शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आज रामकृष्ण परमहंस यांची जयंती, त्यांनी स्वामी विवेकानंद यांना देवदर्शन कसे घडवले बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 07:00 IST

गुरु शिष्याला आपल्यासारखे नव्हे तर आपल्यापेक्षा वरचढ कसे बनवतात, हे सांगणारा प्रसंग वाचा. 

आज रामकृष्ण परमहंस यांची जयंती. ते स्वामी विवेकानंद यांचे गुरु. त्यांचे मूळ नाव गदाधर चट्टोपाध्याय. ते एकेश्वर वादाचे पुरस्कर्ते होते. अर्थात धर्म वेगवेगळे असले तरी ईश्वर एकच यावर त्यांची ठाम निष्ठा होती. ते ग्रामीण बंगालमधील एका गरीब वैष्णव ब्राह्मण परिवारात जन्मले. कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिरात त्यांनी काही काळ पौरोहित्य केले, त्यानंतर शाक्तपंथीयांच्या प्रभावाने काली मातेची आराधना सुरू केली. चिंतनातून त्यांना ईश्वर तत्त्व एकच असल्याची अनुभूती मिळाली. त्यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे-

''माझा धर्म बरोबर, दुसऱ्यांचा धर्म चूक – हे मत योग्य नाही. ईश्वर एकच आहे, त्याला वेगवेगळे लोक भिन्न भिन्न नावाने पुकारतात. कोणी म्हणते गॉड, कोणी अल्ला, कोणी म्हणते कृष्ण, कोणी म्हणते शिव, कोणी म्हणते ब्रह्म. तळ्यात पाणी असते पण कोणी त्याला पाणी म्हणते, कोणी वॉटर तर कोणी जल. हिंदू त्याला जल म्हणतात, ख्रिश्चन वॉटर, मुसलमान म्हणतात पाणी, - पण वस्तू एकच असते. एक-एका धर्माचे एक-एक मत असते, एक-एक पथ असतो - परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी; जशी नदी नाना दिशांहून येऊन एकाच सागरात विलीन होते!''

असे हे रामकृष्ण परमहंस यांचा सर्वात लाडका विद्यार्थी म्हणजे स्वामी विवेकानंद अर्थात बालपणीचा नरेंद्र! नरेंद्रवर त्यांचा अपार जीव होता. परंतु नरेंद्र हा विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ बुद्धिमत्तेचा असल्यामुळे चमत्कारांवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. त्याने गुरुदेवांना सांगितले, 'मला देव पहायचा आहे!' रामकृष्ण फक्त हसून विषय टाळत असत. 

एकदा नरेंद्र त्यांच्या पायाशी लोळण घेत म्हणाला, 'गुरुदेव आज मला तुम्ही देव दाखवा नाहीतर मी तुमचे पाय सोडणारच नाही!' त्याचा हट्ट पाहून, रडणे पाहून, आरडाओरड पाहून रामकृष्णांनी त्याच्या छातीवर आपल्या उजव्या पायाचा अंगठा टेकवला. आक्रस्ताळेपणा करणारा नरेंद्र शांत झाला. क्षणात त्याची समाधी लागली. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. कितीतरी वेळ तो समाधी अवस्थेत होता. त्याला विश्वशक्तीची प्रतीची आल्यावर रामकृष्णांनी पाय बाजूला केला आणि नरेंद्र समाधीतून बाहेर आला. 

त्याक्षणी नरेंद्रने जे अनुभवलं, ते शब्दातीत होतं. त्यानंतर अनेकदा नरेंद्रने तशी समाधी लागावी म्हणून गुरूंना प्रार्थना केली. त्यावर रामकृष्ण म्हणाले, 'ज्या देवत्त्वाची प्रचिती घेत तू आत्मानंद अनुभवलास, त्यात रमून राहू नकोस. विश्वाला त्या आनंदाची प्रचिती यावी म्हणून प्रचार, प्रसार कर. लोकांची दिशाभूल होत आहे, त्यांना सन्मार्गाला लाव. ईश्वर ही असीम शक्ती आहे. तिचे दर्शन समाजात घे आणि समाजाला दर्शन घडव. 

रामकृष्णांनी नरेंद्रचा हट्ट पूर्ण केला. त्याला ईश्वर तत्त्वाची प्रचिती दिली. स्वामी विवेकानंद होऊन जगाला ज्ञानाची दीक्षा देण्यास पात्र बनवले आणि स्वामी विवेकानंद यांनीदेखील हिंदू संस्कृतीचा डंका परदेशात वाजवला आणि जगभर रामकृष्ण मिशनची स्थापना करून देवाची आणि देवत्त्वाची लोकांना प्रचिती दिली.