शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Vastu Tips: चुकीच्या जागी औषधं ठेवणं हे सुद्धा असू शकतं  तुमच्या घरातील कायमस्वरूपी आजाराचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 12:50 IST

Vastu Shastra: एखाद्या घरातलं आजारपण संपता संपत नाही, तुम्ही सुद्धा या अनुभवातून जात असाल तर वास्तुशास्त्रात केलेले मार्गदर्शन वाचाच!

निरोगी जीवनासाठी आपल्याला पोषक आहाराबरोबरच शुद्ध हवा, सूर्यप्रकाश आणि शारीरिक व्यायामाची गरज असते. पण चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे या सर्व गोष्टी आता आपल्यापासून दूर होत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. यामुळे अगदी कमी वयातले तरुणसुद्धा वेगवेगळे बाम चोळताना, औषधं घेताना आढळतात. ज्येष्ठ मंडळी तर जेवण कमी आणि औषधच जास्त खातात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आता औषधं ही आपल्या आयुष्याचा एक भाग झालेली असली, तरी अकारण घरात ती यत्र तत्र सर्वत्र पसरून ठेवू नये. तसे करणे देखील आजाराला आमंत्रण ठरू शकते. याबाबतीत वास्तू शास्त्र काय सांगते ते जाणून घेऊ. 

घरी चुकीच्या दिशेने औषधे ठेवू नका

घर रोगमुक्त ठेवण्यासाठी घरात स्वच्छ सूर्यप्रकाश हवा. तसेच घरातील वस्तू योग्य जागी ठेवलेलया हव्या. अन्यथा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. घरातील आजारपणाला कधी कधी वास्तुदोष देखील कारणीभूत ठरतात. जर तुम्ही औषधे चुकीच्या दिशेने ठेवली तर नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि घराचा कोपरा आजारांचे माहेरघर होतो. आज आम्ही तुम्हाला औषधे ठेवण्याशी संबंधित अनेक वास्तु टिप्स सांगणार आहोत. त्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचे कुटुंब निरोगी आणि रोगमुक्त करू शकता.

चुकूनही या दिशेला औषधे ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, औषधे चुकूनही आपल्या पलंगावर किंवा उशीखाली ठेवू नयेत. झोपेआधी औषध घेणे सोयीचे जावे म्हणून जरी आपण हा पर्याय निवडत असलो तरी त्याच्या नकारात्मक लहरी आपल्या निद्रावस्थेत मनाचा ताबा घेतात. आपली मनस्थिती बिघडते आणि मनस्थिती बरोबर ग्रहथिती बिघडते. राहू केतू हे आजाराचे आणि अनारोग्याचे कारक असतात. घरातील ही नकारात्मकता राहू केतू ला आमंत्रण देतात आणि आजार तुमचा पिच्छा सोडत नाहीत. 

घराच्या आग्नेय दिशेला ठेवल्याने घरात दीर्घकालीन आजाराचा मुक्काम राहतो आणि आजारपण व औषधोपचारात पैसा पाण्यासारखा वाया जाऊन कुटुंब कंगाल होते. म्हणून आग्नेय दिशेला औषधं ठेवू नका. 

वास्तु तज्ञांच्या मते, औषधे पश्चिम किंवा उत्तर दिशेला ठेवणे टाळावे. असे केल्याने व्यक्ती बरी होण्याऐवजी अधिक आजारी पडते. शिवाय अनेक नकारात्मक गोष्टी आयुष्यात घडू लागतात. केवळ आजारी व्यक्ती नाही तर त्यामुळे पूर्ण कुटुंबाचे मनस्वास्थ्य बिघडते. 

अनेक लोक औषधांसाठी प्रथमोपचार पेटी घरी ठेवतात, तसे करणे चुकीचे नाही. मात्र घरात जेवढी केवढी औषधे आहेत ती एकाच ठिकाणी ठेवावीत, जेणेकरून ती आयत्या वेळी सापडतील आणि घरभर औषधांनि नकारात्मकता येणार नाही. 

औषधे या दिशेने ठेवावीत

वास्तुशास्त्रानुसार औषधे गरज असेल तेव्हाच घरात आणावीत. अत्यावश्यक औषधं घरात आणून ठेवलेली असतील तर ती उत्तर-पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. या दिशेला ईशान्य असेही म्हणतात. या दिशेला औषधे ठेवल्याने माणूस लवकर निरोगी होतो आणि घरातले आजारपण संपते. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र