शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शुक्राचा कर्क राशीवर पडणार प्रभाव, अन्य राशींवरही होणार सुखाचा वर्षाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 16:35 IST

१७ जुलैपर्यंतचा काळ बाराही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे, त्याचा जास्तीच जास्त लाभ करून घ्या!

शुक्र ग्रह, जीवनात आनंद, सौंदर्य, समृद्धी, प्रणय या गोष्टींशी निगडित असतो. २२ जून रोजी शुक्राने राशी बदलली आहे. मिथुन राशीतून कर्क राशीत येणारा शुक्र १७ जुलैपर्यंत या राशीत मुक्काम करणार आहे. त्याच वेळेस अन्य राशींच्या वाट्याला कोणकोणत्या घडामोडी येणार आहेत, त्याचा थोडक्यात आढावा. 

मेष : या राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होऊ शकतात. हे बदल सकारात्मक असतील. संपूर्ण कुटुंबाचे आणि विशेषत: आईचे विशेष प्रेम मिळेल.

वृषभ : या राशीच्या लोकांच्या जीवनात शुक्राचा हा राशी बदल भौतिक सुखांना वाढवत आहे. गृहसौख्य लाभेल. कौटूंबिक सोहळे होतील. परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 

मिथुन : या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक देखील फायदेशीर ठरू शकते. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग आजमावून पाहता येतील. एकूणच, आर्थिक फायद्याची शक्यता आहे.

कर्क : व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण वाढेल, यामुळे कामात यश मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. प्रयत्नांना यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

सिंह : शुक्राचे संक्रमण या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक उत्पन्न वाढेल. परंतु आरोग्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. 

कन्या : या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल. समाजातही आदर वाढेल. वाद टाळा. नातेसंबंध जपा अन्यथा शुल्लक कारणावरून नात्यात दरी निर्माण होऊ शकेल. 

तूळ : काही काळ कर्ज घेणे टाळा. कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.तज्ञांचा सल्ला घ्या नाहीतर मोठे नुकसान होऊ शकेल. नीट मार्गदर्शन मिळाले, तर लाभ होण्याचीही शक्यता आहे. 

वृश्चिक : शुक्राचा संक्रमण काळ तुम्हाला फायदेशीर ठरेल. कठोर परिश्रम केल्याने यश मिळेल. नोकरी, व्यापारानिमित्त परदेशाशी संपर्क येऊ शकतो. 

धनु : या लोकांसाठी ही वेळ काळजी घेण्याची आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. शत्रूपासून सावध रहा. संपत्ती आणि आरोग्याची काळजी घ्या.

मकर : शुक्र राशीच्या राशीच्या बदलामुळे नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी दूर होतील. याशिवाय विवाहित जीवनही सुखी होईल.

कुंभ : नवीन कामाची संधी मिळेल. जुन्या कामाचा दबाव कमी होईल. दरम्यान कर्ज घेणे टाळा आणि वादविवाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. 

मिन : शुक्राचे राशि परिवर्तन प्रेम संबंधांबाबतीत यशस्वी होईल. शिक्षणाच्या बाबतीतही ते चांगले आहे. आपणास कोणतेही ध्येय गाठायचे असेल तर धीर धरा कारण लवकरच तुमचा यशाचा काळ सुरू होत आहे.