शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी, लग्न, आर्थिक अडचणींवर मात करायची आहे? तर वैजयंती माळ धारण करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 17:56 IST

असे म्हणतात की जो कोणी वैजयंतीची माळ धारण करतो, त्याला कधीही इजा होत नाही आणि त्याच्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही.

ज्याप्रमाणे जन्मकुंडली आणि राशीनुसार रत्न आणि धातू धारण केल्याने फायदे होतात, ग्रह बलवान होतात. त्याचप्रमाणे धर्म आणि ज्योतिष शास्त्रात रुद्राक्ष, तुळशीची माळ अशा गोष्टींनाही खूप महत्त्व आहे. ते परिधान केल्याने सकारात्मक परिणाम अनुभवास येतात. याचेच एक उदाहरण म्हणजे वैजयंती माळ. ही माळ भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय आहे. 

भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांनी वैजयंतीचा पुष्पहार घालतात. जे भक्त वैजयंतीच्या बीजांपासून बनवलेल्या माळा घालतात त्यांना भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूचा आशीर्वाद मिळतो. म्हणून अनेक कृष्ण भक्तांच्या गळ्यात वैजयंती माळा बघायला मिळते. त्याचबरोबर ही माळ लक्ष्मीची कारक मानली जाते. त्यामुळे ही माळ धारण करणाऱ्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होतो. ही माला धारण करण्याचे इतरही अनेक फायदेशीर फायदे आहेत. असे म्हणतात की जो कोणी वैजयंतीची माळ धारण करतो, त्याला कधीही इजा होत नाही आणि त्याच्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही.

>>वैजयंतीची माळ धारण करायची असल्यास सोमवारी किंवा मंगळवारी धारण करावी. ती माळ एकदा धारण केल्यावर शक्यतो देहापासून विलग करू नये. त्या माळेच्या प्रभावाने जीवनातील नकारात्मकता संपून प्रत्येक कामात यश मिळू लागते.

>>वैजयंती माळ घातल्याने आर्थिक अडचणी कमी होतात. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने आर्थिक स्थिती सुधारते. 

>>वैजयंती माळ धारण केल्याने मन शांत राहते. क्रोधावर नियंत्रण मिळते. 

>>जे लोक सामाजिक जीवनात खूप सक्रिय असतात, त्यांनीही वैजयंती माळ घालावी. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा दिवसेंदिवस वाढते. ही माळ पावित्र्याची खूण असल्यामुळे आपल्या हातून वाईट कर्म होणार नाही याची जाणीव करून देते. 

>>महिलांनाही वैजयंती माळ घालण्याचा खूप फायदा होतो. त्यांचे मन शांत राहून त्यांना प्रसन्नता अनुभवायास मिळते. 

>>लग्नाला उशीर होत असल्यास गुरुवारी किंवा शुक्रवारी वैजयंतीला माळा धारण करावी. काही दिवसातच जोडीदाराचा शोध संपुष्टात येईल. 

>>जे लोक कला, लेखन किंवा इतर कोणत्याही सर्जनशील कार्याशी निगडीत आहेत, त्यांना ही माळ धारण केल्याने नवीन कल्पना प्राप्त होतील.

>>त्याचबरोबर वैजयंतीचे बीज लक्ष्मी मंत्राने सिद्ध केल्यानंतर ते घर किंवा दुकानात पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावे. त्यामुळेदेखील आर्थिक वृद्धी होते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष