शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देहभ्रांती, मनोभ्रांती, जीवभ्रांती तोडतो तोच खरा गुरु​​​​​​​!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:07 IST

गुरुमुळे भ्रम मिटत नसेल व भ्रांती जात नसेल तर असा गुरु सोडायला वेळ न करणे योग्य.

           जो गुरु ते भ्रम न मिटे               भ्रांति न जिसका न जाय ।                  सो गुरु झुठा जानिये                   त्यागत देर न लाय ॥

          जो गुरु भ्रमच मिटवित नसेल, तर तो भयानक आहे. असा गुरु मनुष्याला भ्रमात ठेवून शोषण करु शकतो. म्हणून कबिरजी चेतावणी देतात, ज्या गुरुमुळे भ्रम मिटत नसेल व भ्रांती जात नसेल तर असा गुरु सोडायला वेळ न करणे योग्य. लायचा अर्थ होतो योग्य.         असा गुरु गुरु नाही गुरुघंटाल आहे. अर्थात चलाख आहे. उलट तो भ्रम कायम ठेवतो. मनुष्याची भ्रान्ती कायम ठेवतो. अहंकाराने देहाभिमान होतो. देहाभिमानाने नश्वर संसार सत्य असल्याचा भ्रम निर्माण होतो व शाश्वत सत्याविषयी भ्रांती निर्माण होते. खरे गुरु हा भ्रम व भ्रांती दूर करतात.                 आपण पाहतो कधी टीव्हीवर की, काही गुरु  हास्यास्पद भ्रमात मनुष्याला गुंतवितात. एक प्रसिध्द गुरु समोसा खाण्याने समस्या दूर करतो.  तर दुसरे काही गुरु देहासक्तीला आपल्या उपदेशात खोटं ठरवित होते, मात्र स्वतःच देहासक्ती व भोगापायी  कारावास भोगत आहेत. असे  शेकडो गुरु आपल्या चाहत्यांना भ्रमात ठेवून, भ्रांती कायम ठेवून लोकांच्या टाळ्या पडतील असे विचार सांगतात. संतांच्या वचनावर त्यांच्या हयातीत कधी एवढ्या  टाळ्या नाही पडल्या.  कारण ते लोकांची भ्रम, भ्रांती तोडत होते,  आंधळी श्रध्दा तोडत होते. अहंकारावर वार करीत होते. ह्यामुळे खर्‍या संतांना आपल्या काळात जनरोषाला सदैव सोसावे लागले.             खोट्या गुरुला लोक  बळी का पडतात? कारण बर्‍याच लोकांना अंहकार, सत्याविषयीचा भ्रम कायम असणेच सुखाचे वाटते. मग असा चलाख गुरु भ्रम कायमही ठेवताे.  त्याचेकडे शिष्य म्हणून येणार्‍या मनुष्याला तू खूप धार्मिक आहेस, दानी आहेस, खरा प्रेमी आहेस, खरा भक्त आहेस, अशा  अहंकाराचा अनेस्थिया देताे. मग त्या अहंकाराचे  गुंगीत असलेल्या माणसाचे तनमनधनाचे पूर्ण शोषण करायला चलाख गुरु मोकळा होतो. खरे तर  मनुष्याचे हे लक्षात यायला थोडी तरी स्तुति पराङ्मुखता असायला हवी. म्हणून बहुतेक स्तुति विषयी सावध नसलेले लोकच फसविले जातात. स्तुति मुळे स्वाभिमान फुलतो. आपल्या विषयी कोणताही अभिमानच घातक असतो. मुख्यतः स्त्रीच्या सौंदर्याचा व पुरुषाचे कर्तृत्वाचा अभिमान तर सर्वसाधारण राहतो. गुरुघंटाल त्या अभिमानाचे भ्रमालाच गोंजारतो.जगात अनेक लोक अध्यात्मिक लोकांकडून नाडविले जातात, त्याचे मुख्य कारण हेच असते.           यामुळे खरे संत खूप व्यथित होतात. म्हणून कबीरजी एक सुत्र देतात, की ओळखा, जो गुरु तुमच्या अहंकाराला गोंंजारत असेल, भ्रम व भ्रांती तोडत नसेल तर पळा त्याच्यापासून. कारण जगात केवळ खरा सदगुरूच भ्रम मिटवितो, भ्रांति पासून मुक्त करतो. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांचे वचन यासाठी समजून घेणे योग्य होईल.      हे श्री सदगुरुदयार्णव । तुझे कृपेसी नाही ठांव ।      कृपेने तारिसी जीव । जीवभाव सांडवूनि ॥      सांडवूनि देहबुध्दी । निरसोननि जीवोपाधी ।    भक्त तारिसी भवाब्धीं । कृपानिधी कृपाळुवा ॥हे सदगुरुनाथा, तुझ्या कृपेला अंत नाही. अनंत कृपा का म्हटली आहे ? कारण  ही कृपा संसाराच्या छोट्या मोठ्या समस्येसाठी नाही तर मनुष्याचा जीवच तारल्या जातो त्यासाठी होते.  संसाराची सुखदुःख का आहेत? खरे सुख काय आहे त्याचा बोध खरा गुरु देतो. गुरु जो जीवाचा जीव घेऊन जो देहभावाचा भ्रम मोडून शिवत्वाची ओळख करुन देतो.               साधारणतः  मनुष्याची बुध्दी सदेैव आपला देह, त्याचा लौकिक, घरदाराची, सत्ता संपत्ती याचे चिंतन करीत असते व मग यातून जो देहाभिमान होतो, खरा  गुरु तो नष्ट करतो. ती सांडवूनि देहबुध्दी, निरसोनि जीवोपाधी, गुरु आपल्या भक्ताला भवाब्धी, भवसागरातून  तारतो. वाचवतो. गुरुघंटाल डुबवतो. म्हणून पळा म्हणतात कबीरजी.          सदगुरु जग्गी वासुदेव यांची ध्यान पध्दती पाहत होतो. ते त्यामध्ये ते म्हणायला सांगतात, मी शरीरही नाही, मी मनही नाही.              तेव्हां जो देहभ्रांती तोडतो, जो मनोभ्रांती तोडतो? व जो शेवटची जीवभ्रांतीही तोडतो तोच खरा गुरु. जो या तिनही भ्रांतीला पोसत असेल तर पळा अशा गुरुजवळून लवकरात लवकर, असेच कबीरजी म्हणत आहेत. संतश्रेष्ठ कबीरजींना श्रध्दा नमन!                               

-  शं.ना.बेंडे पाटील               

टॅग्स :spiritualअध्यात्मिकkhamgaonखामगाव