शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: घर सजावटीसाठी फुलदाणीत खरी फुले वापरा; कृत्रिम फुलांनी निर्माण होऊ शकतो वास्तुदोष!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 07:00 IST

Vastu Shastra: घर सजवण्यासाठी आपला आटापिटा असतो, पण त्यात चुकीच्या गोष्टींचा नकळत शिरकाव होतो. त्यावर वास्तू शास्त्राने दिलेली सूचना... 

वास्तुशोभेसाठी फुलांचा वापर करणे हा प्रयोग काही नवीन नाही. ही पद्धत पूर्वापार चालत आली आहे. अगदी राजा महाराजांच्या काळापासून! त्याकाळात त्यांच्या राजमहालाच्या अवती भोवती उपवन असे. त्यानंतरच्या काळात घराभोवती छोटीशी बाग केलेली असे. त्यानंतरच्या काळात गॅलरीत बागेची हौस भागवली जाऊ लागली. आणि आता तर तेवढेही बागकाम करायला वेळ नाही म्हणून कृत्रिम फुलांनी घर सजवण्याचा पर्याय शहरी घरांमध्ये आढळतो. सण उत्सवापुरता त्यांचा वापर ठीक आहे परंतु दररोज ती फुले घरात सजवून ठेवणे हिताचे नाही. ती फुलं दिसायला आकर्षक असतात, परंतु त्या फुलांमुळे रोगराई वाढण्याची आणि इतर संकटं ओढवून घेण्याची दाट शक्यता असते. 

घराच्या आवारात, परिसरात किंवा घरात फुलांची आकर्षक रचना करण्यामागे वास्तुशास्त्राचा हेतू होता, तो म्हणजे प्रसन्न वातावरणाची निर्मिती! केवळ फुलदाणीत फुलांची सजावट नाही, तर देवघरात देव्हाऱ्याभोवती फुलांची आरास, दारात फुलांची रांगोळी, प्रवेशद्वाराजवळ घंगाळ्यात पाण्यावर तरंगणारी आकर्षक फुलं-पानं पाहून कोणाला बरे प्रसन्न वाटणार नाही? मात्र ती जागा आता कृत्रिम फुलांनी घेतली असल्यामुळे त्या फुलांना सुगंध, दरवळ नसला तरी ती आकर्षणापुरती वापरली जातात. मात्र वास्तुशास्त्राला त्या फुलांचा वापर अमान्य आहे. 

कुटुंबात दु:ख वाढू लागते

वास्तुशास्त्राविषयी बोलायचे झाले तर, कृत्रिम फुले घरात लावू नयेत. याचे कारण कृत्रिम गोष्टी खरी अनुभूती देत ​​नाहीत. त्यामुळे संसाराचा खरा आनंदही खोटा वाटू लागतो. म्हणून कृत्रिम वस्तू, तसेच जुन्या वापरलेल्या वस्तू आपल्या घरात वापरणे टाळावे असे सांगितले जाते. अन्यथा घरात अशांतता वाढते. 

नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते

ज्योतिषशास्त्रानुसार कृत्रिम फुले आणल्याने नकळत नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. ही नकारात्मक उर्जा लवकरच कुटुंबातील सर्व लोकांना आपल्या कवेत घेते, घरच्यांची चिडचिड होते, वाद होतात. नकारात्मक प्रभाव वाढतो. 

आरोग्यावर वाईट परिणाम होतो

खरी फुले रोजच्या रोज बदलली जातात. मात्र खोटी फुले दिवसेंदिवस तशीच तशी राहतात. त्यावर धूळ, माती बसून आजारांना आमंत्रण मिळते. कीटकांचा, जीवजीवाणूंचा वावर वाढतो. त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही होतो. कृत्रिम फुलांमुळे डोकेदुखी, मायग्रेन, मानसिक ताण, चक्कर येणे, ताप, यांसारख्या समस्या वाढतात. विशेषत: महिलांना या समस्या लवकर होतात, त्यामुळे ही बनावट फुले शक्यतो टाळावीत.

दिखावा करण्याची सवय वाढते

वास्तूनुसार घरामध्ये कृत्रिम फुले लावल्याने घरातील सदस्यांमध्ये खोटे बोलण्याची आणि दिखाऊपणाची वृत्ती वाढते. यामुळे त्यांना वास्तविक जगापासून दूर असलेल्या काल्पनिक आणि कृत्रिम जगात जगण्याची सवय होते, ज्यामुळे त्यांचे समाजापासून वेगळेपण वाढते. दिखाव्याच्या वृत्तीमुळे घरातील लोकांमधील आपुलकी कमी होते आणि वैमनस्य वाढते. त्यामुळेच अशी फुले घरात न लावलेलीच बरी!

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र