शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
2
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
3
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
4
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
5
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
6
Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त आणि विधी
7
Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
8
न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया
9
Cough Syrup : "पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण
10
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
11
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
12
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
14
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
15
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
16
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
17
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
18
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
19
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
20
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...

वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 10:37 IST

Waman Jayanti 2025: श्रीभगवंत अत्यंत भक्तवत्सल आहेत. कधीच कोणाचेही अकल्याण करीत नाहीत, हे आपण नेहमीच पक्के लक्षात ठेवले पाहिजे!

Waman Jayanti 2025: मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास सुरू आहे. गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे. गणेशोत्सव कालावधीत काही महत्त्वाची व्रते येतात. संपूर्ण मराठी वर्षात काही तिथी या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत येणाऱ्या या दिवसांत अनेक व्रते आचरली जातात. मात्र, त्यातील काही तिथींना ऐतिहासिक, पौराणिक घटना वा प्रसंगांमुळे वेगळे महत्त्व प्राप्त होते. वर्षभरातील या तिथींपैकी विशेष महत्त्व प्राप्त झालेली तिथी म्हणजे भाद्रपद शुद्ध द्वादशी. महाविष्णूंच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार असलेल्या वामनाचा जन्म भाद्रपद द्वादशीला झाल्याचे मानले जाते. म्हणून भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन जयंती म्हणून साजरी केली जाते.

यंदा, गुरुवार, ०४ सप्टेंबर २०२५ रोजी वामन जयंती आहे. वामन जयंती देशभरातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. विष्णूंच्या या वामन अवताराची एक पौराणिक कथा सांगितली जाते. श्रीमद भागवत पुराणात यासंदर्भात विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. श्रीभगवंत अत्यंत भक्तवत्सल आहेत, त्यांचे आपल्या भक्तांवर स्वत:पेक्षाही जास्त प्रेम असते आणि विविध प्रसंगांनी आपले ते निखळ प्रेम श्रीभगवंत व्यक्त करतातच. अशीच एक निरतिशय प्रेमाची सुखद लीला म्हणजेच श्रीभगवंतांचा श्रीवामन अवतार होय!

बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार

प्रात:स्मरणीय भक्तराज श्री बलिराजा यांच्या उद्धारासाठी आणि देवतांचे राज्य त्यांना पुन्हा प्रदान करण्यासाठी हा अवतार झाला. पण भक्तिशास्त्रात सांगितलेले भक्तांचे माहात्म्यच खरेतर या लीलेतून अधिक उजळून निघताना दिसते. भक्त कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही थराला जाऊनही आपल्या लाडक्या श्रीभगवंतांना धरूनच ठेवतात, त्यांची प्राप्ती करूनच घेतात, हेच या सुमधुर लीलेतून दृग्गोचर होते.

आपल्या शेतकऱ्यांचा हा बळी राजा नाही!

आपल्याकडे शेतकऱ्याला 'बळीराजा' म्हणतात, त्यात या दैत्यराज बळीचा काहीही संबंध नाही. शेतकऱ्यांचा राजा बळी म्हणजे हा दैत्यराज बळी नव्हे. भगवान श्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू भगवान श्रीबलिभद्र, श्रीबलराम हे शेतकऱ्यांचे राजे मानले जातात. म्हणूनच तर त्यांचे आयुध हल किंवा नांगर आहे, जे सर्व शेतकऱ्यांचे अत्यंत आवश्यक असे हत्यार आहे. 'हलधर' हे त्यामुळेच श्रीबलरामांचे एक नाव आहे. भगवान श्रीवामन हे प्रत्यक्ष भगवान श्रीमहाविष्णू आहेत. श्रीभगवंत कधीच कोणाचेही अकल्याण करीत नाहीत, हे आपण नेहमीच पक्के लक्षात ठेवले पाहिजे!

वामन जयंतीची पौराणिक कथा

भागवत पुराणातील वामन अवताराच्या कथेनुसार, देव व असुरांच्या युद्धामध्ये राक्षसांचा पराभव होण्यास सुरुवात होते. अशाने राक्षसकुळ संपून जाईल, या भीतीने असुरांचे गुरु शुक्राचार्य आपल्याला अवगत असलेली संजीवनी विद्या वापरून राक्षसांना पुन्हा जीवंत करतात. शुक्राचार्य हे असुरांचा राजा बळीराजासाठी मोठा यज्ञ करतात. बळीराजाला अग्नीकडून दिव्य रथ, बाण, अभेद्य चिलखत, विविध अद्भूत शक्ती मिळवून देतात. यानंतर असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते. असुरांचे सैन्य इंद्रावर हल्ला करण्याची तयारी करतात. बळीचे शंभर यज्ञ पूर्ण झाल्यावर तो इंद्र होईल, अशी इंद्राला भीती वाटू लागते. म्हणून इंद्र श्रीविष्णूंना शरण जातात. श्रीविष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात.

महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू बालकाच्या रुपात जन्म घेतात. महर्षी कश्यप आणि माता आदिती या बाळाचे वामन असे नामकरण करतात. महर्षी कश्यप ऋषींसह वामनावर यज्ञोपवीत संस्कार करतात. वामन बटुला महर्षी पुलह यज्ञोपवीत, अगस्त्य ऋषी मृगचर्म, मरिची ऋषी पलाश दंड, अंगिरसा ऋषी वस्त्र, सूर्य छत्र, भृगु ऋषी खडावा, गुरु देवांनी कमंडळु, माता अदितीने कॉपीने, सरस्वती देवी रुद्राक्षाची माळ आणि कुबेर भिक्षा पात्र देतात.

वामन वडिलांच्या आज्ञेने यज्ञा स्थळी जातात. राजा बळी नर्मदेच्या उत्तर किनाऱ्यावर अखेरचा यज्ञ करीत असतो. वामन अवतारातील श्रीहरी राजा बळीकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात. श्रीविष्णू भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात. शुक्राचार्यांना धोका लक्षात येतो. ते बळीला नकार देण्यास सुचवतात. परंतु, बळी तीन पावले जमीन देण्याचे वचन देतो. वामन रुपातील विष्णू एका पावलात स्वर्ग व दुसऱ्या पावलात पृथ्वी आणि तिसरे पाऊल कोठे ठेवू, असे विचारतात. 

शेवटी राजा बळी वामनासमोर आपले डोके धरतो व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतो. वामन अगदी तेच करतो आणि राजा बळीला पाताळात ढकलतो. सर्वकाही हरपून बसलेल्या बळीला आपल्या वचनाशी कटिबद्ध असलेले बघून वामनदेव प्रसन्न होतात. श्रीविष्णू बळीराजाला पाताळलोकाचे स्वामी करतात आणि द्वारपालपद स्वीकारतात.

॥ ॐ ॐ तपरूपाय विद्महे, सृष्टिकर्ताय धीमहि, तन्नो वामनः प्रचोदयात् ॐ ॥

॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

टॅग्स :chaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक