शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 11:39 IST

Vastu Tips: पैसा अधिक प्रमाणात खर्च होऊ लागला की आपण पाण्यासारखा पैसा गेला असे म्हणतो; म्हणून पाणी, वास्तू नियम आणि आर्थिक गणित याबद्दल जाणून घ्या!

पाणी जपून वापरा हे आपण वाचतो पण प्रत्यक्षात पाण्याची बचत करत नाही. विशेषत: उन्हाळ्यात पाण्याची किम्मत आपल्याला कळते. पाणी येणार नाही कळल्यावर डोळ्यात पाणी येते. पिण्यासाठी, वापरासाठी पाणी लागणारच आहे. म्हणून पाण्याला जीवन म्हटले आहे. ते वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा. सोबतच दिलेल्या वास्तु टिप्सचेही पालन करा. 

वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने घरात सकारात्मकता येते. अशा परिस्थितीत, वास्तु नियमांकडे लक्ष दिल्यास, व्यक्तीला त्याच्या जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. असाच एक नियम आहे घरात योग्य जागी पाणी ठेवण्याचा! त्या नियमाचे योग्य पालन केले तर घरात सकारात्मक बदल दिसून येतील. 

पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वास्तुशास्त्रात पाणी ठेवण्याची योग्य दिशा सांगितली आहे. अशा परिस्थितीत पाण्याशी संबंधित या वास्तू नियमांचे पालन केल्यास जीवनात फायदे पाहायला मिळू शकतात.  तसेच वास्तु नियमांकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या समस्या वाढू शकतात.

पाण्याची टाकी : 

वास्तूनुसार घरातील बोरिंग किंवा पाण्याची टाकी आग्नेय दिशेला ठेवू नये. कारण ती अग्नीची दिशा मानली जाते. असे म्हणतात की अग्नी आणि पाणी यांच्या संयोगाने वास्तू दोष निर्माण होतात. त्या प्रभावामुळे व्यक्तीला आर्थिक नुकसान आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच पाण्याची टाकी, पाण्याची भांडी, जसे की माठ, कळशी, हंडा दक्षिण आणि नैऋत्य दिशेला ठेवल्याने कौटुंबिक नुकसान होते.

पाणी कुठे ठेवावे : 

वास्तुशास्त्रात ईशान्य दिशा ही पाणी भरण्यासाठी सर्वोत्तम जागा मानली जाते. त्यामुळे पाण्याची टाकी बोअर करण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी उत्तर किंवा ईशान्य दिशा उत्तम मानली जाते. भांडी पाण्याने भरलेली ठेवण्यासाठी पूर्व आणि उत्तर दिशा योग्य आहेत. हे नियम लक्षात ठेवल्यास घरात आर्थिक समस्या येत नाही.

या गोष्टी लक्षात ठेवा : 

वास्तू शास्त्रानुसार घरातील नळ कधीही गळके नसावे, अन्यथा घरामध्ये वास्तू दोष निर्माण होऊ शकतात. घरातला पैसा पाण्यासारखा वाहू लागतो आणि त्यामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच तुमच्या घरातील गळके नळ किंवा पाईपमधून होणारी पाण्याची गळती थांबवण्यासाठी वेळेत डागडुजी करून घ्या आणि आर्थिक हानी थांबवा. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र