शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Vaishakh Amavasya 2023: वैशाख अमावस्येला 'पांडवांची अवस' असेही म्हणतात, जाणून घ्या त्यामागचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 07:00 IST

Vaishakh Amavasya 2023: १९ मे रोजी वैशाख अमावस्या आहे, या तिथीचे महाभारतकालीन वैशिष्ट्य जाणून घेऊया!

आपल्या येथे प्रत्येक सण, उत्सव यामागे विशेष कथा, परंपरा आहे. आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे माहितीचे हस्तांतरण होते. परंतु, जेव्हा काही गोष्टींचा आगापिछा आपल्याला माहीत नसतो, तेव्हा आपण आधार घेतो, ग्रंथांचा. वैशाख अमावास्येबाबतीतही अधिक जाणून घेण्यासाठी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर लिखित 'धर्मबोध' या ग्रंथाचा आधार घेतला आहे. त्यात ते लिहितात-

वनवास संपवून पांडव परत आले ते याच दिवशी, असे मानून या दिवशी काही प्रतीकात्मक विधी केला जातो. परतत असताना द्रौपदीसह पाचही पांडव गावाच्या वेशीजवळच्या एका डेरेदार निंबाच्या झाडाखाली विसाव्यासाठी थांबले. म्हणून विशेषकरून मराठवाड्यामध्ये या दिवशी सकाळीच प्रत्येक जण आपल्या घराजवळ अंगणातील एक कोपरा सजवतात. आसपास कडुलिंबाचे झाड असेल तर त्याच्याखाली प्रथम कोपऱ्याची जागा झाडून पुसून स्वच्छ करतात. तिथे कडुलिंबाच्या पानाची सुंदर मऊ बैठक तयार करतात. त्याच्यावर पाच पांडव आणि द्रौपदी म्हणून चुना लावलेले सहा छोटे दगड ठेवतात. नंतर द्रौपदीला हळद कुंकू, फुले वाहून तिच्यासह सर्वांची पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण करतात. 

महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील हा एक विशेष सण आहे. परंपरेने तो कुलाचार म्हणून अतिशय जिव्हाळ्याने साजरा केला जातो. घरातील वस्तू आणि थोडासा वेळ एवढ्यातच जर एवढी सुंदर परंपरा अबाधित राहिली असेल, तर ती नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल. पूर्वी महाराष्ट्रात सर्वदूर दिवाळीच्या निमित्ताने मुलेबाळे एकत्रितपणे घराच्या दारात मातीचे किल्ले बनवत असत. त्याच्याशी साम्य असलेला हा सण! एका हृद्य आठवणीला उजाळा देणारी ही परंपरा आपणही स्वीकारण्यास हरकत नाही. त्यामुळे संस्कृतीची मुळे अधिक बळकट होतील. पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीबद्दल कुतूहल वाटेल. ती पिढीदेखील इतिहास जाणून घेण्यास उत्सुक होईल. एकूणच हा सण अनेक सांस्कृतिक भावनांनी जोडलेला असल्यामुळे या सणाला 'भावुका' अमावस्या असेही म्हटले जाते. 

टॅग्स :Mahabharatमहाभारत