हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. वर्षातील प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. अशातच चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला 'वारुथिनी एकादशी' म्हटले जाते. 'वरुथिनी' या शब्दाचा अर्थ आहे 'संरक्षण करणारी'. असे मानले जाते की ही एकादशी भक्तांचे सर्व संकटांपासून संरक्षण करते आणि त्यांना मोक्ष मिळवून देते. यंदा सोमवार १३ एप्रिल रोजी वरुथिनी एकादशी(Varuthini Ekadashi 2026) आली आहे, त्यानिमित्त विष्णू पूजेचे विधी आणि फळ जाणून घेऊ.
हे ही वाचा: Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
वारुथिनी एकादशीचे महत्त्व
१. पापांचे क्षालन: या दिवशी व्रत केल्याने मानवाचे सर्व ज्ञात-अज्ञात पाप नष्ट होतात.२. सौभाग्याची वृद्धी: ही एकादशी सौभाग्य प्रदान करणारी मानली जाते. विशेषतः स्त्रियांसाठी ही एकादशी अखंड सौभाग्य देणारी ठरते.३. कल्याणकारी फळ: असे म्हटले जाते की दहा हजार वर्षे तपश्चर्या केल्यावर जे फळ मिळते, तेच फळ केवळ वारुथिनी एकादशीचे व्रत केल्याने प्राप्त होते.४. मोक्ष प्राप्ती: भगवान विष्णूच्या 'वराह' अवताराची पूजा केल्याने व्यक्तीला मृत्यूनंतर वैकुंठ लोक प्राप्त होतो.
भगवान विष्णू पूजा विधी (Puja Vidhi)
ब्रह्म मुहूर्त स्नान: एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करावे.
व्रत संकल्प: देवघरात बसून भगवान विष्णूंसमोर हात जोडून व्रताचा संकल्प करावा.
पूजा मांडणी: विष्णूंच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला पंचामृताने स्नान घालावे. तुळशीपत्र, पिवळी फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा.
वराह अवतार पूजा: या दिवशी भगवान विष्णूंच्या 'वराह' रूपाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे.
दीपाधूप: शुद्ध तुपाचा दिवा लावून विष्णू सहस्रनामाचे पठण करावे.
आरती आणि क्षमा प्रार्थना: पूजेच्या शेवटी आरती करावी आणि काही चूक झाली असल्यास ईश्वराकडे क्षमा मागावी.
हे ही वाचा: Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
एकादशी व्रताचे नियम
एकादशीच्या दिवशी तांदूळ (भात) खाणे वर्ज्य आहे.
पूर्ण दिवस उपवास करावा. शक्य नसल्यास फलाहार घ्यावा.
रात्री जागरण करून विष्णू नामाचा जप करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
दुसऱ्या दिवशी (द्वादशीला) ब्राह्मणांना दान देऊन उपवास सोडावा.
Web Summary : Varuthini Ekadashi, observed on April 13th, is significant for Vishnu devotees. It absolves sins, brings prosperity, and equals ten thousand years of penance. Observing the fast, worshipping Lord Vishnu's Varaha avatar, and chanting his name are key practices for attaining salvation.
Web Summary : 13 अप्रैल को मनाई जाने वाली वरुथिनी एकादशी विष्णु भक्तों के लिए महत्वपूर्ण है। यह पापों को धोता है, समृद्धि लाता है और दस हजार वर्षों की तपस्या के बराबर है। व्रत रखना, भगवान विष्णु के वराह अवतार की पूजा करना और उनके नाम का जाप करना मोक्ष प्राप्ति के लिए महत्वपूर्ण है।