शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Varah Jayanti 2024: श्रीमद्भागवतानुसार भक्तरक्षणासाठी भगवान विष्णुंनी घेतले वराह रूप; वाचा अवतारकार्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:16 IST

Varah Jayanti 2024: आज वराह जयंती; भगवंताच्या प्रत्येक अवतारामागे काही न काही प्रयोजन आहे, वराह अवतारामागील भूमिका जाणून घेऊ.

वराह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार मानला जातो. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे रूप धारण केले होते. ज्या दिवशी हे घडले त्या दिवशी भाद्रपद शुक्ल तृतीया होती, म्हणूत त्या दिवशी वराह जयंती (Varah Jayanti 2024) असते. आज ६ सप्टेंबर रोजी वराह जयंती आहे. 

नील वराहाचा अवतार हिमयुगाच्या शेवटी शेवटी झाला होता. तेव्हा पृथ्वीवर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. रहायला जागाच शिल्लक नव्हती. महाप्रलय आला होता. सूर्याच्या भयंकर तापामुळे धरतीवरील सर्व वने सुकली. समुद्राचे पाणीपण आटले. ज्वालामुखी जागृत झाले. अतीव उष्णतेमुळे समुद्राच्या आटलेल्या पाण्याचे ढग झाले आणि न थांबणारा मुसळधार पाऊस पडू लागला. त्यातच वादळे झाली आणि बघता बघता सर्व पृथ्वी जलमय झाली.

हे पाहून ब्रह्मदेवाला चिंता वाटू लागली. त्याने क्षीरसागरात राहणाऱ्या वि़ष्णूला अवतार घेण्यास सांगितले. आणि मग विष्णूने नील वराहाच्या रूपात प्रकट होऊन पृुथ्वीचा काही हिस्सा जलमुक्त केला. पुराणकार म्हणतात की या काळात नील वराह आपली पत्नी नयनादेवीच्या बरोबर संपूर्ण डुक्करसेना घेऊन आला होता. त्यांनी आपल्या तीक्ष्ण दातांनी लत्ताप्रहारांनी, दगडी फावडी आणि दगडी कुदळींनी पृथ्वीला समतल करून राहण्यालायक बनवले. त्यासाठी त्यांनी पर्वताचे छेद करून त्या दगडांनी आणि मातीने खोलगट खड्डे भरले.  त्यानंतर पृथ्वीवर परत सुगंधित वने, पुष्करिणी व सरोवर निर्माण झाले. लतावृक्ष उगवले आणि परत जग हिरवेगार झाले. पृथ्वीचे आणि समस्त जीवांचे रक्षण करणाऱ्या वराह अवताराची आज जयंती निमित्त पूजा केली जाते. 

परंतु अनेक जणांचा गोंधळ होतो. वराह अवतार म्हणजे डुक्कर नाही किंवा जंगलात राहणारा रानडुक्कर देखील नाही. वेंगुर्ल्याचे भूषण दिगंबर जोशी या अवताराबद्दल लिहितात, वराह अवताराचे पूर्ण नाम यज्ञवराह आहे. भागवत महापुराणात या यज्ञवाराहाचे वर्णन आलेय.

जितंते जितंते तेऽजित यज्ञभावन त्रयी तनुं त्वां परिधुन्वते नम:।यद्रोमगर्तेषु निलिल्युरध्वरा स्तस्मै नम: कारणसूकराय ते।। 

ऋषि म्हणतात, भगवान अजित आपला जयजयकार असो हे यज्ञपते आपले वेदत्रयीरूप शरीर थरथरवीत आहात, आपणास नमस्कार असो आपल्या रोमरोमात सर्व यज्ञ समाविष्ट आहेत पृथ्वीला वर आणण्याकरता वराह रूप धारण केलेल्या आपणाला नमस्कार असो.

हे रुप दुराचारी लोकांना दिसणार नाही कारण हे यज्ञरुप आहे. याच्या त्वचेत गायत्री छंद, रोमांमध्ये कुश, डोऴ्यांमध्ये तूप, चार चरणांमध्ये होता, उद्गाता, अध्वर्यु व ब्रह्मदेव हे चार ऋत्विज आहेत.

सुक्र तुण्ड आसीत्स्रुव ईश नासयो रिडोदरे चमसा:कर्णरन्ध्रे।प्राशित्रमास्ये ग्रसने ग्रहास्तु ते यच्चवर्णं ते भगवन्नग्निहोत्रम्।।

हे देवा आपल्या मुखाच्या अग्रभागी स्रुक (यज्ञात तूप घालण्याची पऴी) नासिका छिद्रात स्रुवा (पऴीचाच एक प्रकार) पोटात इडा म्हणजे यज्ञीय भक्षण पात्र, कानामधे चमस पात्र, मुखामधे प्राशित्र (ब्रह्मभाग पात्र) व कंठ छिद्रात ग्रह म्हणजे सोमपात्र आहे व आपण जे चर्वण करत आहात ते अग्निहोत्र आहे. यज्ञ स्वरुपात विविध अवतार घेणे हे दिक्षणीय इष्टि (यज्ञ) आहे, आपली मान  ही उपसद आहे (तीन इष्टि) , दोन्हि दाढा या प्रायणीय व उदयनीय (दीक्षा ग्रहणानंतर व यज्ञ समाप्ती) ची इष्टि आहे. जीभ हे प्रवर्ग्य आहे, मस्तक हे सभ्य (होमरहित अग्नि) व आवसथ्य आहे व प्राण हे इष्टिकाचयन आहे.

(श्रौतयज्ञात विविध प्रकारचे इष्टि नामक यज्ञ असतात पंचाग नीट काऴजीपूर्वक पाहिले तर प्रतिपदा तिथी च्या पुढे "इष्टि " असे दिलेले आढऴेल. अग्निहोत्री ब्राह्मण या दिवशी यज्ञ करतात)

देवा आपला पराक्रम (वीर्य)  हे सोम आहे, आपले आसन हे प्रात:सवनादी तीन सवन आहेत, शरीरातले सप्तधातू हे हे अग्निष्टोम, अत्यग्निष्टोम उक्थ , वाजपेय, षोडशी, अतिरात्र व अप्तोर्याम असे सात श्रौत यज्ञसंस्था आहेत. शरीराचे सर्व सांधे हे सत्र यज्ञ आहेत व अशा रुपातले आपण संपूर्ण यज्ञ स्वरुप (सोम रहित) व क्रतू (सोम सहित) यज्ञ रुपच आहात. यज्ञ इष्टि या आपल्या मांसपेशी आहेत.

गाय, बैल, सर्प, मत्स्य, कूर्म, वराह सर्व प्राणिमात्रांत ईश्वरच भरलाय हे आमचा धर्म शिकवतो त्यामुऴे आम्ही त्यांना पूजतो. यज्ञवराह हा भगवंतांचा अवतार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे.त्याचा नैवेद्य अन्न हे यज्ञात समर्पण करण्यात येणारे हविर्द्रव्य आहे. भगवान महाविष्णु हे प्राणिमात्रांविषयी अत्यंत कनवाळू आहेत. मत्स्य, कूर्म, वराह, नारसिंह हे अवतार याचे प्रतिक आहेत त्याच सोबत राम अवतारात जटायु, व वानर सेना, जांबुवंत  या सर्वांवर भगवंतांनी कृपा केली होती. श्रीकृष्ण हे स्वत:च्या नावामागे "गोपाल" म्हणजे गायींचे पालन करणारा असे बिरुद मिरवत असत.हे समस्त देव प्राण्यांविषयी कनवाऴुच आहेत. हत्ती, मोर, नंदि, मूषक, सिंह व्याघ्र असे प्राणी आमच्या देवतांची वाहने आहेत आम्ही देवतांसोबत त्यांचे देखील पूजन अवश्य करतो. हिंदू धर्म आम्हास भगवंत सर्वत्रच आहेत ही दृष्टि देतो.