शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 16:57 IST

Vastu Tips: घरच्या प्रवेश द्वाराजवळ असणारे पायपुसणे केवळ मातीच नाही तर नकारात्मक उर्जाही दूर करते, त्यासाठीच दिलेल्या महितीनुसार कापराचा वापर करा.

घराच्या प्रवेश द्वाराजवळ पायपुसणे ठेवलेले असते. घरात प्रवेश करण्याआधी चपला घराबाहेर काढून पाय पुसून घरात प्रवेश करणे अपेक्षित असते. या पायपुसणीमुळे घरात केवळ धुळीला, घाणीला प्रतिबंध होतो असे नाही तर त्यामुळे घराबाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यासही प्रतिबंध होतो. 

पूर्वीच्या काळी बाहेरून येणाऱ्यांसाठी अंगणात पाय धुण्याची व्यवस्था असे. आजही मंदिरात जाताना पाय धुवून आत प्रवेश करा अशी सूचना आढळते. या सूचनेचा संबंध केवळ स्वच्छतेशी नाही तर मानसिक आरोग्याशीदेखील आहे. घराबाहेर आपण नानाविध अनुभव घेतो, त्यात राग, लोभ, क्रोध, त्वेषाची भावना अधिक असते. या भावनेसह घरात प्रवेश केला असता घरचे वातावरण गढूळ होऊ शकते. म्हणून प्रवेश करताना पायावर पाणी घेतल्याने थेट मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात आणि मनातील भावभावनांवर नियंत्रण मिळवून घरात प्रवेश केला जात असे. त्यामुळे घराची आणि मनाची स्वच्छता अबाधित राहत असे. 

Astro Tips: 'या' उपायामुळे सोमवार २१ एप्रिलचा दिवस तुमच्या आयुष्यात संस्मरणीय ठरू शकतो!

मात्र आताच्या वसाहतीत अंगण आणि अशी व्यवस्था ठेवणे कठीण म्हणून त्याला पर्याय असतो पायपुसणीचा! दिसायला केवळ कापडाचा तुकडा असलेले हे फडके आपले भाग्य कसे पालटते ते पाहू! यासाठी वास्तुशास्त्राने केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे-

>> घराच्या मुख्य दरवाजाशी अंथरलेले पायपुसणे हलक्या हिरव्या रंगाचे असावे मात्र काळ्या किंवा गडद रंगाचे असू नये. रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित झाले पाहिजे. यासाठी फिकट रंगाचा वापर करावा. पायपुसणी वरचेवर बदलावी. तसे करणे आरोग्याच्या आणि वास्तूच्या दृष्टीने हिताचे असते. तसेच त्यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरात येणाऱ्या लक्ष्मीला अडथळा निर्माण होत नाही. 

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला सोनेखरेदी आवाक्याबाहेर? 'या' पाच वस्तू भरून काढतील सगळी कसर!

>> घरातील नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी पायपुसण्याखाली तुरटी ठेवावी. तुरटी पाण्यात फिरवली असता जसे पाणी शुद्ध होते तसे पायपुरण्याखाली तुरटी ठेवली असता घरातले वातावरण स्वच्छ, शांत आणि सकारात्मक राहते. त्यामुळेदेखील घरात येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशांचा योग्य विनिमय होतो आणि घरात पैसा टिकतो. 

>> कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापराच्या वड्या कापडात बांधून पायपुसणीच्या खाली ठेवा. कापरामुळे वातावरण शुद्धी होते. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील कलह मिटतात. ज्या घरात कलह कमी होतात तिथे लक्ष्मी दीर्घकाळ मुक्काम करते!

>> घराचा उंबरठा तुटला असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करावा. त्याला भेग पडलेली असणे अशुभ मानले जाते. उंबरठा सुयोग्य स्थितीत असावा आणि त्याला लागूनच आयताकृती पायपुसणे टाकावे, असे वास्तू शास्त्र सांगते. 

या छोट्याशा पण उपयुक्त टिप्स फॉलो केल्या असता आर्थिक गणिते सुधारतील आणि वास्तू आनंदी होईल हे नक्की!

Astro Tips: लक्ष्मीकृपा सदैव राहावी म्हणून सकाळी जाग आल्यावर पहिले करा 'ही' कृती!

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र