शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Vastu Tips: आजार, रोगराई यांपासून वास्तु मुक्त राहावी; म्हणून ताबडतोब घरात करा 'हे' बदल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:47 IST

Vastu Tips: घरात एकाला आजारपण आले तरी पूर्ण घरावर त्याचा प्रभाव जाणावतो, असे आजारपण तुमच्या वास्तूची पाठ सोडत नसेल तर दिलेले उपाय करा!

निरोगी जीवनासाठी आपल्याला पोषक आहाराबरोबरच शुद्ध हवा, सूर्यप्रकाश आणि शारीरिक व्यायामाची गरज असते. पण चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे या सर्व गोष्टी आता आपल्यापासून दूर होत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. यामुळे अगदी कमी वयातले तरुणसुद्धा वेगवेगळे बाम चोळताना, औषधं घेताना आढळतात. ज्येष्ठ मंडळी तर जेवण कमी आणि औषधच जास्त खातात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आता औषधं ही आपल्या आयुष्याचा एक भाग झालेली असली, तरी अकारण घरात ती यत्र तत्र सर्वत्र पसरून ठेवू नये. तसे करणे देखील आजाराला आमंत्रण ठरू शकते. याबाबतीत वास्तू शास्त्र काय सांगते ते जाणून घेऊ. 

घरी चुकीच्या दिशेने औषधे ठेवू नका

घर रोगमुक्त ठेवण्यासाठी घरात स्वच्छ सूर्यप्रकाश हवा. तसेच घरातील वस्तू योग्य जागी ठेवलेलया हव्या. अन्यथा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. घरातील आजारपणाला कधी कधी वास्तुदोष देखील कारणीभूत ठरतात. जर तुम्ही औषधे चुकीच्या दिशेने ठेवली तर नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि घराचा कोपरा आजारांचे माहेरघर होतो. आज आम्ही तुम्हाला औषधे ठेवण्याशी संबंधित अनेक वास्तु टिप्स सांगणार आहोत. त्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचे कुटुंब निरोगी आणि रोगमुक्त करू शकता.

चुकूनही या दिशेला औषधे ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार, औषधे चुकूनही आपल्या पलंगावर किंवा उशीखाली ठेवू नयेत. झोपेआधी औषध घेणे सोयीचे जावे म्हणून जरी आपण हा पर्याय निवडत असलो तरी त्याच्या नकारात्मक लहरी आपल्या निद्रावस्थेत मनाचा ताबा घेतात. आपली मनस्थिती बिघडते आणि मनस्थिती बरोबर ग्रहथिती बिघडते. राहू केतू हे आजाराचे आणि अनारोग्याचे कारक असतात. घरातील ही नकारात्मकता राहू केतू ला आमंत्रण देतात आणि आजार तुमचा पिच्छा सोडत नाहीत. 

घराच्या आग्नेय दिशेला ठेवल्याने घरात दीर्घकालीन आजाराचा मुक्काम राहतो आणि आजारपण व औषधोपचारात पैसा पाण्यासारखा वाया जाऊन कुटुंब कंगाल होते. म्हणून आग्नेय दिशेला औषधं ठेवू नका. 

वास्तु तज्ञांच्या मते, औषधे पश्चिम किंवा उत्तर दिशेला ठेवणे टाळावे. असे केल्याने व्यक्ती बरी होण्याऐवजी अधिक आजारी पडते. शिवाय अनेक नकारात्मक गोष्टी आयुष्यात घडू लागतात. केवळ आजारी व्यक्ती नाही तर त्यामुळे पूर्ण कुटुंबाचे मनस्वास्थ्य बिघडते. 

अनेक लोक औषधांसाठी प्रथमोपचार पेटी घरी ठेवतात, तसे करणे चुकीचे नाही. मात्र घरात जेवढी केवढी औषधे आहेत ती एकाच ठिकाणी ठेवावीत, जेणेकरून ती आयत्या वेळी सापडतील आणि घरभर औषधांनि नकारात्मकता येणार नाही. 

औषधे या दिशेने ठेवावीत

वास्तुशास्त्रानुसार औषधे गरज असेल तेव्हाच घरात आणावीत. अत्यावश्यक औषधं घरात आणून ठेवलेली असतील तर ती उत्तर-पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. या दिशेला ईशान्य असेही म्हणतात. या दिशेला औषधे ठेवल्याने माणूस लवकर निरोगी होतो आणि घरातले आजारपण संपते. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र