तुमच्या माता पित्यांची कामवासनेतून सुटका झाली नाही, म्हणून तुम्ही आहात. तुम्हीही कामवासनेपासून इतक्या सहज सुटू शकाल का? तुम्हालाही मुलं बाळं होणार असतील. ते जीव जन्म घेण्याच्या प्रतिक्षेत असतील. तुम्ही पळ काढू शकत नाही.

म्हणूनच हाती घेतलेलं कोणतेही काम असो, ते जीव ओतून करा. त्याचा मनमुराद आनंद घ्या. मनात एक हातात एक अशी द्विधा अवस्था झाली, की एकही काम नीट होत नाही. कार्यकुशल बनायचे असेल, तर एकावेळी एकच काम करा, पण मनापासून करा. तुमच्या सभोवताली असलेली यशस्वी मंडळी तुम्हाला हेच सूत्र वापरताना दिसतील. तुम्हीदेखील हा बदल करून पहा, हा यशस्वी होण्याचा मंत्र आहे, असे समजा.