शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
6
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
7
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
8
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
9
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
10
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
11
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
12
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
13
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
14
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
15
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
16
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
17
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
18
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
19
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
20
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: तुमच्या टॉयलेट-बाथरूममध्ये 'या' वस्तू असतील तर आर्थिक अडचणी येणारच म्हणून समजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 12:22 IST

Vatu Tips: आपल्या हातून कळत-नकळत घडलेल्या चुकांमुळे वास्तु दोष निर्माण होतात; ते वेळीच दूर करण्यासाठी दिलेल्या गोष्टींमध्ये बदल करा.

घराच्या वास्तुदोषाचे कारण केवळ दिशा किंवा तिथे ठेवलेल्या वस्तू नसून काही सवयी देखील आहेत ज्या तुम्ही अंगीकारत आहात. अनेकदा आपण अनावधानाने अशा काही गोष्टी करतो ज्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते.  त्या गोष्टी वास्तू दोष आणि आर्थिक अडचणीला कारणीभूत ठरू शकतात.  अशाच सवयींपैकी एक सवय निगडित आहे आपल्या अंघोळीशी! 

>> अंघोळ केल्यावर आपण स्वच्छ होतो, तेवढीच स्वच्छता वास्तूमध्ये ठेवावी असे वास्तू शास्त्र सांगते. वास्तूशास्त्रानुसार, आपले न्हाणी घर अर्थात बाथरूम स्वच्छ ठेवले नाही तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. रोगराई वाढते. आजार होतात आणि आर्थिक स्थिती ढासळू लागते. यासाठी कोणत्या सवयी अंगिकारायला हव्यात ते जाणून घ्या!

>> अनेकांना अशी सवय असते अंघोळ झाल्यावर कपडे बाथरूमच्या फरशीवर टाकून ठेवतात किंवा एखाद्या बादलीत ओले कपडे ठेवून देतात. त्यामुळे कपड्यांना कुबट वास येतो, कपडे खराब होतात आणि त्यामुळे बाथरूम अस्वच्छ राहण्याला हातभार लागतो. तो गलिच्छपणा टाळण्यासाठी आपले अंतर्वस्त्र अंघोळीआधी धुवून टाकावे व अन्य कपडे ओले न करता एका बादलीत ठेवून मग धुवायला टाकावेत. 

>> बाथरूममध्ये गुंतूळ जमा करून ठेवू नये. ते दिसायला खराब दिसतात आणि त्यावर साबणाच्या पाण्याचे थर किंवा फेस साचून फरशी गुळगुळीत बनते. यासाठी वेळोवेळी बाथरूम स्वच्छ ठेवायला हवे हवे. गुंतूळ केराच्या टोपलीत टाकून द्यायला हवेत. 

>> बाथरूममध्ये शोभेसाठी रोपटी, वेली लावल्या असतील तर त्याची योग्य निगा राखा. त्यात अळ्या, किडे यांचा प्रादुर्भाव होणार नाही ना, याची दक्षता घ्या. 

>> नॅपकिन तसेच टॉवेल यांच्या स्वछ्तेचीही काळजी घ्या. त्याचा संपर्क थेट नाकातोंडाशी येत असल्याने अस्वच्छ टॉवेलमुळे रोगराई होऊ शकते. टॉवेल इतकेच सुती पायपुसणेदेखील महत्त्वाचे आहे. त्यावर पाय स्वच्छ पुसले असता ओल्या पायाचा चिखल, डाग घरात येणार नाही. 

>> बाथरूम मध्ये आरसा लावलेला असेल तर तो सुस्थितीत आहे ना याची काळजी घ्या. तो पडणार नाही अशा जागी ठेवा भेग पडलेला आरसा वापरू  नका. 

>> टॉयलेटची स्वच्छताही घराच्या स्वच्छतेएवढी महत्त्वाची; कारण घरच्यांचे आरोग्य टॉयलेटच्या स्वच्छतेवरून ठरत असते. कारण त्याचा दैनंदिन वापर होत असतो. म्हणून त्याची दैनंदिन स्वच्छता केली पाहिजे. आठवड्यातून एकदा सफाई केली तर पुरेशी स्वच्छता होत नाही. अगदीच शक्य नसेल तर निदान ३-४ वेळा तरी स्वच्छता ठेवत जा!

वास्तू शास्त्राचा आरोग्याशी नजीकचा संबंध आहे. आरोग्य उत्तम असेल तर अर्थ व्यवस्थाही उत्तम स्थितीत राहील, अन्यथा त्याचाही ऱ्हास होत राहील. म्हणून  दिलेल्या वास्तू टिप्स जरूर वापरा आणि आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने कायम श्रीमंत व्हा!

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र