शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Vastu Shastra: पूजेत पितळी भांड्यांचा वापर केल्याने वास्तूमध्ये भरभराट होते म्हणतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 13:03 IST

Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार पूजेत पितळी भांड्यांचा वापर केल्याने घरात दीर्घकाळ ईशतत्त्व राहते आणि वास्तूमध्ये समृद्धी नांदते; त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

मंदिर असो की देवघर, पुजेच्या वेळी पितळी भांड्यांचा वापर शुभ मानला जातो. पूर्वीच्या काळी घराघरात पितळी भांड्यांचा सर्रास वापर केला जात असे. अलीकडे या भांड्यांनी पुन्हा एकदा स्वयंपाक घरात प्रवेश केला आहे. तसे करणे लाभदायक आहेच, पण वास्तुशास्त्र सांगते, पितळी भांड्यांचा (Peetal Utensil) अर्थात उपकरणांचा वापर देवघरात जरूर करावा. पितळ हा धातू शुद्ध व गुणकारी असल्याने सत्यनारायण पूजेपासून लग्नकार्यापर्यंत सर्व प्रसंगी पितळ्याची भांडी वापरली जातात. देवघरात त्याचा वापर केल्याने होणारे फायदे जाणून घेऊ. 

पिवळा रंग भगवान विष्णूंना प्रिय आहे: 

पितळ हा शुद्ध धातू मानला जातो. तो पिवळ्या रंगाचा असतो. पिवळा रंग भगवान विष्णू आणि इतर देवतांनाही प्रिय आहे. हा रंग त्याग, समर्पण, अध्यात्माचे प्रतीक मानला जातो. पिवळा रंग आल्हाददायक असल्याने पूजेत सकारात्मक ऊर्जेसाठी पितळी भांडी (Peetal Utensil) वापरतात. पूर्वी देवपूजेत सोन्या चांदीच्या उपकरणांचा वापर करत असत. सर्वसामान्य लोकांना त्यावर पर्याय म्हणून तांबे, पितळ, कास्य या धातूच्या भांड्याचा वापर सांगितला जातो. पितळदेखील सोन्यासारखे चकाकते म्हणून पूजेत पितळी भांडी वापरावीत असे सांगितले जाते. 

ईशतत्त्वाचा सहवास: 

ज्योतिषशास्त्रानुसार, पूजेच्या वेळी पितळ्याची भांडी वापरल्याने बृहस्पति ग्रहाचे पाठबळ मिळते. गुरूच्या शुभ प्रभावामुळे अशुभ कामे मार्गी लागतात. धार्मिक मान्यतेनुसार, पितळी उपकरणांनी पूजा केल्यास देवी-देवताही प्रसन्न होतात. पितळी कलशातून तुळशीला पाणी दिल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, त्यामुळे घरात सुख, समृद्धी नांदते आणि लक्ष्मी व विष्णूंचा आशीर्वाद मिळतो.  (Peetal Utensil)

नैवेद्यासाठीही पितळी भांड्यांचा वापर: 

नैवेद्याचे ताट पितळी असेल किंवा नैवेद्याचे अन्न पितळी भांड्यांमध्ये शिजवले असेल तर ते ज्योतिष शास्त्र, विज्ञान आणि अध्यात्माच्या दृष्टीने योग्य ठरते. दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा असेल तर तोही पितळी वाटीतून (Peetal Utensil) दाखवावा.मात्र पूजेमध्ये चुकूनही लोखंड, ऍल्युमिनिअम तसेच काचेचा वापर करू नये. पितळी किंवा तांब्याच्या भांड्यांचाच वापर करावा आणि मूर्ती देखील याच धातूंच्या निवडाव्या!