शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Travel: पुण्याजवळच्या शिरगावला आहे साईबाबांची प्रति शिर्डी; बाजूलाच आहे श्री साई अन्न छत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 14:50 IST

Travel: दरम्यान शिर्डीला जाणे शक्य नसेल तर पुण्याजवळच्या प्रति शिर्डीला अवश्य भेट द्या आणि साईंचे दर्शन घ्या.

शिर्डीच्या साईबाबांच्या देवळाची आठवण व्हावी अशी बाबांची प्रति शिर्डी पुण्याजवळच्या शिरगावात आहे. साईबाबांचे प्रशस्त मंदिर, पंचतारांकित हॉटेलसदृश श्री साई अन्न छत्र आणि मंदिराच्या गाभाऱ्यात साईंची संगमरवरी मूर्ती पाहण्यासाठी भक्तांची रीघ लागते. 

मुंबई पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा या टोल नाक्यावरून डाव्या बाजूला पाच किलोमीटर अंतरावर हे साई स्थान आहे. शिर्डीच्या देवस्थानची पदोपदी आठवण येईल अशा खुणा या मंदिरातही आहेत. भव्य मंदिर, प्रशस्थ परिसर, नयनरम्य बाग, साईंचा दरबार, सोनेरी आणि पिवळसर रोषणाई असलेली प्रकाशयोजना, गाभाऱ्यात आरसे आणि सिंहासनावर विराजमान झालेली साईंची संगमरवरी मूर्ती चित्त वेधून घेते. 

पुण्याचे माजी आमदार प्रकाश देवळे यांच्या पुढाकाराने २००९ मध्ये हे मंदिर तयार झाले, मात्र तेथील स्वच्छतेमुळे आजही त्या मंदिराची नवलाई टिकून आहे. या परिरसरात साई बाबांची धुनीदेखील आहे, तसेच शिर्डीसारखे कडुलिंबाचे झाडदेखील आहे. तिथे दरदिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्यासाठी प्रसादालय अर्थात अन्नछत्र देखील उभारले आहे. 

साई अन्नछत्राचे बांधकाम एवढे सुंदर झाले आहे की तिथे प्रवेश करताना आपण अन्नछत्रात जात नसून एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जात आहोत कि काय असा भास होतो. आतमध्येही सुंदर रोषणाई, सुविचार, साईंचे फोटो आणि अन्न वाटप केंद्र. स्वच्छ खणाच्या ताटात पोटभर प्रसाद आणि थंडगार पाणी दिले जाते. तो प्रसाद कोणी ताटात टाकू नये अशी सूचना केली जाते. तिथे एकावेळी १००० भाविक भोजन करू शकतील एवढी मोठी बैठक व्यवस्था आहे. ती तीनमजली इमारत राजवाडा म्हणूनही ओळखली जाते. 

गुरु पौर्णिमा, दसरा, राम नवमी इ. महत्त्वाचे उत्सव तिथे साजरे केले जाते. मात्र मंदिराच्या सभोवतालच्या परिसराचा अजून म्हणावा तसा विकास झालेला नाही. ती वस्ती अजूनही बकाल आहे. जत्रासदृश खेळणी, बायकांसाठी दागिन्यांचे तर मुलांसाठी खाऊचे स्टॉल, देवाची उपकरणी, रुद्राक्ष माळा, सरबताची दुकानं  मंदिराबाहेर आहे. तिथला विकास झाला, नेटके नियोजन झाले, तर आणखी मोठ्या प्रमाणात भाविक तिथे येऊ शकतील हे नक्की. भविष्यात साईबाबाच ती योजना करून घेतली, तोवर आपण श्रद्धा आणि सबुरी ठेवू.