शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 11:39 IST

Vastu Tips: पैसा अधिक प्रमाणात खर्च होऊ लागला की आपण पाण्यासारखा पैसा गेला असे म्हणतो; म्हणून पाणी, वास्तू नियम आणि आर्थिक गणित याबद्दल जाणून घ्या!

पाणी जपून वापरा हे आपण वाचतो पण प्रत्यक्षात पाण्याची बचत करत नाही. विशेषत: उन्हाळ्यात पाण्याची किम्मत आपल्याला कळते. पाणी येणार नाही कळल्यावर डोळ्यात पाणी येते. पिण्यासाठी, वापरासाठी पाणी लागणारच आहे. म्हणून पाण्याला जीवन म्हटले आहे. ते वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. सोबतच दिलेल्या वास्तु टिप्सचेही पालन करा. 

वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने घरात सकारात्मकता येते. अशा परिस्थितीत, वास्तु नियमांकडे लक्ष दिल्यास, व्यक्तीला त्याच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. असाच एक नियम आहे घरात योग्य जागी पाणी ठेवण्याचा! त्या नियमाचे योग्य पालन केले तर घरात सकारात्मक बदल दिसून येतील. 

पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वास्तुशास्त्रात पाणी ठेवण्याची योग्य दिशा सांगितली आहे. अशा परिस्थितीत पाण्याशी संबंधित या वास्तू नियमांचे पालन केल्यास जीवनात फायदे पाहायला मिळू शकतात.  तसेच वास्तु नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या समस्या वाढू शकतात.

पाण्याची टाकी : 

वास्तूनुसार घरातील बोरिंग किंवा पाण्याची टाकी आग्नेय दिशेला ठेवू नये. कारण ती अग्नीची दिशा मानली जाते. असे म्हणतात की अग्नी आणि पाणी यांच्या संयोगाने वास्तू दोष निर्माण होतात. त्या प्रभावामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच पाण्याची टाकी, पाण्याची भांडी, जसे की माठ, कळशी, हंडा दक्षिण आणि नैऋत्य दिशेला ठेवल्याने कौटुंबिक नुकसान होते.

पाणी कुठे ठेवावे : 

वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा ही पाणी भरण्यासाठी सर्वोत्तम जागा मानली जाते. त्यामुळे पाण्याची टाकी बोअर करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी उत्तर किंवा ईशान्य दिशा उत्तम मानली जाते. भांडी पाण्याने भरलेली ठेवण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा योग्य आहेत. हे नियम लक्षात ठेवल्यास घरात आर्थिक समस्या येत नाही.

या गोष्टी लक्षात ठेवा : 

वास्तू शास्त्रानुसार घरातील नळ कधीही गळके नसावे, अन्यथा घरामध्ये वास्तू दोष निर्माण होऊ शकतात. घरातला पैसा पाण्यासारखा वाहू लागतो आणि त्यामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच तुमच्या घरातील गळके नळ किंवा पाईपमधून होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी वेळेत डागडुजी करून घ्या आणि आर्थिक हानी थांबवा. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र