शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

वासुदेव फडके जयंती विशेषः प्रखर दत्तभक्त आणि धर्म-राष्ट्राची उपासना 'बळवंत' असणारे आद्य क्रांतिकारक

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: November 4, 2020 18:15 IST

वासुदेव बळवंतांचे आराध्य दैवत श्रीदत्त हेच होते. दिवसाच्या सुरुवातीला नित्य दत्त सहस्रनामाचा जप केल्याशिवाय त्यांनी कधी पाण्याचा थेंबही घेतला नाही.

ठळक मुद्दे‘दधिची ऋषींनी धर्मकार्यासाठी आपल्या अस्थी देवांना दिल्या, तर हिंदवासियांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये?’ अशी वासुदेव फडके यांची वृत्ती होती.

ज्योत्स्ना गाडगीळ 

समाजकार्य, राष्ट्रकार्य, धर्मकार्य हाती घेत असताना आध्यात्मिक बैठकही तितक्याच ताकदीची असावी लागते, हे ज्यांनी सिद्ध केले, ते आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची आज जयंती आहे. त्यांना सशस्त्र क्रांतीचे जनकही म्हटले जाते. त्यांच्या घरात ना क्रांतीचे वारे होते, ना देशभक्तीचे बाळकडू. तरीदेखील केवळ आपल्या मातृभूमीची ब्रिटीशांच्या तावडीतून सुटका व्हावी, म्हणून सर्वसामान्य घरातला एक तरुण सोन्यासारखी नोकरी झुगारून स्वातंत्र्ययज्ञात आपल्या प्राणांची आहुती देतो, त्या बलिदानाचे मोल राखणे आपले कर्तव्य आहे.

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म पनवेल जवळील शिरढोण येथे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. कल्याण येथे प्राथमिक शिक्षण संपवून ते इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले. गिरगावातील फणसवाडी येथील जगन्नाथाचे चाळीत वास्तव्य करून त्यांनी काही काळ इंग्रजी अभ्यास केला व पुढील शिक्षणासाठी ते  पुण्यास रवाना झाले. शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या सैनिकी लेखानियंत्रक (कंट्रोलर ऑफ मिलिटरी अकाऊंटस) कार्यालयात सेवा केली. 

हेही वाचा : मी मेल्याशिवाय देव दिसणार नाही- रामकृष्ण परमहंस!

त्यांना त्यांच्या आजारी आईला भेटण्यास रजा मिळाली नाही. आईचे निधन झाले व शेवटी भेटही घेता आली नाही. या घटनेने आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. त्यांनी आपल्या मातेची आणि भारतमातेची तिच्या लेकरांपासून ताटातूट करणाऱ्या इंग्रज सरकाराचा नायनाट करायचा असा पण केला. त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना समर्थांच्या ओव्यांची आठवण करून दिली. 

सकल सुखाचा केला त्याग, करूनी साधिजे तो योग,राज्य साधनेची लगबग, कैसी केली।त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष,या उपरी आता विशेष, काय लिहावे?

हे समर्थ वचन ध्यानी ठेवून वासुदेवाने घरदार सोडले. त्याच वेळी हिंदुस्थानात भीषण दुष्काळ पडला. इंग्रज सरकारच्या हलगर्जी  कारभाराचे मुळे हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. त्यामुळे इंग्रज राजवटी बाबत प्रचंड संताप त्यांचे मनात उफाळून आला व त्याचा प्रतिशोध घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सशस्त्र बंड करण्याचे ठरवले. संघटना केल्या. रामोशी, भिल्ल, मांग, कोळी, आगरी, ब्राह्मण अशा सर्व समाजातील देशभक्त संघटित केले आणि त्यांना शस्त्रवापराचे प्रशिक्षण दिले. राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी माल, शस्त्र प्रशिक्षण यांना प्राधान्य दिले. त्यांनी सुरू केलेल्या लाठीवर्गात खुद्द लोकमान्य टिळकांनीदेखील प्रशिक्षण घेतले होते. इंग्रजांशी हातमिळवणी केलेल्या गद्दार धनाढ्यांना लुटून त्यांनी धन-संपत्ती गोळा केली आणि राष्ट्रकार्यार्थ तिचा योग्य विनिमय केला. प्रत्येक क्रांतीकारकाला सैनिकांप्रमाणे रोजगार दिला आणि मजबूत शस्त्रसाठा तयार केला. परिणामी त्यांना शिक्षा होऊन त्यांना एडन येथे धाडले गेले. व तेथेच त्यांना १७ फेब्रुवारी १८८३ ला मृत्यू आला. 

पुण्याच्या फायनान्स ऑफिसात नोकरी करीत असताना त्यांच्या मनातील वैराग्यवृत्ती उसळून वर आली. मंत्रतंत्र, सत्पुरुषांच्या गाठीभेटी यांत त्यांना गोडी वाटे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनाही ते भेटले होते. वासुदेव बळवंतांचे आराध्य दैवत श्रीदत्त हेच होते. श्रीपादवल्लभ नामक ध्यानाचे एक चित्र त्यांनी एका चित्रकाराकडून मुद्दाम काढून घेतले होते. त्याची नित्य ते पूजा करीत. रोज ते श्रीगुरुचरित्राच्या पोथीचा अध्याय वाचीत. दत्तांच्या आराधनेचा व उपासनेचा एक ग्रंथ ‘दत्त महात्म्य’ नावाचा प्रसिद्ध करण्याचा त्यांना मानस होता. गंगाधरशास्त्री दातार यांच्याकडून ‘दत्तलहरी’ या स्तोत्राचे भाषांतर करवून वासुदेव बळवंतांनी प्रसिद्ध केले होते. दिवसाच्या सुरुवातीला नित्य दत्त सहस्रनामाचा जप केल्याशिवाय त्यांनी कधी पाण्याचा थेंबही घेतला नाही. दत्तपादुकांची प्रतिकृती छोट्याशा डबीतून ते सदैव आपल्या जवळ बाळगत असत. 

राजद्रोहाखाली यांना हद्दपारीची शिक्षा झाली. एडन येथेच जन्मठेप भोगीत असताना त्यांचे निधन झाले. ‘दधिची ऋषींनी धर्मकार्यासाठी आपल्या अस्थी देवांना दिल्या, तर हिंदवासियांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये?’ अशी त्यांची वृत्ती होती. असे हे थोर क्रांतीकारक भारतमातेच्या लढ्यासाठी दत्तरूप होऊन उभे राहिले मात्र त्यांची किंमत न कळलेल्या आपल्याच बंडखोरांमुळे भारतमातेला स्वातंत्र्यासाठी आणखी अनेक वर्षे झुरावे लागले. 

हेही वाचा : सद्गुरुसी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय!'