शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
2
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
3
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
4
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
5
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
6
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
7
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
8
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
9
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
10
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
11
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
12
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
13
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
14
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
15
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
16
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
17
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारने लोकसभेत दिली 'डेटलाइन'
18
करून दाखवलं! हात गमावले पण 'तो' खचला नाही; पायांनी रचला इतिहास, ११ गोल्डसह १८ मेडल्स
19
ऑस्ट्रेलियन तरुणीवर सपासप वार, वाळूत अर्ध्यापर्यंत पुरलं, भारतात पळून आला; पण अखेर सापडलाच!
20
ट्रेनमध्ये भीक मागत होती अनाथ मुलगी; गोलूने वाईट नजरेपासून वाचवलं, घरी आणलं अन् लग्नच केलं
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: आजार, रोगराई यांपासून वास्तु मुक्त राहावी; म्हणून ताबडतोब घरात करा 'हे' बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:47 IST

Vastu Tips: घरात एकाला आजारपण आले तरी पूर्ण घरावर त्याचा प्रभाव जाणावतो, असे आजारपण तुमच्या वास्तूची पाठ सोडत नसेल तर दिलेले उपाय करा!

निरोगी जीवनासाठी आपल्याला पोषक आहाराबरोबरच शुद्ध हवा, सूर्यप्रकाश आणि शारीरिक व्यायामाची गरज असते. पण चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे या सर्व गोष्टी आता आपल्यापासून दूर होत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. यामुळे अगदी कमी वयातले तरुणसुद्धा वेगवेगळे बाम चोळताना, औषधं घेताना आढळतात. ज्येष्ठ मंडळी तर जेवण कमी आणि औषधच जास्त खातात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आता औषधं ही आपल्या आयुष्याचा एक भाग झालेली असली, तरी अकारण घरात ती यत्र तत्र सर्वत्र पसरून ठेवू नये. तसे करणे देखील आजाराला आमंत्रण ठरू शकते. याबाबतीत वास्तू शास्त्र काय सांगते ते जाणून घेऊ. 

घरी चुकीच्या दिशेने औषधे ठेवू नका

घर रोगमुक्त ठेवण्यासाठी घरात स्वच्छ सूर्यप्रकाश हवा. तसेच घरातील वस्तू योग्य जागी ठेवलेलया हव्या. अन्यथा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. घरातील आजारपणाला कधी कधी वास्तुदोष देखील कारणीभूत ठरतात. जर तुम्ही औषधे चुकीच्या दिशेने ठेवली तर नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि घराचा कोपरा आजारांचे माहेरघर होतो. आज आम्ही तुम्हाला औषधे ठेवण्याशी संबंधित अनेक वास्तु टिप्स सांगणार आहोत. त्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचे कुटुंब निरोगी आणि रोगमुक्त करू शकता.

चुकूनही या दिशेला औषधे ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, औषधे चुकूनही आपल्या पलंगावर किंवा उशीखाली ठेवू नयेत. झोपेआधी औषध घेणे सोयीचे जावे म्हणून जरी आपण हा पर्याय निवडत असलो तरी त्याच्या नकारात्मक लहरी आपल्या निद्रावस्थेत मनाचा ताबा घेतात. आपली मनस्थिती बिघडते आणि मनस्थिती बरोबर ग्रहथिती बिघडते. राहू केतू हे आजाराचे आणि अनारोग्याचे कारक असतात. घरातील ही नकारात्मकता राहू केतू ला आमंत्रण देतात आणि आजार तुमचा पिच्छा सोडत नाहीत. 

घराच्या आग्नेय दिशेला ठेवल्याने घरात दीर्घकालीन आजाराचा मुक्काम राहतो आणि आजारपण व औषधोपचारात पैसा पाण्यासारखा वाया जाऊन कुटुंब कंगाल होते. म्हणून आग्नेय दिशेला औषधं ठेवू नका. 

वास्तु तज्ञांच्या मते, औषधे पश्चिम किंवा उत्तर दिशेला ठेवणे टाळावे. असे केल्याने व्यक्ती बरी होण्याऐवजी अधिक आजारी पडते. शिवाय अनेक नकारात्मक गोष्टी आयुष्यात घडू लागतात. केवळ आजारी व्यक्ती नाही तर त्यामुळे पूर्ण कुटुंबाचे मनस्वास्थ्य बिघडते. 

अनेक लोक औषधांसाठी प्रथमोपचार पेटी घरी ठेवतात, तसे करणे चुकीचे नाही. मात्र घरात जेवढी केवढी औषधे आहेत ती एकाच ठिकाणी ठेवावीत, जेणेकरून ती आयत्या वेळी सापडतील आणि घरभर औषधांनि नकारात्मकता येणार नाही. 

औषधे या दिशेने ठेवावीत

वास्तुशास्त्रानुसार औषधे गरज असेल तेव्हाच घरात आणावीत. अत्यावश्यक औषधं घरात आणून ठेवलेली असतील तर ती उत्तर-पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. या दिशेला ईशान्य असेही म्हणतात. या दिशेला औषधे ठेवल्याने माणूस लवकर निरोगी होतो आणि घरातले आजारपण संपते. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र