शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

Vastu Shastra: स्वयंपाकघरातील 'या' तीन गोष्टी कधीही संपू देऊ नका, अन्यथा वास्तूवर होईल दुष्परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 16:11 IST

Vastu Shastra: 'घर भरलेले असावे' असा आशीर्वाद थोरा मोठ्यांकडून दिला जातो, घरात सुबत्ता नांदावी म्हणून या वास्तू टिप्स देखील फॉलो करा!

घरात काय आहे, काय नाही याकडे गृहिणींचे बारीक लक्ष असते. मात्र नोकरी-व्यवसायाच्या गडबडीत किंवा इतर काही कामांच्या नादात स्वयंपाक घराकडे दुर्लक्ष होऊ शकते. परंतु वास्तू शास्त्रानुसार काही गोष्टींनी तळ गाठणे हे वास्तूच्या दृष्टीने हितावह ठरत नाही. त्यामुळे घराची आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. कारण या वस्तू केवळ अन्न धान्य नाही तर सुबत्तेचेही लक्षण मानले जाते. 

गृहिणींचा सगळ्यात जास्त वावर असतो तो स्वयंपाकघरात. त्यामुळे वास्तुशास्त्र सांगते, की स्वयंपाक घरातील वस्तूंची नियमावली यथायोग्यपणे सांभाळली असेल तर वास्तू दोष निर्माण होत नाहीत. याउलट स्वयंपाकघरातील गोष्टींमुळे वास्तू दोष निर्माण झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. म्हणून अत्यंत सावधतेने घराचा डोलारा सांभाळावा लागतो. यात कोणत्या चुका करायच्या नाहीत ते जाणून घेऊया. 

तांदूळ : 

तांदूळ हा भारतीय आहाराचा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे मुख्यतः भारतीय घरांमध्ये तांदूळ असतोच. तांदळाला धार्मिक आणि वास्तू शास्त्राच्या दृष्टीनेही अतिशय महत्त्व आहे. लग्नात अक्षता म्हणून, नववधूला माप ओलांडताना तसेच आशीर्वादाच्या अक्षता म्हणूनही तांदुळच दिला जातो.  वास्तुशास्त्रानुसार तांदूळ व्यक्तीच्या शुक्र ग्रहाशी अर्थात सुबत्तेशी संबंधित असतो. अशा स्थितीत जर तुमच्या स्वयंपाकघरातील तांदूळ संपला तर त्यामुळे शुक्रदोष होतो ज्यामुळे तुमच्या भौतिक सुख आणि ऐश्वर्यामध्ये घट होते.

हळद : 

हळद हा भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य मसाला आहे. आयुर्वेद, धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र अशा अनेक दृष्टीने हळदीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तूनुसार, जर तुमच्या स्वयंपाकघरात हळद पूर्णपणे संपुष्टात आली असेल, तर तुमच्या गुरु दोष निर्माण होऊन वास्तू दोष निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे डब्यातली हळद पूर्णपणे संपण्याआधी ती नव्याने भरून ठेवा. तसेच हळद कधीही शेजाऱ्यांकडे मागू नका किंवा कोणाला देऊ पण नका. त्यामुळे कर्जबाजारी होण्याची शक्यता असते. 

मीठ :

वास्तुशास्त्रात मिठाला फार महत्त्व आहे. मीठ हे समुद्रातून निघालेले असल्यामुळे लक्ष्मीचा भाऊ म्हणूनही ते संबोधले जाते. म्हणून आपण मीठ सांडू देत नाही. तसेच मिठाशिवाय स्वयंपाक अळणी होतो आणि जास्त पडले तर खारट होतो. त्यामुळे मीठ प्रमाणात असलेच पाहिजे. लादी पुसण्याचा पानात मीठ टाकले असता समृद्धी येते असे वास्तू शास्त्र सांगते. म्हणूनच की काय, लक्ष्मी पूजेत केरसुणी बरोबर मिठाचीही पूजा केली जाते. म्हणून घरात मीठ संपू देऊ नका, त्याआधीच नवी पुडी विकत आणा आणि सायंकाळी कधीही मिठाची देवाण घेवाण करू नका, अन्यथा आर्थिक स्थिती खालावते, असे वास्तू शास्त्र सांगते. 

 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र