शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Vastu Shastra: झाडूला आपण लक्ष्मी मानतो, त्याच्या वापराचे नियम पाळा तरच बसेल दुर्भाग्याला आळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:01 IST

Vastu Tips: केरसुणी म्हणा नाहीतर झाडू आपण या छोट्याशा पण महत्त्वाच्या गोष्टीचीही पूजा करतो, त्याला जोड द्या या वास्तुशास्त्रातील नियमांची!

प्रत्येक घरात झाडू ठेवलेला आढळतो. घराच्या स्वच्छतेसाठी झाडूचा वापर केला जातो. शिवाय त्याची लक्ष्मी म्हणूनही पूजा केली जाते. ते कशासाठी? ते समजून घेऊ. झाडूमुळे घरातली घाण बाहेर पडते व स्वच्छता, पावित्र्य आणि संपत्ती आपोआप येते. स्वच्छता आणि पावित्र्य यांमुळे घराचे दारिद्रय दूर होते आणि लक्ष्मीचा गृहप्रवेश होतो. आर्थिक अडचणी दूर होतात. त्यामुळे झाडूला लक्ष्मी मातेचे रूप मानले गेले आहे.

झाडूच्या रचनेवरून एक महत्त्वपूर्ण संदेश मिळतो. तोच संदेश संत गाडगे बाबांनीसुद्धा दिला होता. मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून झाडू बनवला जातो. तो एकत्रपणे घट्ट बांधलेला असतो. नव्हे तर अनेक घरांमध्ये आजही विकतचा झाडू नव्हे तर झाडू विक्रेत्यांकडून झाडू बांधून घेतात. झाडूची घट्ट गाठ एकात्मतेचे महत्त्व दर्शवते. एकात्मता नसेल तर देश, समाज, प्रदेश, घर यातील घाण साफ होऊ शकणार नाही. 

वास्तू शास्त्रानुसार घराच्या सुख-समृद्धीमध्ये झाडूचा महत्त्वाचा सहभाग असतो. ज्या घरात झाडूची काळजी घेतली जाते त्या घरात सकारात्मकता दिसून येते. झाडूबाबत काही खास गोष्टी लक्षात ठेवाव्यात व त्यासाठी  झाडू खरेदीचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

>> जर तुम्हाला नवीन झाडू घ्यायचा असेल तर शनिवारीच खरेदी करा. शनिवारी घरात नवीन झाडू वापरणे खूप शुभ मानले जाते. म्हणजेच जुना झाडू बदलायचा असेल तर तो शनिवारीच बदलावा.

>> जेव्हाही तुम्ही नवीन घरात जाल तेव्हा नवीन झाडू घ्या. नवीन झाडूच्या वापराने नवीन वास्तूमध्ये सुख समृद्धी येईल. 

>>वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला झाडू ठेवणे सर्वात योग्य आहे, जर हे शक्य नसेल तर झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरच्या लोकांची दृष्टी पडणार नाही. 

>> झाडू स्वयंपाकघर आणि धान्य साठवणुकीच्या खोलीत ठेवू नये, यामुळे आजारपण आणि गरिबी येते. शक्यतो अंगणात किंवा स्वयंपाक घराच्या बाल्कनीमध्ये ठेवा. 

>> एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की झाडू कधीही जाळू नये. जुना झाडू टाकायचा असल्यास तो केराच्या टोपलीत न टाकता पाला पाचोळ्यात किंवा एखाद्या आड वळणाच्या झाडापाशी टाकावा. 

>> शक्यतो सायंकाळी केर काढू नये कारण त्यावेळी घरात लक्ष्मी येत असते. काही कारणाने रात्री केर काढावा लागला तरी केर भरून टाकू नका, तो दुसऱ्या दिवशीच भरावा. 

>> घरात झाडू कधीही उभा ठेवू नका, झाडू नेहमी आडवा ठेवावा किंवा एखाद्या कोनाड्यात गवताची दिशा खाली राहील अशा बेताने ठेवावा. 

>> जर एखादी व्यक्ती तुमच्या घरातून बाहेर पडली तर किमान अर्ध्या तासानंतरच केर काढावा. 

>> झाडूवर पाय ठेवल्याने लक्ष्मीचा अनादर होतो, म्हणूनच झाडूला पाय लागताच नमस्कार करावा. 

>> रात्री झोपण्यापूर्वी झाडू मुख्य दरवाजाजवळ ठेवा आणि झोपा. यामुळे रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकत नाही असेही म्हटले जाते. 

>> या सर्व कारणांमुळे आपण धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी करतो आणि लक्ष्मी पूजेला त्याचे पूजन करतो. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र