शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

Vastu Tips: चोरून आणलेली मनी प्लांटची वेल पैशांचा पाऊस पाडते म्हणे; वाचा त्यामागील सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 13:12 IST

Vastu Shastra: वास्तू शास्त्रानुसार धनलाभ तसेच धनवृद्धीच्या दृष्टीने मनी प्लांट लावणे फायदेशीर ठरते, पण ती चोरून लावायची का? ते वाचा!

मनी प्लांट त्याच्या नावाप्रमाणे काम करते. वास्तूशास्त्रात मनी प्लांटला खूप महत्त्व आहे. घराच्या आत किंवा अंगणात मनी प्लांट लावले असता आणि त्याची यथायोग्य वाढ झाली असता सम्बधित व्यक्ती रोडपतीपासून करोडपती व्हायला वेळ लागत नाही असे म्हणतात. पण ते लावताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर उलट परिणाम समोर येतात.

वास्तुशास्त्रानुसार घराभोवती किंवा अंगणात, खिडकीत विविध प्रकारची रोपे लावली, तर ती पाहून मन प्रसन्न राहते. त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात, बैठकीच्या खोलीत, दिवाण खान्यात सूर्यप्रकाशाशिवाय टिकतील अशी रोपे लावण्यास सांगितले जाते. तो छोटासा कोपरा घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो. याच पार्श्वभूमीवर फेंगशुईच्या माध्यमातून मनी प्लांट भारतीय अंगणात रुजू लागले. नावाप्रमाणे ते पैशाचे झाड संबोधल्यामुळे आपसूक लोकांची अपेक्षा वाढली.

अनेकांना चांगले अनुभव आले, तर अनेकांना काहीच फरक पडला नाही. काही ठिकाणी तर मनी प्लांटची वाढदेखील झाली नाही. याला वास्तुशास्त्रात काही कारणे दिली आहेत. ती कोणती, ते जाणून घेऊ -

>> वास्तुशास्त्रानुसार दक्षिण पूर्व दिशा मनी प्लांटसाठी सर्वात योग्य दिशा आहे. कारण गणपती बाप्पा या दिशेचा स्वामी आहे. या दिशेने मनी प्लांट लावले असता घरात सुख समृद्धी येते. घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि पैशांचा तुटवडा कधीच जाणवत नाही.

>> उत्तर पूर्व आणि पूर्व पश्चिम दिशेला मनी प्लांट अजिबात लावू नये. त्यामुळे संपत्तीचा क्षय होतो. घरात आजारपण येते. नकारात्मक ऊर्जा खेचली जाते आणि वरचेवर कर्जबाजारी होण्याचे प्रसंग ओढवतात.

>> मनी प्लांट घराबाहेर न ठेवता घरात ठेवावे. जिथे सूर्यप्रकाश मिळाला नाही, तरी किमान उजेड मिळू शकेल. मात्र मनी प्लांटची जागा अशी निवडावी, जिथे लोकांचे सहज लक्ष जाणार नाही. त्यामुळे मनी प्लांटचा उचित फायदा मिळेल आणि त्याची योग्य वाढ देखील होईल.

>> मनी प्लांटची वाढ छान होत असेल, तर त्याची वेल घराच्या भिंतीवर नैसर्गिकरित्या पसरू द्यावी. त्यामुळे घरात संपत्तीची वाढ होते.

प्रश्न राहिला मनी प्लांट चोरून लावण्याचा तर... : 

अनेक जण सांगतात, की दुसऱ्याच्या घरून चोरून आणलेली मनी प्लांटची वेल आपल्या घराच्या रोपट्यात रुजवली तर त्यातून भरपूर धनलाभ होतो. मात्र अशा कोणत्याही गोष्टीला वास्तू तज्ञांनी याला दुजोरा दिलेला नाही. उलट कोणतीही अनैतिक गोष्ट वास्तूला त्रासदायक ठरू शकते. म्हणून चोरी न करता विकत आणलेले किंवा निसर्गात मिळालेली वेल आपल्या अंगणात रुजवणे कधीही इष्ट! 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र