शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

Vastu Shastra : घराचा उंबरठा असो नाहीतर अंगण, ते प्रसन्न असेल तर वास्तूही प्रसन्नच राहते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:31 IST

अंगण हे घराच्या प्रारंभाचे प्रवेशाच ठिकाण. तिथपासून पवित्र, स्वच्छ, मंगल, वातावरण निर्माण व्हावे, हा या अंगणपूजेचा हेतू. अंगण स्वच्छ, नीटनेटके करून नि रांगोळीने भवतालच्या झाडांनी सुशोभित करणे हेच पूजन! 

अंगणाला घराच्या अंतरंगाचे प्रतीक मानतात. अंगणावरून घराची कळा, घराचे रूप, घराचे सौंदर्य ओळखणे यासारखा वाकप्रचार अशा अर्थाचे द्योतक आहे. अंगणाविषयी असलेल्या अतीव आदरामुळे अंगणपूजेचा विधी हा हिंदू जीवनपद्धतीतील भावभक्तीचा अगाध महिमा आहे. गावाकडे आजही अंगण सारवले जाते, सुशोभित केले जाते. तो आनंद शहरात अनुभवणे कठीण आहे. म्हणून आजही शहरी माणूस मोकळ्या वेळेत गावातच जास्त रमतो.

घराच्या पुढच्या आणि मागच्या मोकळ्या जागेला अंगण म्हणतात. अंगण म्हणजे घराच्या परिसराचे मुक्त वातावरण होय. प्राचीनकाळी भव्य वाडे, राजवाडे इत्यादी वास्तू अनेक चौकांच्या असता. या चौकोनांनाही अंण असेच संबोधण्यात आले आहे. वाल्मिकी रामायण, हर्षचरित इ. ग्रंथांमध्ये अशी अंगणे उल्लेखली आहेत. अंगण हे भूमीचे प्रतीकात्मक रूपदर्शन आहे.

सूर्योदयापूर्वी झाडून त्यावर गोमयमिश्रित जलाने सडासंमार्जन करून रांगोळी घालून अंगणाचा परिसर व वातावरण प्रसन्न करणे, यालाच अंगणपूजा म्हणतात. शेणखळा, सडा याने माती बसते. घरात येत नाही. घरातील हवा शुद्ध राहते. शेण, गोमूत्र हे प्रदूषण निवारक आहेत. हे मान्य होऊ लागले आहे. अरुणोदयापूर्वी आकाशात सप्त अश्वांच्या रथात बसून सूर्यनारायण अवतरात. त्यांचे तेजस्वी प्रकाशकिरण अंगणात पडतात. त्या सूर्यनारायणाची स्वागत करणारी ही अंगणपूजा आपल्या संस्कृतीचा कुळाचार आहे.

प्राचीन काळापासून घरापुढील अंगणाशी अनेक सांस्कृतिक गोष्टी अनुबंधित आहेत. आपल्याकडे सण, उत्सव, व्रतवैकल्ये आणि धार्मिक विधिप्रसंगी अंगणात सडासंमार्जन करून त्यावर रांगोळी घालण्याची पूर्वापार पद्धत आहे. यशोदेला पूत्र झाला असता, गोकुळात झालेल्या जल्लोषाच्या आनंदोत्सवात या बाबीचा उल्लेख आहे. बहिरा जातवेदाने या प्रसंगाचे वर्णन करताना म्हटले आहे-

मग गौळी काय केले, समग्र वाडे झाडिले,आणि संमार्जन केले, गृहद्वारी।सडे घातले अंगणी, चौक घालिती सुहासिनी,विचित्र ध्वजा तोरणी, माळा पुष्पाचिया।

अंगणात रंगमाळा रेखणे हा स्त्रियांच्या व्रतवैकल्यातला एक उपचार आहे. चैत्रांगण ही रांगोळी लौकक व्रताचाच एक कुळधर्म आहे. चातुर्मासात अंगणात स्त्रिया विविधरंगी रांगोळ्या काढण्याचे व्रत करतात. संस्कृतीतील अनेक वा काही खास प्रतीके या चैत्रांगण रांगोळीत रेखाटलेली असतात. संस्कृतीजतनाचा हा एक सुरेख शैक्षणिक उपक्रम होता.

लोकसाहित्यातील अंगणाचे वर्णन हे छोट्या देऊळवाड्याची आठवण करून देणारे आहे. त्याचे भावस्वरूप लोकगीतातून मार्मिकपणे मांडले आहे. 

माझ्या अंगणात पिवळ्या लाल ग कर्दळी,बाळाची वर्दळी चारी दिशा।माझ्या अंगणात लाविल्या तुळशी,नाही होणार आळशी तान्हे बाळ।माझ्या अंगणात तुळशीचा वाफा,गोविंद घाली खेपा मंजुळींना,माझ्या अंगणात शोभती दुर्वा फुले ,खेळाया येती मुले बाळासंगे।

अंगण हे घराच्या प्रारंभाचे प्रवेशाच ठिकाण. तिथपासून पवित्र, स्वच्छ, मंगल, वातावरण निर्माण व्हावे, हा या अंगणपूजेचा हेतू. अंगण स्वच्छ, नीटनेटके करून नि रांगोळीने भवतालच्या झाडांनी सुशोभित करणे हेच पूजन!