शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

नोकरी, लग्न, आर्थिक अडचणींवर मात करायची आहे? तर वैजयंती माळ धारण करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 17:56 IST

असे म्हणतात की जो कोणी वैजयंतीची माळ धारण करतो, त्याला कधीही इजा होत नाही आणि त्याच्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही.

ज्याप्रमाणे जन्मकुंडली आणि राशीनुसार रत्न आणि धातू धारण केल्याने फायदे होतात, ग्रह बलवान होतात. त्याचप्रमाणे धर्म आणि ज्योतिष शास्त्रात रुद्राक्ष, तुळशीची माळ अशा गोष्टींनाही खूप महत्त्व आहे. ते परिधान केल्याने सकारात्मक परिणाम अनुभवास येतात. याचेच एक उदाहरण म्हणजे वैजयंती माळ. ही माळ भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय आहे. 

भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांनी वैजयंतीचा पुष्पहार घालतात. जे भक्त वैजयंतीच्या बीजांपासून बनवलेल्या माळा घालतात त्यांना भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूचा आशीर्वाद मिळतो. म्हणून अनेक कृष्ण भक्तांच्या गळ्यात वैजयंती माळा बघायला मिळते. त्याचबरोबर ही माळ लक्ष्मीची कारक मानली जाते. त्यामुळे ही माळ धारण करणाऱ्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल होतो. ही माला धारण करण्याचे इतरही अनेक फायदेशीर फायदे आहेत. असे म्हणतात की जो कोणी वैजयंतीची माळ धारण करतो, त्याला कधीही इजा होत नाही आणि त्याच्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही.

>>वैजयंतीची माळ धारण करायची असल्यास सोमवारी किंवा मंगळवारी धारण करावी. ती माळ एकदा धारण केल्यावर शक्यतो देहापासून विलग करू नये. त्या माळेच्या प्रभावाने जीवनातील नकारात्मकता संपून प्रत्येक कामात यश मिळू लागते.

>>वैजयंती माळ घातल्याने आर्थिक अडचणी कमी होतात. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने आर्थिक स्थिती सुधारते. 

>>वैजयंती माळ धारण केल्याने मन शांत राहते. क्रोधावर नियंत्रण मिळते. 

>>जे लोक सामाजिक जीवनात खूप सक्रिय असतात, त्यांनीही वैजयंती माळ घालावी. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा दिवसेंदिवस वाढते. ही माळ पावित्र्याची खूण असल्यामुळे आपल्या हातून वाईट कर्म होणार नाही याची जाणीव करून देते. 

>>महिलांनाही वैजयंती माळ घालण्याचा खूप फायदा होतो. त्यांचे मन शांत राहून त्यांना प्रसन्नता अनुभवायास मिळते. 

>>लग्नाला उशीर होत असल्यास गुरुवारी किंवा शुक्रवारी वैजयंतीला माळा धारण करावी. काही दिवसातच जोडीदाराचा शोध संपुष्टात येईल. 

>>जे लोक कला, लेखन किंवा इतर कोणत्याही सर्जनशील कार्याशी निगडीत आहेत, त्यांना ही माळ धारण केल्याने नवीन कल्पना प्राप्त होतील.

>>त्याचबरोबर वैजयंतीचे बीज लक्ष्मी मंत्राने सिद्ध केल्यानंतर ते घर किंवा दुकानात पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावे. त्यामुळेदेखील आर्थिक वृद्धी होते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष